शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

सततच्या भूकंपाने हादरतायेत गावे, प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्याप ढिम्मच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 06:08 IST

भारतीय हवामान विभागाच्या संकेत स्थळावर ५.२० मिनिटाच्या ३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली असून इतर नोंदी गुजरात सेस्मॉलॉस्टिक रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या संकेत स्थळावर नोंदविण्यात आल्या आहेत

तलासरी : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुके गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून सारखे भूकंपाच्या धक्क्याने हादरत आहेत. गुरुवारी ३० मे रोजी पहाटे ५.२० ला भूकंपाच्या ३.० रिश्टर स्केलच्या धक्क्याने हादरली. त्यानंतर सकाळी ९.०३ वाजेता २.२ तर १०.५९ मिनिटांनी २.८ रिश्टर स्केलचा धक्के बसल्याची नोंद झाली आहे. तसेच शुक्रवार सकाळीही जोरदार भूकंपाचे पाठोपाठ धक्के बसले. प्रत्येक आठवड्याला असे तीन ते चार धक्के सौम्य व मध्यम स्वरूपाचे बसत असल्याने जिल्ह्यावरील भूकंपाचे सावट अद्यापही संपलेले नाही. अधून मधून बसणाऱ्या जोरदार भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमधील भीतीचे वातावरण कायम आहे. 

भारतीय हवामान विभागाच्या संकेत स्थळावर ५.२० मिनिटाच्या ३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली असून इतर नोंदी गुजरात सेस्मॉलॉस्टिक रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या संकेत स्थळावर नोंदविण्यात आल्या आहेत. डहाणू आणि तलासरी तालुक्यात नोव्हेंबर महिन्यापासून भूकंपाचे सत्र सुरू आहे. आतापर्यंत ४.३ आणि ४.४ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाच्या सर्वाधिक नोंदी नोंदविण्यात आल्या आहेत. तरी आतापर्यंत शेकडो मध्यम व सौम्य स्वरूपाच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. डहाणू आणि तलासरी परिसरात हवामान विभाग दिल्ली यांच्यामार्फत ३ आणि हैद्राबाद सेस्मॉलॉजिस्ट रिसर्च सेंटर मार्फत ६ अशी ९ भूकंप मापक यंत्रे कार्यान्वित करण्यात आली असून नोंदीच्या आधारे भूगर्भीय हालचालींचे विश्लेषण करण्यात येत आहे. परंतु भूगर्भीय हालचालींचा नोंदी करणाºया तज्ञांना अद्यापही भूकंपाचा केंद्र बिंदू मिळू शकलेला नाही. तज्ज्ञांच्या मते भूकंपाचा केंद्र बिंदू नेहमी बदलत असतो.

प्रशासनाकडून परिसरातील नागरिकांमध्ये जागृती व करावयाच्या सुरक्षेच्या उपाय यांची जनजागृती केली आहे. परंतु वारंवार भूकंपाचे धक्के बसूनही शासकीय यंत्रणा ढिम्मच असल्याचे जाणवत आहे. कारण वेळोवेळी होणाºया भूकंपाच्या नोंदीही संकेत स्थळावर नोंदविण्यात येत नसल्याने सेस्मॉमीटरमधील डेटा घेण्यात येतो की नाही, असा संशयही नागरिकात व्यक्त होत आहे.

प्रशासनाची उदासीनताया भूकंपाच्या धक्यांबाबत प्रशासक नेहमीच उदासीनता दाखवत आले आहे. त्यामुळे योग्य ती माहिती तत्परतेन न देण्यापासून ते चुकीची माहिती देणे, माहिती दडवून ठेवने असे प्रकार प्रशासनाकडून नेहमीच घडत आलेले आहेत. भूकंप मापक यंत्रांची देखभाल आणि परिचलन याकडेही त्याचे लक्ष नसते. हे काम म्हणजे आपल्यावर येऊन पडलेली नसती आफत आहे. असा त्याचा नूर असतो.

टॅग्स :Earthquakeभूकंप