शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यातील १९० अवैध शाळांवर कारवाई ! सीईओंचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 01:07 IST

पालघर जिल्ह्यातील १९० अनधिकृत ठरलेल्या शाळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याने या शाळांवर कारवाई करण्याच्या लोकमतच्या पाठपुराव्याला यश

पालघर - जिल्ह्यातील १९० अनधिकृत ठरलेल्या शाळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याने या शाळांवर कारवाई करण्याच्या लोकमतच्या पाठपुराव्याला यश आले असून सुरू असलेल्या या सर्व शाळांवर कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.जिल्ह्यातील तब्बल १९० शाळा या अनधिकृत असल्याचे जाहीर करुन या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मागच्या पाच वर्षांप्रमाणे या वर्षीही केले होते. मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी या शाळा खेळ खेळत असल्याचे कळत असतांनाही अशा शाळांवर कारवाई करण्यास शिक्षण विभाग आपले हात आखडते घेत असल्याने अशा फक्त फायद्याचे गणित आखणाºया शाळांवर कारवाई करण्याची मागणी लोकमतने लावून धरली होती. त्यामुळे अशा सुरू असणाºया अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत शिक्षण सचिवाकडे एक वर्षांपूर्वी जि.प.ने मार्गदर्शक सूचना मागितल्या होत्या. या सूचनावर काहीही निर्णय होत नसल्याने या शाळांना करण्यात येणाºया दंडापोटी शासनाचे १ कोटी ९० लाखाचे नुकसान प्रत्येक वर्षी होत होते.पालघर तालुक्यात इयत्ता पहिली ते १० वीच्या १७ शाळा, तलासरी तालुक्यातील २ शाळा, डहाणू तालुक्यातील २ शाळा, वाडा तालुक्यातील ११ शाळा, जव्हार तालुक्यातील १ शाळा, मोखाड्यातील एक शाळा, विक्र मगडमधील ५ शाळा अशा फक्त ४० शाळा तर वसई तालुक्यातील सर्वाधिक १५० शाळा अशा प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या मराठी माध्यम, इंग्रजी मध्यम व उर्दू माध्यमाच्या १९० शाळांना अनधिकृत म्हणून जाहीर करण्यात आले आहे.जिल्ह्यातील बोईसर, नालासोपारा, भाट पाडा दहिसर (वसई), बोळींज, गासकोपरी, कामण, मालजीपाडा, पेल्हार, सातीवली, माणिकपूर, विरार आदी भागातील झोपडपट्टीतील परप्रांतीय आणि गरीब कामगारांच्या अज्ञानाचा फायदा उचलून त्यांच्याकडून मोठे डोनेशन उकळून त्यांच्या मुलांना प्रवेश दिला जातो. अनेक वर्षांपासून शासनाकडूूून या शाळांना मान्यता मिळत नसतानाही राज्यशासनाच्या शिक्षण विभाग आणि स्थानिक शिक्षण विभागाच्या काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने या शाळा आणि त्यामागून सुरू असलेला गोरखधंदा अव्याहतपणे सुरूच होता. या शाळांनी शिक्षण मंत्र्यामार्फत मिळविलेल्या स्थगिती आदेशाची मुदत संपल्यानंतरही या अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे धाडस शिक्षण विभाग का दाखवत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८ चा भंग या शाळांनी केल्याने पोटकलम (५) अन्वये १ लाखाच्या दंडाची वसुली करणे आणि शाळा बंद न केल्यास प्रत्येक दिवशी १० हजाराचा दंड ठोठावण्यात येणार आहे.पाच दिवसांत सादर होणार अहवालमुख्य कार्यकारी अधिकारी बोरीकर यांनी शिक्षण विभागाला २० आॅक्टोबर २०१८ ला दंड वसूल करण्याच्या आदेशाबाबत शिक्षण सचिवाकडून मार्गदर्शक सूचना मागविण्यात आल्या होत्या. परंतु त्याबाबत कुठल्याही सूचना मिळाल्या नसल्याने शिक्षण विभाग हतबल ठरले होते. अखेर जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आलेली टिप्पणी मंजूर करून अनधिकृत शाळा बंद न केल्यास कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. त्या अनुषंगाने या अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश देऊनही त्या शाळा बंद करण्यात न आल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून गटशिक्षणाधिकाºयांनी पाच दिवसाच्या आत (३० जून) पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :SchoolशाळाpalgharपालघरEducation Sectorशिक्षण क्षेत्र