शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
3
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
4
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
5
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
6
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
7
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
8
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
9
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
10
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
11
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
12
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
13
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
14
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
15
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
17
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
18
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
19
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
20
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातही चिंचणी-वाणगाव मिरचीचा ठसका; घेतले जाते विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 01:50 IST

गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात होऊन वाहतूक बंद पडल्याने ढोबळी मिरची आणि तिखट मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते.

शौकत शेखडहाणू : कोल्हापुरी मिरचीचा ठसका सर्वश्रुत आहे, परंतु पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिंचणी-वाणगावची मिरचीही आपले वेगळे अस्तित्व राखून आहे. मुंबई शहराला भाजीपाला पुरवठा करण्यात सिंहाच्या वाटा असलेल्या या परिसरातील बागायतदार सध्या मिरचीचे विक्रमी उत्पादन घेण्यात यशस्वी ठरत आहे. 

गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात होऊन वाहतूक बंद पडल्याने ढोबळी मिरची आणि तिखट मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते. डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील अत्याधुनिक पद्धतीने वानगाव, चिंचणी, वरोर, वाढवण, बावडा, बडापोखराण, वासगाव, चंडीगाव, माटगाव, धूमकेत, आसनगाव, ऐना, गुंगवडा, डहाणूखडी, कांक्राडी या बागायतसमृद्ध भागात रब्बी हंगामात इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक पद्धतीने शेडनेटचा वापर करीत ढोबळी मिरची आणि तिखट मिरचीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असला तरी ठिंबक सिंचनद्वारे मिरचीची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदा परिसरातील शेतकऱ्यांकडून सुमारे पाच ते सहा हजार एकर जमिनीवर ढोबळी मिरची, अचारी मिरची, हिरव्या मिरचीची लागवड करण्यात आली आहे. हे पीकही जोमदार आले आहे. येथून दररोज दोनशे टन मिरची मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिकसह गुजरात राज्यातील अहमदाबाद, सुरत, वापी येथील बाजारपेठेत रवाना होत आहे. काही वर्षांपूर्वी फक्त गवतांचे उत्पन्न घेणारे परिसरातील शेतकरी आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवड करीत आहेत. याआधी डहाणूच्या पश्चिम भागात भाजीपाला, फळभाज्या तसेच वेलवर्गीय भाज्यांपैकी दुधी भोपळा, पडवळ, कारली, वांगी, टोमॅटो, तोंडली, पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असे, मात्र वेलवर्गीय भाज्या लागवडीमध्ये जास्त गुंतवणूक असल्याने तसेच बाजारपेठेतील भावांची अनिश्चितता यामुळे शेतकरी वेलवर्गीय भाज्यांची लागवड करण्यासाठी उत्सुक नाहीत. त्यांनी मिरचीचा फायदेशीर पर्याय स्वीकारला आहे. 

दरम्यान, डहाणूच्या पश्चिम भागातील चिंचणी, बावडा, वाणगावसारख्या भागांत सध्या सर्वात जास्त शिमला मिरचीचे उत्पादन सर्वाधिक आहे. येथील ढोबळी मिरचीची मागणी दिल्ली, मुंबईबरोबरच गुजरात राज्यातही आहे. दररोज येथून २०० टन मिरची पाठवली जात आहे.

इस्रायलमध्ये जाऊन शेतकऱ्यांनी केला अभ्यासमिरचीची लागवड केल्यास त्यातून नुकसान होण्याची भीती नाही. संकरीत बियाणांमुळे हे पीक कोणत्याही रोगाला बळी पडण्याचा धोका कमी असतो. शिवाय चुकून एखादा रोग पडल्यास त्यावर तातडीने उपाय करून तो नियंत्रणात आणता येतो. तसेच मिरचीचे भावही आश्वासक असतात. यामुळे येथील बहुसंख्य शेतकरी मिरची पिके घेण्याकडे वळले आहेत. या परिसरातील शेतकरी इस्रायलसारख्या ठिकाणी जाऊन तेथील शेतीचा अभ्यास करून विविध तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक सिंचनाने पाण्याची बचत करून जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली आणून त्यातून विक्रमी उत्पादन घेण्यात येथील शेतकऱ्यांनी यश मिळविले आहे.