शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या भूकंपाने हादरतायेत गावे, प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्याप ढिम्मच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 06:08 IST

भारतीय हवामान विभागाच्या संकेत स्थळावर ५.२० मिनिटाच्या ३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली असून इतर नोंदी गुजरात सेस्मॉलॉस्टिक रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या संकेत स्थळावर नोंदविण्यात आल्या आहेत

तलासरी : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुके गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून सारखे भूकंपाच्या धक्क्याने हादरत आहेत. गुरुवारी ३० मे रोजी पहाटे ५.२० ला भूकंपाच्या ३.० रिश्टर स्केलच्या धक्क्याने हादरली. त्यानंतर सकाळी ९.०३ वाजेता २.२ तर १०.५९ मिनिटांनी २.८ रिश्टर स्केलचा धक्के बसल्याची नोंद झाली आहे. तसेच शुक्रवार सकाळीही जोरदार भूकंपाचे पाठोपाठ धक्के बसले. प्रत्येक आठवड्याला असे तीन ते चार धक्के सौम्य व मध्यम स्वरूपाचे बसत असल्याने जिल्ह्यावरील भूकंपाचे सावट अद्यापही संपलेले नाही. अधून मधून बसणाऱ्या जोरदार भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमधील भीतीचे वातावरण कायम आहे. 

भारतीय हवामान विभागाच्या संकेत स्थळावर ५.२० मिनिटाच्या ३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली असून इतर नोंदी गुजरात सेस्मॉलॉस्टिक रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या संकेत स्थळावर नोंदविण्यात आल्या आहेत. डहाणू आणि तलासरी तालुक्यात नोव्हेंबर महिन्यापासून भूकंपाचे सत्र सुरू आहे. आतापर्यंत ४.३ आणि ४.४ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाच्या सर्वाधिक नोंदी नोंदविण्यात आल्या आहेत. तरी आतापर्यंत शेकडो मध्यम व सौम्य स्वरूपाच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. डहाणू आणि तलासरी परिसरात हवामान विभाग दिल्ली यांच्यामार्फत ३ आणि हैद्राबाद सेस्मॉलॉजिस्ट रिसर्च सेंटर मार्फत ६ अशी ९ भूकंप मापक यंत्रे कार्यान्वित करण्यात आली असून नोंदीच्या आधारे भूगर्भीय हालचालींचे विश्लेषण करण्यात येत आहे. परंतु भूगर्भीय हालचालींचा नोंदी करणाºया तज्ञांना अद्यापही भूकंपाचा केंद्र बिंदू मिळू शकलेला नाही. तज्ज्ञांच्या मते भूकंपाचा केंद्र बिंदू नेहमी बदलत असतो.

प्रशासनाकडून परिसरातील नागरिकांमध्ये जागृती व करावयाच्या सुरक्षेच्या उपाय यांची जनजागृती केली आहे. परंतु वारंवार भूकंपाचे धक्के बसूनही शासकीय यंत्रणा ढिम्मच असल्याचे जाणवत आहे. कारण वेळोवेळी होणाºया भूकंपाच्या नोंदीही संकेत स्थळावर नोंदविण्यात येत नसल्याने सेस्मॉमीटरमधील डेटा घेण्यात येतो की नाही, असा संशयही नागरिकात व्यक्त होत आहे.

प्रशासनाची उदासीनताया भूकंपाच्या धक्यांबाबत प्रशासक नेहमीच उदासीनता दाखवत आले आहे. त्यामुळे योग्य ती माहिती तत्परतेन न देण्यापासून ते चुकीची माहिती देणे, माहिती दडवून ठेवने असे प्रकार प्रशासनाकडून नेहमीच घडत आलेले आहेत. भूकंप मापक यंत्रांची देखभाल आणि परिचलन याकडेही त्याचे लक्ष नसते. हे काम म्हणजे आपल्यावर येऊन पडलेली नसती आफत आहे. असा त्याचा नूर असतो.

टॅग्स :Earthquakeभूकंप