शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या नातेवाइकांपासून डॉक्टर असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 05:55 IST

पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकाचे डॉक्टरांशी झालेल्या बाचाबाचीने रु ग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून शासनाने त्यांच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेले पोलीस अचानक काढून घेतल्याने डॉक्टरांना असुरिक्षततेच्या वातावरणात रुग्णावर उपचार करावे लागत आहेत.

- हितेन नाईकपालघर : पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकाचे डॉक्टरांशी झालेल्या बाचाबाचीने रु ग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून शासनाने त्यांच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेले पोलीस अचानक काढून घेतल्याने डॉक्टरांना असुरिक्षततेच्या वातावरणात रुग्णावर उपचार करावे लागत आहेत.जेजे रु ग्णालय व केईएम रु ग्णालया सह इतर ठिकाणी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांना सुरक्षा पुरवावी यासाठी महाराष्ट्रभर डॉक्टरांनी आंदोलन पुकारले होते. यावर प्रत्येक सरकारी रु ग्णालयात पोलीस तैनात करावेत असे आदेश शासनाने पारित केले होते. त्यानुसार महाराष्ट्रासह पालघरमधील सर्व रुग्णालयात तेथील कर्मचाऱ्यांची व डॉक्टरांची सुरक्षेसाठी दिवसरात्र पोलीस नेमण्यात आले होते.मात्र, काही काळानंतर कुठलीही पूर्वसूचना न देताच पोलीसाना तेथून हलविण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांवर होणाºया हल्ल्याच्या घटनांत वाढ होऊ लागली आहे. पर्यायी रु ग्णालयांनी आता आपले सुरक्षा कर्मचारी तैनात केले असले तरी त्यांचे भय धुडगूस घालणाºयांना राहिलेले नाही. अशा परिस्थितीत पुन्हा डॉक्टर अथवा कर्मचाºयांवर तिºहाईत व्यक्तीमार्फत हल्ला झाल्यास डॉक्टरांनी केलेल्या आंदोलनाचा फटका रुग्णाला बसू शकतो. यात रुग्ण दगवल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.पालघर जिल्ह्यात ३ उपजिल्हारु ग्णालये असून ९ ग्रामीण रु ग्णालये आहेत. याअंतर्गत दोन्ही प्रकारची रु ग्णालये मिळून सुमारे १५ डॉक्टर्स व ७० कर्मचारी जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यसेवेची जबाबदारी पार पाडत आहेत.अशा स्थितीत गंभीर असलेल्या रु ग्णांच्या नातेवाइकांनी डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवून डॉक्टरांना किंवा कर्मचाºयावर विश्वास ठेवून आपल्या रु ग्णास चांगल्यात चांगली सेवा मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहकार्य करायला हवे. अश्यावेळी डॉक्टर, कर्मचाºयांकडून हयगय झाल्याचे आढळून आल्यास त्यांना कायदेशीर प्रक्रिये नुसार त्यांच्यावर कारवाई होण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली पाहिजेत.जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची व जिल्ह्याच्या आरोग्याची धुरा सांभाळत असलेल्या या आरोग्य कर्मचाºयांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे अत्यावश्यक असून त्यादृष्टीने राज्य शासन पातळी वरून पोलीस विभागाला सूचना देत त्यांच्या सुरिक्षतते साठी प्रत्येक दवाखान्यात पोलीस तैनात करायला हवेत अशी मागणी होत आहे.पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवूनही कोणताही प्रतिसाद नाहीजिल्ह्यातील उप-जिल्हा व ग्रामीण रूग्णालयातील पोलीस सुरक्षा बंदोबस्त काढून घेतल्याचे लक्षात येताच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत आरोग्य कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यासाठी पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास दिनांक५ एप्रिल २०१८ रोजी पाठविण्यात आलेले आहे. मात्र, आजतागायत त्या कार्यालयामार्फत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात एका रुग्णाचा नातेवाईक मोबाइलद्वारे रु ग्णालयाच्या आत शस्त्रक्रिया विभाग, प्रसूती विभागामध्ये फोटो घेत असताना तेथे उपस्थित असलेल्या डॉ. मोरे यांनी त्याला तसे करण्या बाबत हटकले. मात्र रागाच्या भरात त्या व्यक्तीने डॉक्टराशी बाचाबाची करीत त्यांना धक्काबुक्की केली. ह्या विरोधात डॉक्टरांनी पालघर पोलिसाततक्र ार दिली आहे.आम्हाला देण्यात आलेले पोलीस संरक्षण पूर्व सूचना न देता काढून घेण्यात आल्याने डॉक्टरांशी वादावादी आणि त्यांच्यावर हल्ल्या च्या घटना पुन्हा घडू लागल्या आहेत.त्यामुळे पुन्हा पोलीस संरक्षण मिळावे.- डॉ. दिनकर गावित, अधीक्षक, ग्रामीणरु ग्णालय,पालघर

टॅग्स :doctorडॉक्टर