शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

वसई विरार शहरात सफाई कामगारांकडून हाताने मैला स्वच्छ करून घेण्यासाठी पूर्ण बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 16:01 IST

तक्रारी आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार, महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आदेश

आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क

वसई:वसई विरार शहरात सफाई कामगारांकडून कुठल्याही नागरिकांच्या स्वतः ची संकुले, इमारती किंवा वाणिज्य आदी ठिकाणची त्यांच्या हाताने मैला व मल :जल स्वच्छ करण्यासाठी शासनाने पूर्णपणे बंदी घातली असून या संदर्भात शहरात कुठेही तसे आढळुन आल्यास अथवा महापालिका प्रशासनाकडे तश्या तक्रारी आल्यास संबंधितावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे आदेश आता वसई विरार शहर महापालिकेच्या  घनकचरा व्यवस्थापन विभागाने काढले असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमत ला दिली.

राज्य शासनाच्या सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज या कार्यक्रमाअंतर्गत शहरांतील  नागरिकांना इशारा देत  हाताने मैला व मलःजल वाहिन्या (भुयारी गटार) सफाई करणेबाबत शासनाने पूर्णतः बंदी आणली आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही नागरिकांनी त्यांच्या इमारतीच्या, घराच्या किंवा वाणिज्य इमारतीच्या मैला टाकी (सेप्टि टॅंक) सफाई करणेकरिता कोणत्याही खाजगी सफाई कामगारांकडून मानवीय रित्या सफाई करून घेऊन मैला टाकी यांची मानवीयरित्या सफाई करणे धोकादायक आहे.

यामुळे संबंधित कामगाराचे प्राण जाऊ शकतात. म्हणूनच अशा प्रकारचे काम करताना कोणी आढळल्यास संबंधित काम करून घेणाऱ्या तसे काम करणाऱ्या नागरिक अथवा संस्था,संघटना यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. ‘असे महापालिका प्रशासनाने म्हंटलं आहेदरम्यान हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुर्नवसन अधिनियम, २०१३’ या कायद्यान्वये पहिल्यांदा गुन्हा केल्यास २ वर्षांपर्यंत तुरुंगवास अथवा २ लाख रुपये दंड अथवा दोन्हीही शिक्षा संबंधित गुन्हेगारास होऊ शकते. 

तसेच सदर गुन्हा पुन्हा घडल्यास संबंधितावर ५ वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा ५ लाख रुपये दंड अथवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते. तसेच मानवीय रित्या मैला टाकीची सफाई करून घेताना कोणतीही जीवित हानी झाल्यास संबंधित मृत सफाई कामगाराच्या कुटुंबाला १० लाख नुकसान भरपाई द्यावी लागेल.

गुन्हे टाळा व यांत्रिक पद्धतीने टाकी स्वच्छ करा

सदर बाब गंभीर असून संबंधित होणारा अपाय टाळण्यासाठी वसई - विरार शहर महानगरपालिकेद्वारे मैला टाकी यांची यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठी प्रत्येक प्रभागात १ या प्रमाणे ९ मैला गाड्या (सक्शन मशिन) कार्यरत केलेल्या आहेत. तसेच मलःजल वाहिन्या (भुयारी गटार) साफ करणेसाठी सक्शन कम जेटींग मशीनचा वापर केला जात आहे. 

नागरिकांच्या तक्रारी नोंदविणे व निराकरण करणेकरिता  महानगरपालिकेने विविध माध्यम उपलब्ध केलेले आहेत. यामध्ये ‘१४४२०’ ही टोल फ्री हेल्प लाईन सेवा सुरु करण्यात आलेली आहे. तसेच ८४४६६२२२८० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर नागरिक तक्रार नोंदवू शकतात. महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट https://vvcmc.in व V-click अॅप वर तक्रार नोंदवू शकतात. तसेच केंद्र शासनाच्या MoHUA Swachhta App वर तक्रार नोंदवू शकतात. सदर तक्रारीचे निराकरण करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वतंत्र दल स्थापित केलेले आहे. तसेच या संपुर्ण कार्यप्रणाली वर नियंत्रण ठेवण्यासाठी (ERSU) स्वछता शिघ्रकृती दलाची स्थापना मनपाद्वारे केली आहे.

नागरिकांनी काय करावे व काय करु नये (Do’s and Don’ts) याची माहिती खालीलप्रमाणे.

१. मैला टाकी व भुयारी गटारांच्या तक्रार नोंदविण्यासाठी १४४२० या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. अथवा https://vvcmc.in या अधिकृत वेबसाईट/ V-click App/ MoHUA Swachhta App वर तक्रार नोंदवावी. 

२. मैला टाकी आणि भुयारी गटारांची सफाई मनपाद्वारे किंवा मनपाने अधिकृत केलेल्या सफाई पुरवठादारा कडून करून घ्यावी.

३. दर ३ वर्षातून एकदा मैला टाकी ची सफाई करणे बंधनकारक आहे.

४. मैला टाकी आणि भुयारी गटारांची सफाई अनधिकृत पुरवठादाराकडून करून घेऊ नये. तसेच मानवीय (अयांत्रिकी) पद्धतीने सफाई करून घेऊ नये. असे केल्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काम करणारे अथवा करून घेणारे यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे ही महापालिका प्रशासनाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार