शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कोरोनाची साखळी तोडण्याचे आव्हान, पालघर जिल्ह्यात जनजागृतीवर मोठा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 00:10 IST

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन करण्याबरोबरच जनजागृतीवर लाखो रुपये खर्च केल्यानंतरही नागरिकांवर फारसा परिणाम झालेला नसल्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

- हितेन नाईकपालघर : पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून बुधवारी दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, रुग्णांची संख्या १० हजारांच्या वर गेलेली आहे, तसेच जिल्ह्यात १८८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन करण्याबरोबरच जनजागृतीवर लाखो रुपये खर्च केल्यानंतरही नागरिकांवर फारसा परिणाम झालेला नसल्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन दिवसरात्र एक करीत असताना बिनकामाचे बाहेर पडणाऱ्या काही बेपर्वा नागरिकांमुळे गर्दी वाढत असून जिल्ह्याबाहेरून नोकरीनिमित्ताने जिल्ह्यात ये-जा करणाºया नागरिकांमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले आहे. अत्यावश्यक कामासाठी दिलेल्या पासेसचा गैरवापरही कोरोनाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे. जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण कोरोनाविरोधातील लढाई जिंकू शकतो, अन्यथा मार्चपासून सुरू असलेली लॉकडाऊनची अविरतपणे सुरू असलेली साखळी हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत गेल्यास जिल्ह्यातल्या विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसण्याचा धोका वाढू शकतो.जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) आणि आपत्ती व्यवस्थापनांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाला कोरोना प्रादुर्भाव रोखणे आणि उपाययोजना आखण्यासाठी आणि परप्रांतीय कामगारांना रेल्वेने त्यांच्या मूळगावी पाठविण्यासाठी रेल्वेगाड्यांची व्यवस्था करणे, जेवण, नाश्ता, पाणी आदीच्या खर्चासाठी एकूण १६ कोटींचा निधी मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. त्या निधीतून वसई-विरार महापालिकेला पाच कोटी २५ लाखांचा सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला एक कोटी ४० लाख (अन्य तीन कोटी २२ लाख मिळाले), जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला ५८ लाख १२ हजार निधी देण्यात आला आहे. वसई तालुक्यात दोन कोटी ६५ लाख २५ हजार ९३९ रुपये, पालघर ६८ लाख ३७ हजार १८५, मोखाडा १२ लाख ५२ हजार ६८२, जव्हार तीन लाख ७० हजार २७६, विक्रमगड चार लाख ८४ हजार २९२, डहाणू १२ लाख ७३ हजार ९६७, वाडा आठ लाख २५ हजार २४२, तर तलासरी १० लाख ७२ हजार ३३ रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.२२ मार्चदरम्यान देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करीत जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या. त्या वेळी पालघर जिल्ह्यात लक्षणे आढळलेले अवघे २० रुग्ण होते. एप्रिलमध्ये ११० पॉझिटिव्ह, १० मृत्यू, मे मध्ये जवळपास आठपट वाढत रुग्णसंख्या ८४७, तर २९ मृत्यू अशी स्थिती होती. या आकडेवारीत वसई-विरार महापालिकेची कोरोनाबाधितांची संख्या ७८८ पॉझिटिव्ह आणि २९ मृत्यू अशी होती. तर, सध्या वसई-विरारमध्ये हीेच संख्या आठ हजार ५४७ बाधित रुग्ण, तर मृत्यू १७४ अशी स्थिती आहे. वसई तालुक्यातील वाढत्या संख्येने जिल्ह्यातील प्रशासनाला मात्र वेठीस धरले. वसई, नालासोपारा आदी भागांत नोकरी, व्यवसायानिमित्ताने जाणाऱ्यांच्या माध्यमातून मग जिल्ह्यातील ग्रामीण भाग कोरोनाच्या कचाट्यात सापडू लागला. आता जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनापुढे चिंतेचे वातावरण आहे.बाधितांमध्ये तब्बल पाचपटींनी वाढ- पालघर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या मार्च महिन्यापासून हनुमानाच्या शेपटीसारखी हळूहळू वाढतच चालली आहे. १४ जून रोजी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या अवघी एक हजार ९०० आणि ६१ मृत्यू अशी होती, मात्र त्या संख्येत तब्बल पाचपटीने वाढ होत नऊ हजार ७३३ बाधित आणि १८१ मृत्यू इथपर्यंत पोहोचली आहे.- मग, मार्चपासून जवळपास पाच महिन्यांच्या कालावधीत बाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात काय उणिवा राहिल्या, यावर अभ्यास करून नियोजनबद्ध आराखड्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे बनले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpalgharपालघर