शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

खराब हवामानामुळे चिकूचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 01:09 IST

शासनाने सर्वेक्षण करण्याची मागणी; बागायतदारांसह शेतकरी मेटाकुटीला

डहाणू : खरीप हंगामाने पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व पिकांची वाताहत केली असून त्यामध्ये चिकूचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे फळगळ झालेल्या चिकू बागांना यापुढचे तब्बल २० ते २४ महिने चिकूफळ लागण्याची शाश्वती नाही. ओस पडलेल्या या चिकू बागांमुळे चिकू कामावर अवलंबून मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर अतिवृष्टीमुळे भातशेतीला लागलेली कणसे गळू लागल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.पालघर जिल्ह्यातील घोलवड, बोर्डी कंक्राटी, वाणगाव डहाणू या भागात चिकूच्या बागा गेल्या १२५ ते १३० वर्षांपासून विकसित केल्या आहेत. १९८५ - ८६ पासून फलोद्यान योजनांमध्ये चिकू, आंबा, नारळ बागा मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या असून गरीब आदिवासी समाजाने देखील बागा विकसित केल्या आहेत. परंतु या खरीपातील अतिवृष्टीमुळे चिकू बागांचे आणि भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने ताबडतोब सर्वेक्षण करून प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी २ लाख रुपयांची मदत मिळवून देण्याची बागायदारांची मागणी आहे. विशेषकरून येथील चिकू फळाला दिल्ली, काश्मीर भागात जास्त मागणी असून ही सर्व फळे रस्ते वाहतुकीने पाठविली जातात. चार वर्षांपासून रेल्वे भाड्यात खूप वाढ केली आहे. ही फळे वाहतूक रेल्वेमार्फत फळे स्वस्त दरात ग्राहकांना मिळतील आणि चिकू उत्पादकाला वाहतुकीपोटी कमी खर्च येईल, असे येथील चिकू बागायतदारांचे म्हणणे आहे.चिकू संशोधन केंद्र उभारण्याचे काय झाले?पालघर जिल्ह्यामध्ये बारा हजार हेक्टरमध्ये चिकू बागा विकसित झाल्या असून चिकू बागांवर उद्भवणाºया बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे द्राक्षाचे राष्ट्रीय संशोधन केंद्र, डाळींबाचे राष्ट्रीय संशोधन केंद्र सोलापूर येथे आहे. त्याच धर्तीवर डहाणू, घोलवड परिसरात चिकूचे राष्टÑीयसंशोधन केंद्राची मागणी २००७ पासून प्रलंबित आहे.राष्ट्रीय चिकू संशोधन केंद्र, डहाणू - कोसबाड येथे उभारण्याची बागायतदारांची मागणी आहे. २० ते २५ वर्षांपूर्वी या भागातील चिकूचे उत्पन्न प्रतिझाड प्रति वर्ष २५० ते ३०० किलो होते. ते आता जेमतेम १०० ते १२५ किलो प्रतिझाड आहे.नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रामार्फत या भागातील हवा आणि पाणी (पर्यावरणाचा) अभ्यास होणे खूप गरजेचे आहे. स्थानिक रेल्वे स्टेशन डहाणू, पालघर, उंबरगांव, वापी, वलसाड स्टेशनवर चिकू विक्री केंद्रे तसेच स्थानिक उत्पादीत पदार्थ विक्री केंद्र शेतकऱ्यांना रेल्वे स्थानकात उपलब्ध करून दिल्यास या भागातील शेतकºयांची आर्थिक क्र यशक्ती वाढण्यासाठी फार मोठी मदत होईल.- विनायक बारी, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष