शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण, नसबंदी मोहिमेत पालिका अयशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 01:00 IST

वसईतील नाक्या-नाक्यावर मध्यरात्रीनंतर भटक्या कुत्र्यांची दहशत असून नागरिकांना जीव मुठीत धरुन जावे लागत आहे.

- मंगेश कराळेनालासोपारा : वसईतील नाक्या-नाक्यावर मध्यरात्रीनंतर भटक्या कुत्र्यांची दहशत असून नागरिकांना जीव मुठीत धरुन जावे लागत आहे. जागोजागी भटके कुत्रे दिसत असल्याने वसईकर हैराण झाले आहेत. भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि रेबीज इंजेक्शनसाठी महानगरपालिकेने खर्च केल्याचा दावा केला आहे. महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०११ ते २०१९ च्या दरम्यान अंदाजे २७ हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली असून प्रत्येक कुत्र्याला अंदाजे १ हजार १३ रुपये खर्च करण्यात आला आहे. पण, लाखो रुपये खर्च करूनही भटक्या कुत्र्यांच्या संख्या कमी होण्याऐवजी महानगरपालिकेच्या उदासीन कारभारामुळे त्यात लक्षणीय वाढ झाली आहे.वसई - विरार शहर महानगरपालिकेने आॅक्टोबर २०११ मध्ये शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याची मोहीम सुरू केली होती. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची एखादी बातमी प्रसिध्द झाली की त्या विषयावर सर्वत्र चर्चा होते. कालांतराने ती थंडावते. मुले, शालेय विद्यार्थी, सायकल तसेच बाईकस्वार, कचरा गोळा करून उपजीविका चालविणारे लोक भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी ठरत आहेत. भटक्या कुत्र्यांनी रात्री-अपरात्री केलेल्या पाठलागामुळे बाईकस्वारांचे गोंधळून अपघात होतात. त्यात गंभीर दुखापती होऊन जीव जाण्याचेही प्रकार घडत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे इमारती तसेच संकुलाच्या शेजारील कचराकुंडीमधील कचरा सर्वत्र पसरवून त्यामुळे दुर्गंधी तसेच आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी विचारणा केल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, रोज १५ ते १८ भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जाते. पण एक कुत्री ५ ते ६ पिल्लांना जन्म देते. यामुळे कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढत आहे.शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनास एक नियोजनबध्द तसेच कालबद्ध कालबध्द कार्यक्रम आखून त्याची सत्वर अंमलबजावणी करण्याबाबतेच आदेश देणे गरजेचे आहे.भटक्या कुत्र्यांसाठी लाखो रु पयांचा केला खर्च....भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीबाबत वसई - विरार मनपाने २०१५-२०१६ मध्ये १३ लाख ७८ हजार रु पये, २०१६-२०१७ मध्ये ३३ लाख ४३ हजार रुपये, २०१७-२०१८ मध्ये ५६ लाख २५ हजार रुपये तर २०१८-२०१९ साली ६० लाख रुपये असा गेल्या चार वर्षांत एकूण १ करोड ६३ लाख ४६ हजार रु पये खर्च केला आहे.नसबंदीसाठी सेंटरची संख्या वाढविणे गरजेचे......भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नसबंदी करण्यासाठी लागणाºया सेंटरची संख्या वाढविणे काळाची गरज आहे. सध्या वसईमध्ये एकमेव सेंटर वसई पूर्वेकडील स्मशानभूमीजवळ आहे.महानगरपालिकेकडे एकमेव नसबंदी सेंटर असल्याने कमीत कमी ३ ते ४ सेंटर नव्याने उभारली पाहिजे. भटक्या कुत्र्यांची नसबंदी मोहीम २०११ सालापासून सुरू असून यापुढेही सुरूच राहणार.- विजय पाटील(सेंटर अधिकारी, वसई विरार महानगरपालिका)

टॅग्स :dogकुत्राVasai Virarवसई विरार