शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

पैसे घेता, मग रेतीच्या गाड्या का पकडता?, रेतीमाफियांनी पोलिसांना विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 3:24 AM

वसई तालुक्यातील खानिवडे उंबरपाडा रेती बंदरावर सक्शन पंपाद्वारे रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रक, जेसीबी वर पालघर जिल्ह्याचा पदभार स्विकारलेल्या पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी छापे मारून करोडो चा मुद्दे माल जप्त केला.

पारोळ : वसई तालुक्यातील खानिवडे उंबरपाडा रेती बंदरावर सक्शन पंपाद्वारे रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रक, जेसीबी वर पालघर जिल्ह्याचा पदभार स्विकारलेल्या पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी छापे मारून करोडो चा मुद्दे माल जप्त केला. या कारवाईचा रेती व्यवसायि कांनी विरोध करत रेतीच्या भरलेल्या गाड्या सोडताना बंदरात उभे राहून पैसे घेता. मग कारवाई का करता असा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे.विरारच्या हद्दीत चिखलडोंगरी, खार्डी, शिरगाव, वैतरणा चांदीप, उसगाव, खाणीवडे, हेदिवडे, चिमणे, नारंगी, तानसा आणि कोसिबे असे १२ रेतीबंदरे आहेत. या बंदरांवर वाळूमाफियांकडून वाळूउपसा सुरूच होता. या वाळूउपशामुळे वैतरणा आणि शिरगाव रेल्वे पुलालाही धोका निर्माण झाला आहे. वैतरणा खाडीतून वाळूउपसा करून खानिवडे ते उंबरपाडा रस्त्यावरून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक सुरूच होती. शासकीय वाहने या रस्त्याने येऊ नयेत, यासाठी रस्त्यावर खड्डे करण्यात आले आहेत; तसेच रेतीच्या गाडीची ओळख पटू नये यासाठी गाड्यांच्या नंबर प्लेटवर चिखल, वंगण, ग्रीस लावले जाते.पालघर पोलिस अधीक्षक गौरव सिंह यांनी स्वत: धाडसत्र सुरु केले असून या धाडीत या पथकाने ४३ ट्रक, १ कार, १ जेसीबी असा ४ कोटी ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर वाळूमाफियांनी सात ट्रक पळवून नेले. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान वसई तालुक्यात काही महसूल आणि पोलिसांच्या आशीर्वादानेच हा कारभार चालत असल्याचे दस्तुरखुद्द वाळू काढणार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. विरार पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी बंदरात सिव्हिल ड्रेसवर गाड्या मोजण्यासाठी असतो. आणि तो पैसे जमा करतो जर पैसे घेता मग कारवाई कशाला करता असा सवाल विचारला जात आहे. जर पोलीस अधीक्षक सिंह यांना जर खरोखर हि वाळू तस्करी रोखायची असेल तर त्यांनी वसुलीबाज पोलीस कर्मचाºयांना शोधून त्यांना कंट्रोल ला जमा करावे. आणि ज्यांच्या हद्दीतून रेती काढली जाईल त्या अधिकाºयावर कारवाई करा असे सांगितले.>वाळूमाफियांचा सल्लारेती उत्खननावर बंदी असताना महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या नजरेआड रेतीची चोरटी वाहतूक केली जाते. त्यामुळे शासनाचा मोठ्याप्रमाणात महसूल बुडत आहे.अधिकारी हे संपत्ती गोळा करीत आहेत. जर त्यांना शासनाने परवानगी दिल्यास तो पैसा शासनाला जाईल असा सल्ला वाळू माफिया देतात.