शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

पालघर जिल्ह्यात प्रयोगशील शेतीतून शोधली विकासवाट; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 1:07 AM

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड, आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासाठी पोषण आधारित शेतीपद्धती उपक्र म यशस्वी ठरला

अनिरुद्ध पाटील

बोर्डी : पालघर जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीआधारित आहे. त्यामुळे जिल्हा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठ यांनी एकत्रितपणे प्रयोगशील उपक्रम राबवून जिल्ह्याच्या कृषीविकासाची वाट समृद्ध केली आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एकात्मिक शेती पद्धत अवलंबली जात असून पारंपरिक भात शेती, भाजीपाला, फुलशेती, कुक्कुटपालन, शेळीपालन, फळझाडे लागवड, रोपवाटिका, गांडूळखत, मत्स्यपालन अशा उपक्रमांमुळे कृषीआधारित रोजगार निर्माण होऊ न बेरोजगारीचा बराच प्रश्न सुटला आहे.

डहाणू येथे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फेविविध उपक्र म राबवले जातात. मागील वर्षभरात जव्हार, मोखाडा यांसारख्या दुर्गम भागात कर्जत-७, कर्जत-९ या भाताच्या सुधारित जातींची प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यामुळे भाताच्या उत्पादनात ३२ टक्के तर नागली, वरी या सुधारित जातींच्या उत्पादनात ४१ टक्के वृद्धी झाली. गळीत धान्यपिकांमध्ये खुरासणी पिकाच्या फुले कारळा या जातीचे उत्पादन स्थानिक जातीच्या तुलनेत ५८ टक्के अधिक आढळले.

शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यात पारंपरिक भात शेतीसह भाजीपाला, फुलशेती, कुक्कुटपालन, शेळीपालन, फळझाडे लागवड, रोपवाटिका, गांडूळखत या घटकांचा समावेश केला आहे. तसेच सेंद्रिय पद्धतीबाबतही मार्गदर्शन केले. चिकू, नारळ, केळी आदी फळपिकांवरील कीड रोगांच्या नियंत्रणासाठी प्रात्यक्षिके घेतली. तसेच शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढण्यास भाडेतत्त्वावर अवजारे उपलब्ध झाल्याने श्रम, वेळ व पैसा वाचण्यास मदत झाली आहे.

आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासाठी पोषण आधारित शेतीपद्धती उपक्र म यशस्वी ठरला. जिल्ह्यात कृषि विज्ञान मंडळ, तालुका स्तरावर शेतकरी शास्त्रज्ञ मंच आणि ग्रामपातळीवर महिला मंडळ, शेतकरी मंडळ यांच्यामार्फत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यात आला. प्रकल्प संचालक आत्मा योजनेतून राबवलेला चारा पीक, मोगरा पिकाच्या लागवडीच्या प्रशिक्षणाचा जिल्हयातील २०० शेतकºयांना फायदा झाला. गेल्या वर्षी ८२ महिला बचतगट तयार करून महिला सबलीकरणासाठी शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण दिले. मधमाशी पालन प्रशिक्षण दिल्याने १२०० शेतकºयांना फायदा झाला. यामध्ये १२ युवक मास्टर ट्रेनर झाले.

अळंंबी लागवड, फळ रोपवाटिका या व्यवसायाचे अनुक्र मे ४० आणि ३० युवकांना प्रशिक्षित केल्याने स्वयंरोजगार निर्मिती झाली. मत्स्यशेतीचे प्रशिक्षण मिळाल्याने २० युवकांनी मत्स्यसंवर्धन करण्यास सुरुवात केली. परंपरागत कृषी योजनेमार्फत शेतकºयांचे सेंद्रिय शेती गट तयार करण्यात आले. हवामान केंद्राद्वारे आठवड्यातून दोन वेळा शेतकरी सल्ला देण्यात येत आहे. त्याचा पीक नियोजनासाठी फायदा होत आहे. शेतकºयांना माती परीक्षण करून अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे जिल्ह्यातील १५०० शेतकºयांना त्याचा फायदा झाला. आधुनिक शेती आणि पूरक व्यवसायाबाबत जिल्ह्यातील शेतकºयांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढण्यास कृषिविज्ञान केंद्र महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे प्रमुख शास्त्रज्ञ विलास जाधव म्हणाले.शहरांची भाजीपाल्याची गरज केली पूर्ण जिल्ह्यातील १२१ शेतकºयांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटावेटर मिळाले. ९२ जणांना शेततळे दिल्याने पाण्याचा प्रश्न सुटला. जमीन आरोग्यपत्रिका पथदर्शी प्रकल्प, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम राबविले.कृषी विकासाचा पाया मजबूत झाल्यानेच लॉकडाऊन काळात शेतकरी गटाने पिकवलेला कृषी माल निर्यात करून महापालिका क्षेत्रातील भाजीपाल्याची निकड पूर्ण केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी दिली. 

टॅग्स :Farmerशेतकरी