शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

बळीराजाच्या खात्यात तीन महिन्यांनी पैसे जमा, शेतकऱ्यांत समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 00:11 IST

आदिवासी विकास महामंडळाने भात खरेदी केंद्रावर भात दिलेल्या शेतक-यांचे पैसे शुक्रवारी दुपारनंतर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. यामुळे भात पिकाचे कष्टाचे पैसे मिळाल्याने शेतकरी वर्गाने दै. ‘लोकमत’चे आभार मानले.

पारोळ - भात खरेदी केंद्रावरील भात खरेदीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात तीन महिन्यांनंतर जमा झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ‘लोकमत’ने १३ मार्चच्या अंकात ‘भात खरेदी केंद्राचा आधार हरपला’ अशी बातमी प्रकाशित केली होती. त्याचा परिणाम म्हणून आदिवासी विकास महामंडळाने भात खरेदी केंद्रावर भात दिलेल्या शेतक-यांचे पैसे शुक्रवारी दुपारनंतर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. यामुळे भात पिकाचे कष्टाचे पैसे मिळाल्याने शेतकरी वर्गाने दै. ‘लोकमत’चे आभार मानले.सरकारने थकीत कर्जमाफी व नियमित हप्ते भरणाºया शेतकºयांना अनुदान दिल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असतानाच वसई तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते. आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत भात खरेदी केंद्रावर तीन महिन्यांपासून भात खरेदी केलेले असताना त्या खरेदीचे पैसे हातात न आल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण होते. होळी सण साजरा करायला तरी भात खरेदीचे पैसे मिळतील या आशेवर शेतकरी असताना सणाच्या दिवसातही खात्यात पैसे जमा न झाल्याने शेतकरी नाराज होते. भात खरेदी केल्यानंतर पंधरा दिवसात धान खरेदीचे पैसे शेतक-याच्या खात्यात जमा होतात. पण या वर्षी मात्र शेतकºयांकडून भात खरेदी केल्यानंतर लगेच आॅनलाइन नोंदणी व पावती देणे बांधनकारक असताना पावती देण्यासाठीही अधिकाºयांनी पंधरा दिवस लावले. त्यामुळे भात खरेदीचे पैसे येण्यास उशीर झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.या वर्षी आधारभूत भात खरेदी केंद्रावर क्विंटलमागे दरात व देण्यात येणाºया बोनसमध्ये वाढ झाल्याने ही दरवाढ बळीराजाला दिलासा देणारी होती. मागील वर्षी क्विंटलमागे १७५० व बोनस २०० रुपये असा शासनाचा भाताला हमी भाव होता. पण या वर्षी दरात वाढ होत १८५० व बोनस ७०० असा दर लागू झाल्याने शेतकरी बांधवांसाठी ही समाधानाची बाब ठरली होती. काही शेतकºयांनी २४ डिसेंबरला भात खरेदी केंद्रावर भाताची विक्री केली होती. पण त्या विक्रीचे पैसे तीन महिने झाले तरी खात्यात जमा न झाल्याने शेतकरी वर्गाला अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. तर मार्चअखेर आल्याने अनेक शेतकºयांना सोसायटीकडून घेतलेले पीक कर्ज भरायचे होते. अशा चिंतेत शेतकरी असतानाच ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्याने महामंडळाने तत्काळ याची दखल घेत शेतकºयांच्या खात्यात भात खरेदीचे पैसे जमा करण्यात आले.मी डिसेंबर महिन्यात भात खरेदी केंद्रावर भात विक्री केले होते. ते पैसे मार्चमध्ये ‘लोकमत’ने दिलेल्या बातमीमुळे मिळण्यास मदत झाली असल्याने व नेहमी शेतकरी वर्गासाठी या दैनिकाची मदत होत असल्याने ‘लोकमत’चे आभारी आहोत.-कृपेश पाटील, शेतकरी, वडघर

टॅग्स :FarmerशेतकरीpalgharपालघरVasai Virarवसई विरार