शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

CoronaVirus गोर गरीबांसाठी मोफत धान्य; किराना दुकानदाराचे समाजभान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 17:01 IST

शहर लॉकडाऊन झाल्यापासून हातावर पोट असणाऱ्या गरीबांचे मोठे हाल झाले होते.

प्रतिक ठाकुर 

विरार : करोनामुळे शहर लॉकडाऊन झाल्यापासून गोरगरीब जनतेवर उपासमारीचे वेळ आली आहे. मात्र, या गोरगरीबांचा कुणीतरी वाली असतोच असा प्रत्यय या वृत्तात येत आहे. कारण वसईच्या एका गुप्ता कुटुंबीयांनी आपल संपूर्ण दुकान या गोर-गरिबांसाठी खुले केले आहे. या दुकानाच्या माध्यमातून गुप्ता कुटुंबीय गरिबांना मोफत धान्य देत आहे. यामुळे असंख्य गरजूंची एका दिवसाची भूक भागत असून गरिबांना मोठा दिलासा मिळत आहे. 

 

शहर लॉकडाऊन झाल्यापासून हातावर पोट असणाऱ्या गरीबांचे मोठे हाल झाले होते. त्यामुळे हे नागरिक भुकेल्या पोटी पायीच आपल गाव गाठण्यासाठी महामार्गावर निघाले आहेत. याच महामार्गावर ही परिस्थिती वसईच्या कोल्ही चिंचोटी येथे असलेल्या किराना दुकानातून दुकानदार हरीश्चंद्र गुप्ता पाहत होते. त्यांना ही कामगाराची परिस्थिती पाहवली नाही आणि त्यांनी या सर्व कामगारांना मोफत धान्यसाठा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुप्ता आता गरीब गरजूं व स्थलांतरीत कामगारांना  विनामूल्य धान्यवाटप करत आहेत. तसेच पाण्याची बाटली,धान्य देऊन गरज गरज पडल्यास निवाराही देण्याची व्यवस्था ते करत आहेत.त्यांच्या या समाज कार्यात त्यांचे पाच ही मुले मोलाचा हातभार लावत आहेत. 

 

विशेष म्हणजे या भीषण परिस्थितीत एकीकडे इतर दुकानदार जास्तीचे नफा कमावण्यासाठी चढ्या दराने वस्तू विक्री करत आहेत, तर दुसरीकडे मात्र दुकानदार हरीश्चंद्र गुप्ता सारखी माणसे आहेत जी समाजभान राखत गरिबांना खुल्या हाताने मदत करत आहेत. त्यामुळे समाजात गुप्ता यांनी समाजकार्याचा अनोखा पायंडा पाडला आहे. याचे अनुकरण प्रत्येकाने केल्यास कुणीही गरीब-गरजू भुका राहणार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस