शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जिल्हाधिकाऱ्यांना मनसेचे साकडे, शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 06:11 IST

जिल्ह्यात रिलायन्स गॅस पाईपलाईन साठी भूसंपादनाचं काम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मोबदला रिलायन्सने दिला नसल्याची जाणीव

पालघर : रिलायन्स गॅस पाईप लाईन आणि कर्म ब्रह्मांड गृहप्रकल्पाच्या व्यवस्थापकांकडून सर्वसामान्य जनतेची झालेली आर्थिक फसवणूक तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर येथे सुरू करणे या विषयावर मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखेंच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाºयाची भेट घेऊन तातडीच्या कारवाईची मागणी केली.

जिल्ह्यात रिलायन्स गॅस पाईपलाईन साठी भूसंपादनाचं काम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मोबदला रिलायन्सने दिला नसल्याची जाणीव डॉ. नारनवरे यांना शिष्टमंडळाने करून दिली. जमिनीच्या मूल्यांकनाच्या चार पट दर शेतक-यांना देण्याचे केंद्र सरकारचे धोरण असतांना देखील ते पायदळी तुडवून शेतक-यांची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात केली गेलेली आहे असा आरोप करून शेतकºयांनी विरोध केला तर पोलीस बळाचा वापर करु न, ही पाईपलाईन टाकण्याचं काम हुकूमशाही पद्धतीने सुरुच असल्याचा दावा शिष्टमंडळाने केला. या विषयावर ताबडतोब निर्णय घेऊन, बाधित संबंधित शेतकर्यांना न्याय द्यावा अशी ताठर भूमिका शिष्टमंडळाने घेतल्याने, येत्या आठ दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल असे नारनवरे यांनी आश्वस्त केले.केळवे रोड येथील बहुचर्चित कर्म ब्रह्मांड विकासकांकडून ग्राहकांना भुलविणाºया जाहिराती देऊन भुरळ पाडली आणि त्याच ग्राहकांकडून गृहप्रकल्प उभारण्याच्या नावाखाली आगाऊ रक्कम व प्रत्येक महिन्याला उरलेल्या किमतीचा सम हप्ता घेऊन करोडो रु पयांची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. कष्टाने जोडलेले पैसे यात गुंतवल्यानंतर आज दोन वर्षांनंतर देखील प्रत्यक्ष जागेवर कोणतेही बांधकाम झालेलं नाही. पैसेही नाहीत व घरेही नाहीत अशी गुंतवणूकदारांची स्थिती झाल्याने चिंता व्यक्त करून मनसे शिष्टमंडळाने विकासकांवर आर्थिक अपहार प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी केली. करून फसवणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे परत करण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी केली.जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर येथे सुरू करणे गरजेचे असतांना देखील त्या बाबत प्रशासनाची भूमिका उदासीनतेची असल्याचे स्पष्ट मत मनसे शिष्टमंडळाने व्यक्त केले. पालघर जिल्ह्याचा विस्तार आणि लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याने वसई येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अपुरे पडत असल्याचे संखे यांनी नारनवरे यांच्या निदर्शनास आणून दिले.सदर चर्चेत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष भावेश चुरी, तालुकाध्यक्ष मंगेश घरत,तलासरी तालुकाध्यक्ष सुनील ईभान, पालघर शहराध्यक्ष सुनील राउत, मनविसे लोकसभाध्यक्ष धीरज गावड, महिला शहराध्यक्ष गीता संखे, मनसे पदाधिकारी शैलेश हरमळकर, सागर शिंदे, रूपेश पाटिल, उदय माने,निलिम स्ंखे,वैभव घरत,निलेश पाटील,तन्मय संखे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीRelianceरिलायन्सMNSमनसे