शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

वादळामुळे डहाणूतील ५२९ कुटुंबे उघड्यावर; आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पाठवले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:00 AM

तालुक्यात शुक्र वारी अचानक झालेल्या वातळी वाऱ्यामुळे शेनसरी, गांगोडी, बापुगाव, धानिवरी, दह्याळे, चरी, पावन येथील तब्बल ५२९ घरांचे नुकसान झाले असुन आदिवासी कुटुंब उघड्यावर आली आहेत.

डहाणू : तालुक्यात शुक्र वारी अचानक झालेल्या वातळी वाऱ्यामुळे शेनसरी, गांगोडी, बापुगाव, धानिवरी, दह्याळे, चरी, पावन येथील तब्बल ५२९ घरांचे नुकसान झाले असुन आदिवासी कुटुंब उघड्यावर आली आहेत.घरांच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र मदतीसाठी अद्याप शासनाचे आदेश प्राप्त झाले नसल्याने आपत्तीग्रस्त कुटुंबांना सरकारी मदतीची प्रतिक्षा आहे. पावन येथिल शाळेची पडझड झाली असून हजारो हेक्टर भातशेतीची नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असुन शेतीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.सात दिवसांपासून गावात अंधारवादळामुळे वीजेचे खांब जमीनदोस्त झाल्यामुळे वीज वाहिन्या नादुरु स्त झाल्या आहेत. त्यामुळे धरमपुर, बापूगाव, बांधघर, निंबापूर, गांगोडी शेनसरी, सायवन, किन्हवली, दाभाडी दह्याळे वेहाळी रामपूर आदी दहा गावात शुक्र वारपासून तब्बल ७ दिवसापासुन वीज नसल्याने गावकºयांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे.डहाणूत निर्माण झालेल्या आपत्तीमुळे झाडे उन्मळुन तसेच वीज खांब कोलमडल्याने वीज वाहीन्याचे कनेक्शन तुटले आहेत. वीजे अभावी पाण्याची सोय नसल्याने बापुगाव आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याची वेळ शाळा व्यवस्थापनावर ओढवली आहे.पाच दिवसापासुन वीज नसल्याने वीज कंपनीबाबात ग्रामस्थांत संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार