शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

थंडी वाढल्याने डहाणूत आंबा कलमे मोहरण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:14 PM

पोषक वातावरण : कृषी विभाग मोहर संवर्धन कार्यक्र म आखणार

अनिरु द्ध पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू/बोर्डी : तालुक्याील वातावरणात थंडीची तीव्रता वाढत असल्याने आंबा कलम मोहरण्यास प्रारंभ झाला आहे. लांबलेला पाऊस आणि चक्रीवादळाच्या प्रभावाने मोहोरावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत असताना अनुभवी बागायतदारांनी डिसेंबरच्या मध्यावर मोहर येण्याची शक्यता वर्तवली होती. त्याचबरोबर कृषी विभागाकडून ‘मोहर संवर्धन’ कार्यक्रमाची आखणी केली जाणार आहे. दरम्यान, यंदाही पोषक वातावरण मिळाल्यास ३० एप्रिल ते मेच्या पहिल्या आठवड्यात बाजारात फळे येण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे.उत्तर कोकणातील डहाणू आणि तलासरी या तालुक्यांमध्ये डिसेंबर प्रारंभापासून आंबा कलम मोहरण्यास सुरुवात होते. यंदा लांबलेला पाऊस आणि चक्रीवादळामुळे आंबा मोहरावर परिणाम होऊन मोहरण्याची क्रिया उशिरा सुरू होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र सीमा भागातील या तालुक्यांमध्ये आंबा कलमे मोहरलेली दिसत आहेत. दरम्यान बोर्डी नजीकच्या अस्वाली धरणाच्या पायथ्याशी नोव्हेंबरच्या प्रारंभापासून काही कलमे मोहरली होती. आता तेथे वाटाण्याच्या आकारातील फळे धरली आहेत.हा परिसर समुद्र किनाऱ्यापासून सुमारे पंधरा कि.मी. असून पश्चिम घाटाच्या रांगांमध्ये आहे. येथे ८ एकर क्षेत्रावर सुमारे २५० केशर, पायरी, राजापुरी या जातींच्या कलमांची लागवड केल्याची माहिती नंदकुमार दिनकर राऊत या बागायतदाराने दिली. या बागेला १५ नोव्हेंबर रोजी पाणी दिले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोहर येण्यास सुरुवात झाली आहे.तुडतुडा, विविध किडजन्य रोग आणि बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता बागेची नांगरट केली असून मोहराच्या संवर्धनासाठी फवारणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.काही दिवसांपासून तालुक्यातील तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता जाणवू लागली आहे. कलम मोहरण्यास हे अनुकूल वातावरण असून थंडी कायम राहिल्यास डिसेंबर अखेरीस सर्व झाडे मोहरतील असे आंबा बागायतदारांचे म्हणणे आहे. जानेवारी मध्यापर्यंत झाडे मोहरली आणि पोषक वातावरण मिळाल्यास मागील वर्षीप्रमाणेच यंदाही एप्रिल अखेरीस ते मे मध्यावर तयार फळे मिळतील, अशी शक्यता अनुभवी बागायतदारांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, तालुक्यातील डहाणू, कासा आणि वाणगाव या मंडळातील एकूण तालुक्यात ८४४.२१ हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीचे आहे. तालुका कृषी विभागातर्फे आंबा मोहर संरक्षणाबाबत लवकरच कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे तर कोसबाड कृषी विज्ञान केंद्राकडूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.यंदा रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मोहरावर अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे परिणाम जाणवला होता. मात्र उत्तर कोकणात नेहमीपेक्षा लवकर झाडे मोहरली आहेत. त्यामुळे बाजारात फळे लवकर येऊन चांगला भाव मिळू शकतो. दोन वर्षांपासून या भागात काही कलमे लवकर मोहरण्याची प्रक्रि या घडत असून यंदाही तीच परिस्थिती दिसल्याने कृषी विभागाने त्याचा अभ्यास केल्यास उत्पादन लवकर येऊन बागायतदारांना आर्थिक फायदा होऊ शकतो. यामुळे आंबा बागायतदारांमध्ये समाधान दिसून येत आहे.