शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

खोडकिडा रोगाने शेती उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 01:29 IST

परतीच्या पावसाने तसेच वादळाने डहाणू तालुक्यातील भात शेतीचे नुकसान झाले असताना दुसरीकडे शेतीवर आता खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

कासा : परतीच्या पावसाने तसेच वादळाने डहाणू तालुक्यातील भात शेतीचे नुकसान झाले असताना दुसरीकडे शेतीवर आता खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेती उद्ध्वस्त होण्याची भीती असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

तालुक्यातील कासा, सायवन, वाणगाव, धुंदलवाडी भागातील काही गावांमध्ये खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. गरव्या भाताचे दाणे भरण्याच्या काळात कीटक भाताच्या कणसाचा गाभा खातात. हे दाणे न भरताच भाताचे लोम्ब मरू लागतात. त्यामुळे भाताचे उत्पन्न कमी होणार आहे.

हळव्या भाताचे पीक तयार झाले असताना परतीच्या तसेच वादळी पावसाने त्याचे नुकसान केले. तर गरव्या भाताचे पीक तयार झाले असताना त्याच्यावर खोडकिड्याची लागण झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार असून उत्पादन घटणार असल्याचे शेतकरी सुनील घरत यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन नाही

सुरुवातीपासून पाऊस योग्य प्रमाणात पडल्याने भात पीक चांगले आले. मात्र परतीच्या तसेच वादळी पावसाने पीक शेतात आडवी पाडून टाकली. त्यात काही पिके कुजून गेली तर दाणे रु जल्याने नुकसान झाले. आता खोडकीडा रोगाने भात शेतीचे नुकसान होत असताना कृषी विभागाकडून कोणतेही मार्गदर्शन शेतकºयांना होताना दिसत नाही. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव असाच वाढत गेल्यास भातशेती उद्ध्वस्त होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी