शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

डहाणूत राष्ट्रवादीचा वरचष्मा; तर शिवसेनेची भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 12:12 AM

पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत डहाणूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जि.प. आणि पंचायत समिती या दोन्ही आघाडीवर लढताना दबदबा कायम राखत पहिला क्रमांक राखला.

अनिरुद्ध पाटील/शौकत शेख ।डहाणू/बोर्डी : पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत डहाणूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जि.प. आणि पंचायत समिती या दोन्ही आघाडीवर लढताना दबदबा कायम राखत पहिला क्रमांक राखला. शिवसेनेचा आलेख चढता तर भाजप आणि माकपला अपेक्षेप्रमाणे यश राखता आले नाही. बहुजन विकास आघाडीला दोन्हीही ठिकाणी खातेही उघडता न आल्याने ती भुईसपाट झाली. तालुक्यातील गटाच्या तेरा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी $४, शिवसेना ३, काँग्रेस १ आणि अपक्ष १ असे उमेदवार निवडून आले. तर २६ गणांसाठी राष्ट्रवादी ९, शिवसेना ८, भाजप ७ आणि माकपला २ जागेवर विजय मिळविता आला.जिल्हा परिषदेच्या डहाणू गटात यावेळी एका गटाची वाढ होऊन ही संख्या १३ झाली. मागील निवडणुकीत गटात १२ पैकी भाजपचे सर्वाधिक ५ उमेदवार निवडून आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस, माकप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी २ तर काँग्रेसचा १ उमेदवार निवडून आला होता. चौदाव्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला एकटे पाडून काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि माकपने आघाडी करून माकपच्या आमदाराला निवडून आणले. महाआघाडीची ही खेळी राष्ट्रवादीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लढवित असल्याचा प्रत्यय या निवडणुकीत देत गटाच्या ४ आणि गणाच्या २६ पैकी सर्वाधिक ९ जागा निवडून आणल्या. हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा विजय असून माकपने सहकार्य न करता विरुद्ध मतदान केले, तर काही ठिकाणी उमेदवार उभे करून एक प्रकारे बिघाडी केल्याची प्रतिक्रिया या जिल्हा परिषद सदस्य आणि सायवन गटाचे विजयी उमेदवार काशिनाथ चौधरी यांनी दिली.विधानसभा निवडणुकीप्रमाणेच भाजपची पकड यावेळीही ओसरताना दिसली. गतवेळेला त्यांच्या गटाच्या ५ जागा होत्या. आता गटात एकाने आणि गणात तीन जागांची घट झाली. काँग्रेसला पूर्वीसारखेच गटाकरिता एकच उमेदवार निवडता आला तर गणासाठी आताही खाते उघडता आले नाही. बहुजन विकास आघाडीला दोन्ही प्रकारात एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. मागच्या निवडणुकीत गटातील २ आणि गणाच्या ४ जागा निवडून आणताना पंचायत समितीचे दुसऱ्या टर्मचे उपसभापती शैलेश करमोडा यांच्या रुपाने मिळवले होते. करमोडा यांनी जिल्हा परिषदेच्या ओसरविरा गटातून विजेतेपद मिळविले. माकपला अती आत्मविश्वास भोवताना दिसला. आमदारकी जिंकली असली तरी जिल्हा परिषदेची एकही जागा जिंकता आली नसून पंचायत समितीच्या मागच्या वेळेप्रमाणेच २ जागा राखता आल्या.दरम्यान, शिवसेनेचा चढता आलेख पहायला मिळाला. गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेची एकही जागा त्यांच्या नावावर नव्हती तर पंचायत समितीच्या २ जागा होत्या. यावेळी गटाच्या ३ आणि गणाच्या ८ जागा निवडून आणत दुसºया क्र मांकाचा पक्ष ठरला आहे. धामणगाव गटात सतीश सीताराम करबट हा एकमेव उमेदवार निवडून आला.