शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

बळीराजाच्या खात्यात तीन महिन्यांनी पैसे जमा, शेतकऱ्यांत समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 00:11 IST

आदिवासी विकास महामंडळाने भात खरेदी केंद्रावर भात दिलेल्या शेतक-यांचे पैसे शुक्रवारी दुपारनंतर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. यामुळे भात पिकाचे कष्टाचे पैसे मिळाल्याने शेतकरी वर्गाने दै. ‘लोकमत’चे आभार मानले.

पारोळ - भात खरेदी केंद्रावरील भात खरेदीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात तीन महिन्यांनंतर जमा झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ‘लोकमत’ने १३ मार्चच्या अंकात ‘भात खरेदी केंद्राचा आधार हरपला’ अशी बातमी प्रकाशित केली होती. त्याचा परिणाम म्हणून आदिवासी विकास महामंडळाने भात खरेदी केंद्रावर भात दिलेल्या शेतक-यांचे पैसे शुक्रवारी दुपारनंतर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. यामुळे भात पिकाचे कष्टाचे पैसे मिळाल्याने शेतकरी वर्गाने दै. ‘लोकमत’चे आभार मानले.सरकारने थकीत कर्जमाफी व नियमित हप्ते भरणाºया शेतकºयांना अनुदान दिल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असतानाच वसई तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते. आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत भात खरेदी केंद्रावर तीन महिन्यांपासून भात खरेदी केलेले असताना त्या खरेदीचे पैसे हातात न आल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण होते. होळी सण साजरा करायला तरी भात खरेदीचे पैसे मिळतील या आशेवर शेतकरी असताना सणाच्या दिवसातही खात्यात पैसे जमा न झाल्याने शेतकरी नाराज होते. भात खरेदी केल्यानंतर पंधरा दिवसात धान खरेदीचे पैसे शेतक-याच्या खात्यात जमा होतात. पण या वर्षी मात्र शेतकºयांकडून भात खरेदी केल्यानंतर लगेच आॅनलाइन नोंदणी व पावती देणे बांधनकारक असताना पावती देण्यासाठीही अधिकाºयांनी पंधरा दिवस लावले. त्यामुळे भात खरेदीचे पैसे येण्यास उशीर झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.या वर्षी आधारभूत भात खरेदी केंद्रावर क्विंटलमागे दरात व देण्यात येणाºया बोनसमध्ये वाढ झाल्याने ही दरवाढ बळीराजाला दिलासा देणारी होती. मागील वर्षी क्विंटलमागे १७५० व बोनस २०० रुपये असा शासनाचा भाताला हमी भाव होता. पण या वर्षी दरात वाढ होत १८५० व बोनस ७०० असा दर लागू झाल्याने शेतकरी बांधवांसाठी ही समाधानाची बाब ठरली होती. काही शेतकºयांनी २४ डिसेंबरला भात खरेदी केंद्रावर भाताची विक्री केली होती. पण त्या विक्रीचे पैसे तीन महिने झाले तरी खात्यात जमा न झाल्याने शेतकरी वर्गाला अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. तर मार्चअखेर आल्याने अनेक शेतकºयांना सोसायटीकडून घेतलेले पीक कर्ज भरायचे होते. अशा चिंतेत शेतकरी असतानाच ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्याने महामंडळाने तत्काळ याची दखल घेत शेतकºयांच्या खात्यात भात खरेदीचे पैसे जमा करण्यात आले.मी डिसेंबर महिन्यात भात खरेदी केंद्रावर भात विक्री केले होते. ते पैसे मार्चमध्ये ‘लोकमत’ने दिलेल्या बातमीमुळे मिळण्यास मदत झाली असल्याने व नेहमी शेतकरी वर्गासाठी या दैनिकाची मदत होत असल्याने ‘लोकमत’चे आभारी आहोत.-कृपेश पाटील, शेतकरी, वडघर

टॅग्स :FarmerशेतकरीpalgharपालघरVasai Virarवसई विरार