शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कष्टकरी संघटनेचे हक्कासाठी आंदोलन; उपवन संरक्षण कार्यालयावर हजारोच्या संख्येने मोर्चेकऱ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 12:39 AM

नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे काही अनुचित प्रकार घडला नाही.

जव्हार : गेल्या दीड वर्षांपासून जव्हार वन विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे स्थानिक आदिवासींच्या वन हक्कांचे उल्लंघन करत असल्याचे कारण देत विविध मागण्या घेऊन कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांच्या अध्यक्षतेखाली जुना राजवाडा येथून थेट उपवन संरक्षण कार्यालयात मोर्चेकऱ्यांनी धडक दिली. त्या ठिकाणी निदर्शने करून वन खात्यातील उपवनसंरक्षक मिश्रा व संबंधित कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत मोर्चाने थेट पोलीस ठाणे गाठले व गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस ठाण्याला घेराव घातला.

नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे काही अनुचित प्रकार घडला नाही. आदिवासी लोक इतक्या शांतपणे मोर्चा करतात हे मी माझ्या जीवनात पहिल्यांदाच पाहिले असून मीही आपले आभार मानतो असे त्यांनी सांगितले.कष्टकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुम्ही आदिवासींना शिंदाड करू देत नाहीत.

शिंदाड करणे हे महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम १९६४ चे उल्लंघन करते असा तुम्ही आरोप करता; परंतु तुमचे म्हणणे साफ चुकीचे असून शिंदाड व राब करणे हा आमचा पारंपरिक हक्क आहे. हा हक्क आम्हाला वन हक्क कायद्याने निहित करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्र वन नियम २०१४ मध्ये आमचा हा हक्क मान्य करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यासाठी १९३५ मध्ये देऊ करण्यात आलेल्या सवलतींमध्ये राब करण्याचा समावेश आहे. आम्हाला वन पट्ट्यामध्ये विहिरी बांधू देत नाहीत व जमिनीचे सपाटीकरण करू देत नाहीत, अशा तक्रारी या वेळी करण्यात आल्या.

रोजंदारी, कंत्राटी कामगारांना न्याय द्याजव्हार : जव्हारच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात रोजंदारीवर काम करणाºया सफाई कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार नाही. या कामगारांना पगारवाढीबरोबरच भविष्यनिर्वाह निधी आणि भत्ते देण्यात यावेत, या मागण्यांसाठी सफाई कामगारांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली रुग्णालयासमोर शनिवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

रोजंदारी, कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. जव्हारच्या ग्रामीण कुटीर रुग्णालयात १४ ते १५ वर्षांपासून (रोजंदारी) कंत्राटीवर काम करीत आहेत. मात्र या कंत्राटी (स्वच्छता सेवा) सफाईगार व शिपाईगार यांना मे. राजश्री शाहू नागरी सेवा सहकारी संस्था बोईसर यांनी भरती केले आहे, मात्र त्यांनी गेल्या काही वर्षांपासून पगारवाढ होत नाही. इतर भत्ते मिळत नाहीत. म्हणून या कर्मचाºयांनी मे. राजश्री शाहू नागरी सेवा सहकारी संस्थेकडे मागणी केली. परंतु या संस्थेने कर्मचाºयांचे कुठलेही म्हणणे न ऐकता उलट त्या कर्मचाºयांना कमी करण्यात आले आहे. रुग्णालयात रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी वैतागले असून त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रVasai Virarवसई विरार