शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

मीरा भाईंदर मनपाबाहेर आंदोलनाला बंदी घालण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 17:05 IST

महापालिकेच्या बाहेर धरणे, उपोषण करण्यास बंदी घालणारा महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी आणलेला प्रस्ताव शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांच्या विरोधा मुळे बारगळला. सत्ताधारी भाजपाने मात्र बंदी घालण्याचे समर्थन केले होते.

मीरारोड - महापालिकेच्या बाहेर धरणे, उपोषण करण्यास बंदी घालणारा महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी आणलेला प्रस्ताव शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांच्या विरोधा मुळे बारगळला. सत्ताधारी भाजपाने मात्र बंदी घालण्याचे समर्थन केले होते. परंतु आवश्यक संख्याबळ नसल्याने आयुक्तांसह सत्ताधारयांचे धरणे, आंदोलनांना बंदी घालण्याचे स्वप्न भंगले. गैरप्रकार, भ्रष्टाचार व कामचुकारपणाला पाठीशी घालण्यासाठी आयुक्तांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केल्याची टीका होत आहे. मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयाबाहेर असलेल्या पदपथावर आपल्या मागण्यांसाठी लोकशाही पद्धतीने धरणं, उपोषण, साखळी उपोषण आदी आंदोलने होत असतात. विविध संस्था वा राजकिय पक्षाची मंडळी त्यांच्या मागण्यांना वा तक्रारींना न्याय न मिळाल्याने आंदोलनं करत असतात. अगदी नगरसेविका रीटा शहा सह अनेक नगरसेवकांनी देखील धरणं , उपोषण अशी आंदोलनं केली आहेत. पालिकेच्या प्रवेशद्वारा बाहेरील पदपथावर होणारी आंदोलनं होऊ नयेत म्हणून आधीच पालिकेने लोखंडी जाळ्या पदपथावर बसवून टाकल्या आहेत.  तर गेल्या ६ जानेवारीपासून जिद्दी मराठा प्रतिष्ठान, सत्यकाम फाऊंडेशनने ७११ रुग्णालय इमारतीत पालिकेच्या मालकीचे प्रसुतीगृह व दवाखाना सुरु करण्यासाठी साखळी उपोषण चालवले आहे. या आंदोलना मुळे सत्ताधारी भाजपा, आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहतांसह पालिका आयुक्तांवर देखील टिकेची झोड उठली आहे. परिणामी आयुक्तांनी शनिवारच्या महासभेत चक्क नियम के खाली आवश्यक बाब म्हणून पालिकेच्या बाहेरच्या परिसरात आंदोलनास बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला होता.  परंतु भाजपाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने शिवसेना आणि काँग्रेसच्या सहमतीची गरज निर्माण झाली. आयुक्तांनी तर मंत्रालयासह मुंबई, ठाणे आदी महापालिकांचा हवाला देत मीरा भाईंदर महापालिके बाहेर देखील आंदोलनास बंदी घालावी. आंदोलनासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानासमोर जागा राखीव ठेवावी,असं सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदपथ लोकांसाठी खुली ठेवायला हवी असं ते म्हणाले.महापौरांनी सेना व काँग्रेसला सदरचा प्रस्ताव घेण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट नकार दिला. सेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, माजी उपमहापौर प्रविण पाटील, नगरसेविका निलम ढवण, काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार, नगरसेवक अनिल सावंत आदींनी आंदोलनाला बंदी घालण्यावर टीकेची झोड उठवली. लोकशाही संपवायला निघालात काय ? असा खरमरीत सवाल ढवण यांनी आयुक्त व सत्ताधा-यांना विचारला. तर तुमच्या कारभारामुळे आंदोलनं अजून होणार याची धास्ती वाटते काय ? असे प्रविण यांनी विचारले. भाजपाने मात्र आंदोलनावर बंदी घालण्याची मागणी केली. पण पुरेसे संख्याबळ नसल्याने अखेर भाजपाला विषय घेता आला नाही. लोकशाही मार्गाने आंदोलनं करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आंदोलनावर बंदी घालून आयुक्त आणि सत्ताधा-यांना गैरप्रकार, मनमानी करण्यास मोकळं रान हवं आहे. -  मिलन म्हात्रे ( माजी नगरसेवक ) 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपाcongressकाँग्रेस