शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : पादचाऱ्यांना भरधाव टेम्पोने उडवले, चार जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 12:19 IST

लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर हातावर पोट असलेले अनेक मजूर आपल्या गावाच्या दिशेने पलायन करू लागले आहेत.

विरार -  जगभरात वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दरम्यान, लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर हातावर पोट असलेले अनेक मजूर आपल्या गावाच्या दिशेने पलायन करू लागले आहेत. मात्र जाण्यासाठी कुठलेही वाहन उपलब्ध नसल्याने अनेक जण पायपीट करत आहेत. दरम्यान, पायपीट करत निघालेल्या काही जणांना भरधाव टेम्पोने उडवल्याने भीषण अपघात झाला असून, या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरारजवळ झाला.  लॉकडाऊनमुळे सर्व प्रवासी साधने बंद करण्यात आली आहेत. तसेच जिथे असाल तिथे राहा असे आवाहन लोकांना करण्यात येत आहे. मात्र तरीही अनेक लोक चालत गावाच्या दिशेने निघाले आहेत. विरारमध्ये या मजुरांची हीच घरी जाण्याची ओढ जीवावर बेतली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पायी निघालेल्या 7 जणांना एका टेम्पोने उडवले. या भीषण अपघात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व प्रवासी देशात संचारबंदी सुरू असल्याने आपल्या घरी गुजरातच्या दिशेने जात होते. गुजरातकडील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आले. परत वसईच्या दिशेने येत असताना महामार्गावरील विरार हद्दीत भारोल परिसरात  एका भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने यांना जोरदार धडक दिली.या अपघातातील 2 जणांची ओळख पटली असून 5 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. ओळख पेटलेल्यांपैकी एकाचे नाव कल्पेश जोशी (32) तर दुसऱ्याचे नाव मयांक भट (34) असे आहे.  

टॅग्स :AccidentअपघातCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस