शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

मीरा भाईंदर मनपाबाहेर आंदोलनाला बंदी घालण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 17:05 IST

महापालिकेच्या बाहेर धरणे, उपोषण करण्यास बंदी घालणारा महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी आणलेला प्रस्ताव शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांच्या विरोधा मुळे बारगळला. सत्ताधारी भाजपाने मात्र बंदी घालण्याचे समर्थन केले होते.

मीरारोड - महापालिकेच्या बाहेर धरणे, उपोषण करण्यास बंदी घालणारा महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी आणलेला प्रस्ताव शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांच्या विरोधा मुळे बारगळला. सत्ताधारी भाजपाने मात्र बंदी घालण्याचे समर्थन केले होते. परंतु आवश्यक संख्याबळ नसल्याने आयुक्तांसह सत्ताधारयांचे धरणे, आंदोलनांना बंदी घालण्याचे स्वप्न भंगले. गैरप्रकार, भ्रष्टाचार व कामचुकारपणाला पाठीशी घालण्यासाठी आयुक्तांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केल्याची टीका होत आहे. मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयाबाहेर असलेल्या पदपथावर आपल्या मागण्यांसाठी लोकशाही पद्धतीने धरणं, उपोषण, साखळी उपोषण आदी आंदोलने होत असतात. विविध संस्था वा राजकिय पक्षाची मंडळी त्यांच्या मागण्यांना वा तक्रारींना न्याय न मिळाल्याने आंदोलनं करत असतात. अगदी नगरसेविका रीटा शहा सह अनेक नगरसेवकांनी देखील धरणं , उपोषण अशी आंदोलनं केली आहेत. पालिकेच्या प्रवेशद्वारा बाहेरील पदपथावर होणारी आंदोलनं होऊ नयेत म्हणून आधीच पालिकेने लोखंडी जाळ्या पदपथावर बसवून टाकल्या आहेत.  तर गेल्या ६ जानेवारीपासून जिद्दी मराठा प्रतिष्ठान, सत्यकाम फाऊंडेशनने ७११ रुग्णालय इमारतीत पालिकेच्या मालकीचे प्रसुतीगृह व दवाखाना सुरु करण्यासाठी साखळी उपोषण चालवले आहे. या आंदोलना मुळे सत्ताधारी भाजपा, आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहतांसह पालिका आयुक्तांवर देखील टिकेची झोड उठली आहे. परिणामी आयुक्तांनी शनिवारच्या महासभेत चक्क नियम के खाली आवश्यक बाब म्हणून पालिकेच्या बाहेरच्या परिसरात आंदोलनास बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला होता.  परंतु भाजपाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने शिवसेना आणि काँग्रेसच्या सहमतीची गरज निर्माण झाली. आयुक्तांनी तर मंत्रालयासह मुंबई, ठाणे आदी महापालिकांचा हवाला देत मीरा भाईंदर महापालिके बाहेर देखील आंदोलनास बंदी घालावी. आंदोलनासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानासमोर जागा राखीव ठेवावी,असं सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदपथ लोकांसाठी खुली ठेवायला हवी असं ते म्हणाले.महापौरांनी सेना व काँग्रेसला सदरचा प्रस्ताव घेण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट नकार दिला. सेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, माजी उपमहापौर प्रविण पाटील, नगरसेविका निलम ढवण, काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार, नगरसेवक अनिल सावंत आदींनी आंदोलनाला बंदी घालण्यावर टीकेची झोड उठवली. लोकशाही संपवायला निघालात काय ? असा खरमरीत सवाल ढवण यांनी आयुक्त व सत्ताधा-यांना विचारला. तर तुमच्या कारभारामुळे आंदोलनं अजून होणार याची धास्ती वाटते काय ? असे प्रविण यांनी विचारले. भाजपाने मात्र आंदोलनावर बंदी घालण्याची मागणी केली. पण पुरेसे संख्याबळ नसल्याने अखेर भाजपाला विषय घेता आला नाही. लोकशाही मार्गाने आंदोलनं करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आंदोलनावर बंदी घालून आयुक्त आणि सत्ताधा-यांना गैरप्रकार, मनमानी करण्यास मोकळं रान हवं आहे. -  मिलन म्हात्रे ( माजी नगरसेवक ) 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपाcongressकाँग्रेस