शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शहरात फेरीवाले जाहले उदंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:32 IST

मीरा-भाईंदरमधील रस्ते, गल्लीत राजकीय आशीवार्दाने फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. सत्ताधाºयांनी फेरीवाल्यांच्या प्रश्नांना बगल देत स्वत:चे खिसे भरून घेतले.

राजू काळे ।भार्इंदर : मीरा-भाईंदरमधील रस्ते, गल्लीत राजकीय आशीवार्दाने फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. सत्ताधाºयांनी फेरीवाल्यांच्या प्रश्नांना बगल देत स्वत:चे खिसे भरून घेतले. फेरीवाल्यांच्या पुर्नवसनाला राजकीय खो घातल्या गेल्याने येथील सामान्यांना त्यांचा त्रास रोज सहन करावा लागत आहे.फेरीवाल्यांना आवरण्यासह त्यांच्या पुर्नवसनासाठी केंद्र सरकारने २०१४ मध्ये फेरीवाला विधेयक मंजूर केले. त्याला मान्यता मिळाल्यानंतर राज्य सरकारला त्यांची मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. २०१६ मध्ये ते जाहीर झाल्यानंतर पालिकेला फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाला मान्यता मिळाली. तत्पूर्वी पालिकेने शहरातील सुमारे ५ हजारांंहून अधिक फेरीवाल्यांच्या पुर्नवसनासाठी सर्वेक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एका खाजगी कंपनीला नियुक्त केले. त्याच्या मान्यतेसाठी पालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला. तसेच घाईघाईने ३१ जणांची फेरीवाला समितीही स्थापन केली.समितीत राजकीय नेत्यांना घेण्यासाठी अनेकदा त्याच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या. परंतु, राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वेच जाहीर न केल्याने कंपनीच्या नियुक्तीसह फेरीवाला समितीला लाल कंदील दाखवण्यात आला. राज्य सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार पालिकेने अलिकडेच नव्याने समिती स्थापन करण्याची प्रक्रीया सुरु केली आहे. दरम्यान, पालिकेने फेरीवाल्यांकडून बाजार फी वसुल करण्यासाठी नियुक्त केलेले कंत्राटदार राजकीय निकटवर्तीय असल्याने ते प्रशासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने बाजार फी वसूल करतात. त्यातच आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी काही स्थानिक लोकप्रतिनिधींसह भ्रष्ट अधिकारी व कर्मचाºयांना हाताशी धरुन फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ करू लागले आहेत. त्याला राजकीय पाठबळ मिळत असल्याने कारवाई ठरवून केली जाते.उदंड झालेल्या फेरीवाल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने २०१२ मध्ये फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्र तयार केली. ना फेरीवाला क्षेत्रात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई केली.तसेच तेथे बेकायदा व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांवर कारवाईखेरीज बाजार फी वसुली करण्यास मज्जाव करण्यात आला. परंतु, त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून या क्षेत्रातच फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. त्यांच्याकडून बाजार फीही वसूल केली जाते. शांतता क्षेत्रातही फेरीवाल्यांना मनाई असतानाही तेथे प्रशासनाच्या नाकावर टिच्चून व्यवसाय सुरु आहे.अशा फेरीवाल्यांना रस्त्यावर व्यवसाय करू न देता त्यांचे पुर्नवसन एकाच जागी करण्यासाठी २००९ मध्ये तत्कालीन आयुक्त शिवमूर्ती नाईक यांच्या निर्देशानुसार धोरण निश्चित केले होते. त्यासाठी पालिकेचे नागरी सुविधा भूखंडही राखीव ठेवण्यात आले. परंतु, त्याला राजकीय खो घातल्याने फेरीवाल्यांचे पुर्नवसन रखडले ते आजतागायत. दरम्यान, फेरीवाल्यांच्या पुर्नवसनासाठी पालिकेने बाजाराच्या इमारती काही ठिकाणी बांधल्या. परंतु, तेथे ग्राहक मिळणार नसल्याचा कांगावा करण्यात आला.