शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

खराब हवामानामुळे चिकूचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 01:09 IST

शासनाने सर्वेक्षण करण्याची मागणी; बागायतदारांसह शेतकरी मेटाकुटीला

डहाणू : खरीप हंगामाने पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व पिकांची वाताहत केली असून त्यामध्ये चिकूचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे फळगळ झालेल्या चिकू बागांना यापुढचे तब्बल २० ते २४ महिने चिकूफळ लागण्याची शाश्वती नाही. ओस पडलेल्या या चिकू बागांमुळे चिकू कामावर अवलंबून मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर अतिवृष्टीमुळे भातशेतीला लागलेली कणसे गळू लागल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.पालघर जिल्ह्यातील घोलवड, बोर्डी कंक्राटी, वाणगाव डहाणू या भागात चिकूच्या बागा गेल्या १२५ ते १३० वर्षांपासून विकसित केल्या आहेत. १९८५ - ८६ पासून फलोद्यान योजनांमध्ये चिकू, आंबा, नारळ बागा मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या असून गरीब आदिवासी समाजाने देखील बागा विकसित केल्या आहेत. परंतु या खरीपातील अतिवृष्टीमुळे चिकू बागांचे आणि भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने ताबडतोब सर्वेक्षण करून प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी २ लाख रुपयांची मदत मिळवून देण्याची बागायदारांची मागणी आहे. विशेषकरून येथील चिकू फळाला दिल्ली, काश्मीर भागात जास्त मागणी असून ही सर्व फळे रस्ते वाहतुकीने पाठविली जातात. चार वर्षांपासून रेल्वे भाड्यात खूप वाढ केली आहे. ही फळे वाहतूक रेल्वेमार्फत फळे स्वस्त दरात ग्राहकांना मिळतील आणि चिकू उत्पादकाला वाहतुकीपोटी कमी खर्च येईल, असे येथील चिकू बागायतदारांचे म्हणणे आहे.चिकू संशोधन केंद्र उभारण्याचे काय झाले?पालघर जिल्ह्यामध्ये बारा हजार हेक्टरमध्ये चिकू बागा विकसित झाल्या असून चिकू बागांवर उद्भवणाºया बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे द्राक्षाचे राष्ट्रीय संशोधन केंद्र, डाळींबाचे राष्ट्रीय संशोधन केंद्र सोलापूर येथे आहे. त्याच धर्तीवर डहाणू, घोलवड परिसरात चिकूचे राष्टÑीयसंशोधन केंद्राची मागणी २००७ पासून प्रलंबित आहे.राष्ट्रीय चिकू संशोधन केंद्र, डहाणू - कोसबाड येथे उभारण्याची बागायतदारांची मागणी आहे. २० ते २५ वर्षांपूर्वी या भागातील चिकूचे उत्पन्न प्रतिझाड प्रति वर्ष २५० ते ३०० किलो होते. ते आता जेमतेम १०० ते १२५ किलो प्रतिझाड आहे.नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रामार्फत या भागातील हवा आणि पाणी (पर्यावरणाचा) अभ्यास होणे खूप गरजेचे आहे. स्थानिक रेल्वे स्टेशन डहाणू, पालघर, उंबरगांव, वापी, वलसाड स्टेशनवर चिकू विक्री केंद्रे तसेच स्थानिक उत्पादीत पदार्थ विक्री केंद्र शेतकऱ्यांना रेल्वे स्थानकात उपलब्ध करून दिल्यास या भागातील शेतकºयांची आर्थिक क्र यशक्ती वाढण्यासाठी फार मोठी मदत होईल.- विनायक बारी, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष