शहरं
Join us  
Trending Stories
1
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
2
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
3
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
4
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
5
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
6
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
7
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
8
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

नारळाचे उत्पादन निम्म्याने घटणार; बागायतदारांना आर्थिक झळ, नारळ महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 10:56 PM

कीडरोग आणि अति पावसाचा फटका

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने भात, चिकू आणि नारळ इ. उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. दरम्यान, नारळ उत्पादनात निम्म्याने घट होऊन आगामी काळात या फळांच्या किमती दुपटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे धार्मिक सण - उत्सव आणि लग्नसराई काळात किमती वाढून ग्राहकांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे.

पालघर जिल्ह्यात सुमारे साडेपाच हेक्टर क्षेत्र नारळ लागवडीचे असून सागरी भागात मोठ्या प्रमाणात बागायती आहेत. रेताड जमीन, उष्ण तसेच दमट वातावरणात वेस्ट कोस्टल टॉल या जातीचे उत्पादन घेतले जाते. या फळांचा मोठा आकार, पाण्याची चव आणि आतील मलाई यासाठी दक्षिणेकडील नारळापेक्षा त्याला वाढती मागणी आहे. मात्र यंदा पावसाचे प्रमाण आणि तीव्रता अधिक असल्याने फुल आणि फळगळतीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे पक्व नारळ मिळेपर्यंत निम्मेच उत्पादन हाती येईल अशी शक्यता बागायतदारांनी वर्तवली आहे.

सध्या या झाडांवर स्पायरेलिंग व्हाईटफ्लाय या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. डहाणू आणि बोर्डी परिसरात नारळ बागांमधील अनेक झाडांवर स्पायरेलिंग व्हाईट फ्लाय नावाची ही कीड आढळली आहे. ती झावळीच्या खालच्या बाजूला राहून अंडी घालते. त्याचा आकार हा गोल रिंगणासारखा असतो. हे कीटक शरीरातून चीकट द्रव सोडत असून त्यावर sooty mold नावाची काळी बुरशी वाढल्याने प्रकाश संश्लेषण क्रि या मंदावली जाऊन अन्न निर्मितीस अडथळा येतो. दरम्यान, पोषणाच्या कमतरतेमुळे फुलाफळांचे प्रमाण कमी होऊन उत्पादन घटणार आहे. शिवाय नारळा व्यतिरिक्त पेरू, सफेद जांबु, फुलझाडे आणि शोभेची झाडे क्रोटन आदीवर ती मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने बागायतदारांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

दरम्यान, नारळाचे प्रमाण कमी होऊन किंमतीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, आगामी सण - उत्सव आणि लग्नसराईत नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे. त्याचा आर्थिक फायदा घाऊक आणि किरकोळ व्यापारी घेतील. नेहमीप्रमाणे उत्पादक वंचित राहणार असल्याने शासकीय मदत मिळणार का? याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.या किडीची ओळख, व्यवस्थापन व नियंत्रण या विषयी माहिती तसेच शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे नजीकच्या काळात दोन प्रशिक्षणे घेण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी किटकनाशकाची फवारणी करण्याचा अवलंब केला आहे. - प्रा. उत्तम सहाणे, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाडपालघर जिल्ह्यात नारळ क्षेत्र साडेपाच हेक्टर आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने फुलगळती झाल्याने उत्पादनात निम्म्याने घटणार आहे. त्याचा आर्थिक फटका नारळ बागायतदारांना बसेल. - यज्ञेश सावे, अध्यक्ष, ठाणे जिल्हा नारळ उत्पादक हितवर्धक संस्था

टॅग्स :Rainपाऊस