शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

निसर्गाच्या ‘दाना’ला कोरोनाच्या ग्रहणामुळे आदिवासी बांधवांमध्ये निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:35 PM

बाजारात रानमेवा दाखल, पण ग्राहकच नाहीत 

- राहुल वाडेकरलोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : बदलत्या हवामानाचा फटका बसूनही हिरव्यागार आंबट कैऱ्या विक्रमगड, जव्हार तसेच मोखाड्यातील बाजारांत दाखल झाल्या आहेत. मात्र, निसर्गाने दिलेल्या ‘दाना’ला कोरोनाचे ग्रहण लागल्याने संचारबंदीमुळे बाजारात ग्राहकच येत नसल्याने रानमेवा विक्रीसाठी घेऊन आलेल्या आदिवासींमध्ये निराशा पसरली आहे.

आंबा तसेच काजूगर या पिकांवर हवामानाचा मोठा परिणाम होत असल्याने गेल्या दोन-चार वर्षांत आंबा पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात बाजारात येणे कठीण झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत १०० रुपये किलो दराने मोठी कैरी तर छोटी कैरी साठ रुपये दराने विकण्यात येत आहे, तर काही दिवसांपासून ओले काजूगरही बाजारात दिसू लागले आहेत. त्यामुळे आदिवासींना थोड्याफार प्रमाणात का होईना रोजगार उपलब्ध होऊन अर्थार्जनाचा लाभ होत आहे. परंतु, संचारबंदीमुळे त्यांचाही हिरमोड होत आहे.

विक्रमगड, जव्हार, मोखाडा हे तीन तालुके आदिवासीबहुल असल्याने येथे फक्त शेती हेच उपजीविकेचे साधन आहे. एमआयडीसी नसल्याने कारखानदारी व मोठा उद्योगधंदा वा रोजगार देणारे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने येथीन आदिवासींना निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. त्याप्रमाणे जंगल संपत्तीवर आपली उपजीविका करत कुंटुंबाची गुजराण करावी लागते. त्यामुळे उन्हाळ्यात आंबा, काजू, करवंद, जांभळे, फणस तर पावसाळ्यात कर्टुली, रानभाजी, शेवळे यांची बाजारात विक्री करून उदरनिर्वाह करावा लागतो. मात्र, सध्या कोरोनामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. बाजारात आंब्यांच्या कैऱ्यांना बाहेरील चाकरमान्यांकडून जास्त प्रमाणात मागणी असते. शिवाय स्थानिक नागरिकही खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. आंबा कैरीचे लोणचे तयार करण्यासाठी अनेक गृहिणी कैऱ्या खरेदी करतात, मात्र यंदा पुन्हा कोरोनाने आदिवासींना निराश केले आहे.

नैसर्गिक पिकांवर उपजीविकाnजव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील प्रत्येक आदिवासींच्या घरासमोर दोन-चार आंब्यांची व काजूची झाडे हमखास असतातच, तर या फळांच्या बागाही या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत.  nजव्हारच्या धाब्यांवर स्पेशल थाळीत काजूगरांची भाजी ऑर्डरनुसार तयार करून दिली जाते. या नैसर्गिक पिकांवर आदिवासी मात्र आपली उपजीविका करत रोजगार मिळवत आहेत. nभेळ विक्रेतेही कैरीची खरेदी करतात. कैरीबरोबर ओले काजूगर बाजारात येत आहेत. २५० ते ३०० रुपये किलो दराने काजूगरांची विक्री होत आहे.