शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

खोडकिडा रोगाने शेती उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 01:29 IST

परतीच्या पावसाने तसेच वादळाने डहाणू तालुक्यातील भात शेतीचे नुकसान झाले असताना दुसरीकडे शेतीवर आता खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

कासा : परतीच्या पावसाने तसेच वादळाने डहाणू तालुक्यातील भात शेतीचे नुकसान झाले असताना दुसरीकडे शेतीवर आता खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेती उद्ध्वस्त होण्याची भीती असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

तालुक्यातील कासा, सायवन, वाणगाव, धुंदलवाडी भागातील काही गावांमध्ये खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. गरव्या भाताचे दाणे भरण्याच्या काळात कीटक भाताच्या कणसाचा गाभा खातात. हे दाणे न भरताच भाताचे लोम्ब मरू लागतात. त्यामुळे भाताचे उत्पन्न कमी होणार आहे.

हळव्या भाताचे पीक तयार झाले असताना परतीच्या तसेच वादळी पावसाने त्याचे नुकसान केले. तर गरव्या भाताचे पीक तयार झाले असताना त्याच्यावर खोडकिड्याची लागण झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार असून उत्पादन घटणार असल्याचे शेतकरी सुनील घरत यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन नाही

सुरुवातीपासून पाऊस योग्य प्रमाणात पडल्याने भात पीक चांगले आले. मात्र परतीच्या तसेच वादळी पावसाने पीक शेतात आडवी पाडून टाकली. त्यात काही पिके कुजून गेली तर दाणे रु जल्याने नुकसान झाले. आता खोडकीडा रोगाने भात शेतीचे नुकसान होत असताना कृषी विभागाकडून कोणतेही मार्गदर्शन शेतकºयांना होताना दिसत नाही. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव असाच वाढत गेल्यास भातशेती उद्ध्वस्त होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी