शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

विरारमध्ये रंगला सामुदायिक विवाहसोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:36 PM

जीवदानी देवी संस्थानाकडून पुढाकार; ७० जोडप्यांना भावी जिवनासाठी दिल्या शुभेच्छा

वसई : विरार येथील श्री जीवदानी देवी संस्थानाच्यावतीने गुरूवारी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ७० जोडप्यांना लग्नाच्या बेडीत अडकवून भावी जिवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय ठाणे यांच्या सहकार्याने या सामूदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यात वसईतील २५,तलासरी ३३,विक्र मगड व जव्हार येथील १० आदिवासी समाजातील जोडप्यांचा समावेश होता.तसेच यातील १२ जोडपी इतर समाजातील होती. जिल्हातील गरीब शेतकऱ्यांना आपल्या मूला- मुलींची लग्ने खर्चाची गोळाबेरीज बसविण्यासाठी कधी कर्ज तर कधी जमीन गहाण ठेवून व्यवस्था करावी लागते. अनेकदा कर्जापोटी शेतकºयांच्या आत्महत्या होत असल्यामुळे त्यांना मदतीचा हात म्हणून त्यांच्या विवाहयोग्य मूला-मूलींचे सामूहिक विवाह लावण्यासाठी धर्मदाय संस्थांच्या आवाहनानुसार हा पुढाकार घेण्यात आला होता. नवदांपत्यांना आशिर्वाद देण्यासाठी ठाणे धर्मादाय आयुक्त अशोक चुरी, वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर, शिवसेना डोंबिवलीचे आमदार सुभाष भोईर, नालासोपाºयाचे आमदार क्षितीज ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, जीवदानी देवी ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र गावड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशीनाथ पाटील, वसईचे तहसीलदार किरण सुरवसे आदि मान्यवर उपस्थित होते.नवदांपत्यांना दिले आहेरसामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या जोडप्यांना संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्या. त्यात वधूला १ ग्रॅमचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, वधु-वरांना कपडे, संसार उपयोगी भांडी व देवघरातील निरांजन आदि वस्तू देण्यात आल्या.हा उपक्रम ट्रस्ट दरवर्षी राबविणार आहे. एखादी संस्था अगर वैयिक्तक लग्न सोहळ्यासाठी गडा खाली असणारे ट्रस्टचे मंगल कार्यालय अल्पदरात उपलब्ध करून दिले जाईल.- पंकज ठाकूर, उपाध्यक्ष, जिवदानी ट्रस्ट

टॅग्स :marriageलग्नVasai Virarवसई विरार