शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

तारापूर एमआयडीसीत चिमण्यांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:59 IST

समाज कंटकानी पुरावे केले नष्ट : प्रदूषण नियंत्रणने फक्त पाण्याचे नमुने गोळा केले

- पंकज राऊत

बोईसर : तारापूर एमआयडीसीमध्ये एका कारखान्याच्या बागायतीच्या झाडांजवळ असंख्य चिमण्या मृत्युमुखी पडल्या असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला. मात्र चिमण्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण शोधण्यासाठी त्या ताब्यात घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागाशी वेळीच समन्वय न साधल्याने त्यांना घटनास्थळावरून कुणीतरी गायब केल्याची माहिती पुढे येत आहे.

शुक्र वार (दि.१२) सकाळी टी झोन मधील नाल्यामधून मोठ्या प्रमाणात वाहत जाणाºया पिवळ्या रंगाच्या रासायनिक सांडपाण्यास उग्र वास येत होता तर शेजारच्या बागेमध्ये २१ चिमण्या वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू पावलेल्या होत्या तर, काही मृत्यूशी झुंज देत होत्या. तरफडणाºया या चिमण्यांना पाणी पाजून वाचिवण्याचा प्रयत्न करणाºया येथील टपरी चालकाला त्या उग्र वासाचा त्रास होऊन चक्कर आल्यासारखे जाणवत होते.

शुक्रवारी या संदर्भातील तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणत: अकरा वाजण्याच्या सुमारास प्रदूषण नियंत्रण चे क्षेत्र अधिकारी अमित लाटे यांनी तक्र ारदारांच्या समक्ष घटनेचा पंचनामा करून नाल्यातील उग्र सांडपाण्याचे नमुने पृथ्यकरणासाठी घेतले मात्र, त्या मृत चिमण्या तपासणीसाठी एमपीसीबी कडे सुविधा नसल्याचे कारण सांगून त्या तपासणीसाठी घेण्यात आल्या नाहीत किंवा त्यांनी संबंधित विभागाला वेळीच कळविले नसल्याचे समजते.

 

दफ्तर दिरंगाईमुळे पुरावे झाले नष्टया संदर्भात पालघरचे तहसीलदार महेश सागर यांना सोशल मीडियावर व्हायरल मेसेज वरु न या घटनेची माहिती मिळताच त्यांनी प्रथम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली व पंचनामा केलेल्या संबंधित अधिकाºयांकडून घटनास्थळाचा पत्ताही मिळवून पालघरच्या गटविकास अधिकाºयांमार्फत बोईसरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी ए. बी. कोचर यांना दुसºया दिवशी म्हणजे शनिवारी (दि.१३) घटनास्थळी पाठविले. मात्र, तेथे डॉ. कोचर यांना मृत चिमण्या न आढळल्याने त्यांना हात हलवत परतावे लागले. यामुळे चिमण्या विषारी वायू मुळे की अन्य कोणत्या कारणाने मृत पावल्या हा प्रश्न आता अधांतरीच राहणार असून हा पुरावा नष्ट करण्याचा प्रकार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpollutionप्रदूषण