शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

बदलापूरकरांना प्रतीक्षा नव्या उड्डाणपुलांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:37 PM

कोंडीचा प्रश्न जटिल : मंजुरी मिळूनही कार्यवाही नाही

बदलापूर :  पर्यायी उड्डाणपुलाअभावी बदलापूरमध्ये दिवसेंदिवस वाहतूककोंडीची समस्या वाढत चालली आहे. बदलापूर पूर्व- पश्चिम भागाला जोडणाऱ्या बेलवली ते कात्रप या उड्डाणपुलाला एमएमआरडीएकडून मंजुरी मिळाली असल्याचे तसेच बॅरेज रोड-होप इंडिया उड्डाणपुलालाही हिरवा कंदील मिळाला असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, अद्यापही या उड्डाणपुलांच्या उभारणीच्या हालचाली दिसत नसल्याने बदलापूरकरांना नव्या उड्डाणपुलांच्या प्रतीक्षेत वाहनकोंडीचा सामना करावा लागत आहे.

सध्या बदलापूरमध्ये पूर्व-पश्चिम भागात ये- जा करण्यासाठी वाहनांना नगरपालिका कार्यालयाजवळून जाणारा उड्डाणपूल हा एकमेव सोयीस्कर मार्ग आहे. पूर्वी शहराच्या पूर्व-पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी वाहनचालकांना बदलापूर रेल्वेस्टेशन फाटक, बेलवली रेल्वे फाटक व सध्याच्या उड्डाणपुलाजवळ असलेला सबवे असे तीन पर्याय होते. उड्डाणपुलाची उभारणी झाल्यानंतर दोन्ही रेल्वे फाटके बंद करण्यात आली. सबवेही अरुंद झाल्याने फक्त दुचाकी जाऊ शकतील एवढाच रस्ता तिथे आहे. त्याचबरोबर बेलवलीतील सब-वे मध्ये बारमाही पाणी साचत असल्याने तो फारसा उपयोगाचा नाही. त्यामुळे बदलापूर पूर्व- पश्चिम भागात ये-जा करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीची संपूर्ण भिस्त या एकमेव उड्डाणपुलावर आहे. या उड्डाणपुलावर एखादे वाहन बंद पडल्यास काही मिनिटांंत मोठ्या प्रमाणात कोंडी होते.  त्यामुळे बेलवली ते कात्रप तसेच बॅरेज रोड-होप इंडिया या भागात पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाची उभारणी होण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.

नेत्यांनी सांगितलेले खरे की खोटे?nगेल्यावर्षीच्या मे महिन्यात एमएमआरडीए बेलवली-कात्रप या उड्डाणपुलाचे काम करणार असल्याबाबत निर्णय झाला असून लवकरच पुढील कार्यवाही करून या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. हा पूल चारपदरी असेल, असेही सांगण्यात आले होते. त्यानंतर, बॅरेज रोड-होप इंडिया या रेल्वे उड्डाणपुलाचीही उभारणी करण्यासाठी एमएमआरडीएने हालचाली सुरू केल्या असल्याचे राजकीय पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या उड्डाणपुलांच्या उभारणीसंदर्भात कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने नव्या उड्डाणपुलांची उभारणी होणार तरी केव्हा, असा सवाल बदलापुरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

टॅग्स :badlapurबदलापूर