शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
4
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
5
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
6
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
7
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
8
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
9
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
10
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
11
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
12
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
13
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
14
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
15
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
16
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
17
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
18
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
19
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
20
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:54 IST

महिनाभरात पाच जणांचा बळी : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्याचे काम सुरू

वसंत भोईर

वाडा : भिवंडी - वाडा - मनोर हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला असून पाच वर्षांमध्ये झालेल्या अपघातात तब्बल ४०० जणांना जीव गमवावा लागला आहे; तर अनेकजण जखमी झाले आहेत. खराब रस्ता, जागोजागी खड्डे, अपूर्ण काम यांमुळे हे अपघात होत असल्याचे सांगितले जाते.

मुंबई - अहमदाबाद आणि मुंबई - आग्रा या प्रमुख दोन रस्त्यांना जोडणारा दुवा म्हणून भिवंडी - वाडा - मनोर हा रस्ता ओळखला जातो. या महामार्गावरील वाढती वाहतूक तसेच वाड्यातील औद्योगीकरण लक्षात घेता राज्य शासनाने या रस्त्याच्या चौपदरीकरणाला पाच वर्षांपूर्वी मंजुरी दिली. हे रस्त्याचे काम ‘बांधा - वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर सुप्रीम कंपनीला देण्यात आले होते. मात्र, सुप्रीम कंपनीने पाच वर्षांत हे रस्त्याचे काम पूर्ण केले नाही. १६ कि.मी. अंतरावर वन विभागाच्या जागेत हा रस्ता अद्यापही दुपदरीच आहे तर देहजे, पिंजाळ नद्यांवरील पुलांची कामेही अपूर्ण आहेत.वाडा ते मनोर हा रस्ता बालाजी कंपनीने चांगला बनवला आहे. मात्र वाडा ते भिवंडी हा ४० कि.मी. अंतराचा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून प्रत्येक पावसात तो खड्डेमय होताना दिसतो. त्यावर थातूरमातूर डागडुजी केली जाते. पुन्हा पावसाळ्यात ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच स्थिती होते. या रस्त्याच्या अपूर्ण कामाकडे लक्ष वेधण्यासाठी पाच वर्षात अनेक आंदोलने झाली. मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नसल्याने आजही निष्पाप लोकांचे जीव जात असून संसार उघड्यावर पडले आहेत. यासाठी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, जिजाऊ सामाजिक संघटनेचे नीलेश सांबरे, श्रमजीवी संघटना, स्वाभिमान संघटना, मनसे यांनी अनेक वेळेला आंदोलने करून समस्येकडे लक्ष वेधले होते. पण आश्वासनांपलीकडे काहीही पदरात पडलेले नाही. नागरिकांचे हाल सुरूच आहेत. वास्तविक, न्यायालयाने सहा महिन्यात हा रस्ता करण्याचे आदेश दिले आहेत. त्या सहा महिन्यातीलही अडीच महिने आता निघून गेले आहेत.सद्यस्थितीत हा रस्ता सुप्रीम कंपनीकडून काढून घेतला असून टोलवसुली सुद्धा बंद आहे. या मार्गावरील खड्डे भरण्याचे काम सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. ते काम देखील कासवगतीने सुरू असल्याने त्याचा त्रास या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना होत आहे.काँक्रिटीकरणाचे काम सुरूच्१५० मीटर रस्त्याच्या कामासाठी पाच महिने गेले. कंचाड फाटा येथे एकशे पन्नास मीटर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. एप्रिल महिन्यात हे काम सुरू करण्यात आले पण आजपर्यंत ते पूर्ण झालेले नाही.राज्य महामार्गावर पडलेले खड्डे भरण्याचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल- प्रकाश पातकर,प्रभारी उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाडा

टॅग्स :Vasai Virarवसई विरारroad safetyरस्ते सुरक्षा