शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

परराज्यातही चिंचणी-वाणगाव मिरचीचा ठसका; घेतले जाते विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 01:50 IST

गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात होऊन वाहतूक बंद पडल्याने ढोबळी मिरची आणि तिखट मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते.

शौकत शेखडहाणू : कोल्हापुरी मिरचीचा ठसका सर्वश्रुत आहे, परंतु पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिंचणी-वाणगावची मिरचीही आपले वेगळे अस्तित्व राखून आहे. मुंबई शहराला भाजीपाला पुरवठा करण्यात सिंहाच्या वाटा असलेल्या या परिसरातील बागायतदार सध्या मिरचीचे विक्रमी उत्पादन घेण्यात यशस्वी ठरत आहे. 

गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात होऊन वाहतूक बंद पडल्याने ढोबळी मिरची आणि तिखट मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते. डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील अत्याधुनिक पद्धतीने वानगाव, चिंचणी, वरोर, वाढवण, बावडा, बडापोखराण, वासगाव, चंडीगाव, माटगाव, धूमकेत, आसनगाव, ऐना, गुंगवडा, डहाणूखडी, कांक्राडी या बागायतसमृद्ध भागात रब्बी हंगामात इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक पद्धतीने शेडनेटचा वापर करीत ढोबळी मिरची आणि तिखट मिरचीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असला तरी ठिंबक सिंचनद्वारे मिरचीची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदा परिसरातील शेतकऱ्यांकडून सुमारे पाच ते सहा हजार एकर जमिनीवर ढोबळी मिरची, अचारी मिरची, हिरव्या मिरचीची लागवड करण्यात आली आहे. हे पीकही जोमदार आले आहे. येथून दररोज दोनशे टन मिरची मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिकसह गुजरात राज्यातील अहमदाबाद, सुरत, वापी येथील बाजारपेठेत रवाना होत आहे. काही वर्षांपूर्वी फक्त गवतांचे उत्पन्न घेणारे परिसरातील शेतकरी आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवड करीत आहेत. याआधी डहाणूच्या पश्चिम भागात भाजीपाला, फळभाज्या तसेच वेलवर्गीय भाज्यांपैकी दुधी भोपळा, पडवळ, कारली, वांगी, टोमॅटो, तोंडली, पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असे, मात्र वेलवर्गीय भाज्या लागवडीमध्ये जास्त गुंतवणूक असल्याने तसेच बाजारपेठेतील भावांची अनिश्चितता यामुळे शेतकरी वेलवर्गीय भाज्यांची लागवड करण्यासाठी उत्सुक नाहीत. त्यांनी मिरचीचा फायदेशीर पर्याय स्वीकारला आहे. 

दरम्यान, डहाणूच्या पश्चिम भागातील चिंचणी, बावडा, वाणगावसारख्या भागांत सध्या सर्वात जास्त शिमला मिरचीचे उत्पादन सर्वाधिक आहे. येथील ढोबळी मिरचीची मागणी दिल्ली, मुंबईबरोबरच गुजरात राज्यातही आहे. दररोज येथून २०० टन मिरची पाठवली जात आहे.

इस्रायलमध्ये जाऊन शेतकऱ्यांनी केला अभ्यासमिरचीची लागवड केल्यास त्यातून नुकसान होण्याची भीती नाही. संकरीत बियाणांमुळे हे पीक कोणत्याही रोगाला बळी पडण्याचा धोका कमी असतो. शिवाय चुकून एखादा रोग पडल्यास त्यावर तातडीने उपाय करून तो नियंत्रणात आणता येतो. तसेच मिरचीचे भावही आश्वासक असतात. यामुळे येथील बहुसंख्य शेतकरी मिरची पिके घेण्याकडे वळले आहेत. या परिसरातील शेतकरी इस्रायलसारख्या ठिकाणी जाऊन तेथील शेतीचा अभ्यास करून विविध तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक सिंचनाने पाण्याची बचत करून जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली आणून त्यातून विक्रमी उत्पादन घेण्यात येथील शेतकऱ्यांनी यश मिळविले आहे.