शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

‘ओव्हरलोड’ अवजड वाहनांमुळे अपघात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 23:28 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे पूर्वी रुंदीकरण, त्यानंतर चौपदरीकरण आणि आता सहापदरीकरण करण्यात आले आहे.

मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवजड वाहनांमुळे अपघात होण्याच्या घटना वाढल्या असून ‘ओव्हरलोड’मुळे हे प्रकार घडत आहेत. मात्र आरटीओ व वाहतूक नियंत्रण पोलीस अधिकारी व कर्मचारी या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे पूर्वी रुंदीकरण, त्यानंतर चौपदरीकरण आणि आता सहापदरीकरण करण्यात आले आहे. मात्र तरीही या महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. दिल्ली, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आदी भागांतून आलेले हजारोे ट्रेलर व इतर अवजड वाहने या महामार्गावरून धावतात. ही वाहने मर्यादेपेक्षा जास्त माल भरून नियमांचे उल्लंघन करीत असतात. तसेच अनेक वाहनांची मागची पार्किंग सिग्नल लाईट बंद असते. नंबर प्लेटही नीटपणे दिसत नाही.

पीयूसी असूनही काळा धूर निघतो, अशा अनेक त्रुटी असलेली वाहने या मार्गावरून धावत असल्याचे निदर्शनास येत असते. अशा वाहनांमुळे रात्री तसेच दिवसाही अपघात होत असतात. मात्र तरीही आरटीओ व वाहतूक नियंत्रण पोलीस कारवाई करीत नाहीत, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

कारवाई करीत असल्याचा पोलिसांचा दावा

आरटीओचे अधिकारी अनिल पाटील यांच्याशी संपर्कसाधला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. मात्र वाहतूक नियंत्रण शाखा दुर्वेस येथील सपोनि दिंडे यांच्याशी संपर्क साधला असता, अवजड मोटरवाहनांवर अद्यापपर्यंत भरपूर कारवाई केली आहे व पुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या चालकांवर व मोटर वाहनांवरही कारवाई केली जात आहे, असे असे ते म्हणाले.

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्ग