शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

पालघरमधील मतमोजणीला स्थगिती देण्याची मागणी, बळीराम जाधव यांचे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 06:59 IST

पालघर लोकसभा मतदार संघात एका वर्षभरात १ लाख ५४ हजार नवीन मतदार वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. काही विधानसभा मतदार संघात एका दिवसात सुमारे ३०० मतदारांची नोंद करण्याचा विक्र म नोंदविण्यात आला आहे.

- हितेन नाईकपालघर - पालघर लोकसभा मतदार संघात एका वर्षभरात १ लाख ५४ हजार नवीन मतदार वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. काही विधानसभा मतदार संघात एका दिवसात सुमारे ३०० मतदारांची नोंद करण्याचा विक्र म नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या विक्रमाबाबत साशंकता व्यक्त करून बविआचे उमेदवार व माजी खासदार बळीराम जाधव यांनी नवीन मतदारांची नोंद कोणत्या विधानसभा क्षेत्रात झाली, त्यांनी कुठे मतदान केले याची माहिती मागितली असून जोपर्यंत माहिती मिळत नाही तोपर्यंत २३ मेच्या मतमोजणीस स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे.सोमवारी माजी खासदार बळीराम जाधव, बविआचे ज्येष्ठ नेते प्रवीण राऊत, जिल्हाध्यक्ष काशीनाथ पाटील आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे यांची भेट घेतली. नवीन मतदारांची नोंदणी करताना त्यांनी बीएलओ मार्फत तपासणी व पडताळणी होणे आवश्यक असते. काही विधानसभा मतदारसंघांमध्ये दिवसाला ३०० पेक्षा अधिक मतदारांची सरासरी दररोज नोंदणी केली गेली असून याबद्दल मला शंका वाटते. यामुळे नव्याने नोंदविल्या गेलेल्या मतदारांच्या कागदपत्राची उच्चस्तरीय समितीने पडताळणी करावी, अशी मागणी माजी खासदार बळीराम जाधव यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली.हे नवमतदार नेमके कोणत्या विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांमध्ये नोंदले गेले, तसेच किती मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले याची माहिती द्यावी. नवीन मतदार नोंदणी तसेच यंदा लोकसभा निवडणुकीत झालेले वाढीव मतदान यांच्यामध्ये मोठा गैरप्रकार झाल्याची शक्यताही यांनी व्यक्त केली. जोपर्यंत बुथनिहाय मतदानासंदर्भात माहिती मिळत नाही तोपर्यंत २३ मे रोजी होणाºया मतमोजणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करत जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडले आहे. संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत त्यांना माहिती उपलब्ध झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.याचिका केली दाखलपालघर नागरपरिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाची नोंद करण्यात आल्याची पुराव्यासह माहिती शिवसेनेचे तत्कालीन नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, गटनेते कैलास म्हात्रे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन पाटील आदींनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयासह निवडणूक आयोगाकडे दिली होती. मात्र त्याची दखल घेण्यात न आल्याने त्यांनी न्यायालयीन लढा देण्याचे ठरवीत याचिकाही दाखल केलेली आहे. या बोगस मतदारांसंदर्भातील तक्र ारी केल्यानंतर त्याची मागितलेली माहितीही दिली जात नसल्याने प्रशासनातील काहींचा यात समावेश असल्याची शंका पालघर शहरातून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalghar-pcपालघर