शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र जिल्हाभर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 4:22 AM

पोटनिवडणूकीतील घाव : मंडळ अध्यक्षांसह १०० पदाधिकाºयांची सोडचिठ्ठी

हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते-पदाधिकाºयांच्या दिवस-रात्रीच्या मेहनतीमुळे पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपाने चार वेळा जिंकला असून भाजपाचा हा परंपरागत बालेकिल्ला कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला देऊ नये यासाठी विक्रमगड तालुक्यापासून सुरू झालेले राजीनामा सत्र जिल्हाभर पसरले असून १२ मंडळ अध्यक्षासह १०० पदाधिकाºयांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे सोपविले आहेत.

मातोश्रीवर झालेल्या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभेसाठी भाजपाला २५ जागा तर शिवसेनेने २३ जागा असे वाटप झाले असले तरी पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत कुठेही जाहीर करण्यात आलेले नव्हते. परंतु काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी भाजप-शिवसेनेच्या चर्चेअंती पालघर लोकसभेची जागा सेनेला देण्यात आल्याचे प्रसिद्ध केल्याने त्याचे पडसाद विक्र मगड तालुक्यात उमटले जिल्हा उपाध्यक्ष महेश आळशी, प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भानुशाली, प.स.सभापती मधुकर खुताडे आदींसह अनेक मुख्य पदाधिकाºयांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्ष तथा आमदार पास्कल धनारे यांना पाठविले होते.दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर काही अवधीतच शिवसेनेने त्यांचे पुत्र श्रीनिवास वनगांना शिवसेनेने शिवबंधन बांधून पालघर लोकसभेची अधिकृत उमेदवारी देऊन भाजपा समोर आव्हान उभे केले होते. मात्र, यात वनगा यांना सहानुभूती पेक्षा भाजपाला मतांच्या रुपाने जनाधार मिळाला. जिल्ह्यातील काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळलेल्या राजेंद्र गवितांना आपल्याकडे खेचून मुख्यमंत्र्यांनी एक तगडे आव्हान शिवसेने समोर उभे केले होते. अटीतटीच्या या लढाईत गावितांनी यश मिळविले होते. या टक्करीमुळे शिवसेनेने आपल्याला तोंडघशी पाडण्याच्या केलेल्या प्रयत्नाचे घाव भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आजही विसरलेले नाहीत.एकेकाळी शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघात भाजपाचे विशेष अस्तित्व नसताना चिंतामण वनगांनी लोकांशी नाळ जोडून हा मतदार संघ भाजपमय केला. त्यामुळे १९८४ पासून भाजपा आतापर्यंत चार वेळा स्वबळावर निवडून आला असून आज जिल्ह्यात भाजपचा १ खासदार, २ आमदार, जिल्हापरिषद अध्यक्ष, २१ जिल्हा परिषद सदस्य, ४ पंचायत समिती सभापती, ३६ पंचायत समिती सदस्य, २०० सरपंच, १२०० ग्रामपंचायत सदस्य, डहाणू नगरपालिका, ३६ नगरसेवक, एवढी मोठी ताकद उभी आहे. कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीवर बांधलेला लोकसभेचा मतदार संघ श्रीनिवास वनगांच्या पुनर्वसनासाठी शिवसेनेला का म्हणून द्यायचा? असा सवाल भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकाºयांनी केला आहे.मतदारांना तोंड दाखवायचे कसे?च्खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या मुलासह संपूर्ण कुटुंबाला मातोश्रीवर नेत श्रीनिवासला लोकसभा पोटनिवडणुकीचे तिकीट देत भाजपला शह देण्याचा शिवसेनेचा डाव निवडणुकीतील पराभवामुळे फसल्याचे चित्र पुढे आले होते.च्मात्र, आता भाजपला कोंडीत पकडून भाजपची ही परंपरागत जागा शिवसेनेने पदरात पाडून घेतल्याची बातमी आल्यानंतर येथील भाजपा पदाधिकाºयांना मतदारांना सामोरे जाणे मुश्कील होणार आहे.जिल्ह्यातून शेकडो पदाधिकाºयांनी आपले राजीनामे माझ्याकडे सोपविले असून अजूनही अनेक भागातून राजीनामे माझ्याकडे येत आहेत.- पास्कल धनारे, आमदार तथा जिल्हाध्यक्ष, पालघर.

टॅग्स :BJPभाजपाVasai Virarवसई विरार