शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

५८ लाख खर्च तरीही ‘वाघ’ प्रकल्प वांझोटा; पाटबंधारे खात्याची ठेकेदारांवर मेहेरनजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 05:36 IST

शहर व लगतच्या गावपाड्याची तहान भागावी तसेच शेतीचे सिंचन व्हावे यासाठी १९९६ मध्ये पाटबंधारे खात्याने मुहुर्तमेढ रोवलेल्या वाघ प्रकल्पाने २२ वर्षे झाली तरी ना भूमीपुत्रांची तहान भागवली ना शेतीचे सिंचन केले.

 रविंद्र साळवेमोखाडा : शहर व लगतच्या गावपाड्याची तहान भागावी तसेच शेतीचे सिंचन व्हावे यासाठी १९९६ मध्ये पाटबंधारे खात्याने मुहुर्तमेढ रोवलेल्या वाघ प्रकल्पाने २२ वर्षे झाली तरी ना भूमीपुत्रांची तहान भागवली ना शेतीचे सिंचन केले. त्यावर आतापर्यंत ५८ लाख ५८ हजार रुपये खर्च झाला असून कालव्यांची कामे न झाल्याने तो रखडला आहे. हा सगळा प्रकार माहितीच्या अधिकारामध्ये उघड झाला आहे.शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणाºया वाघ नदीवरील १९९६ मध्ये हाती घेतलेल्या या प्रकल्पाचे काम निकृष्ट झाले. त्यास जागोजागी गळती लागली आहे. प्रकल्प मार्गी लागला नसतांनाही त्याच्या मलमपट्टीवर २२ लाख रुपये खर्ची पडणार आहेत. आगोदर चेन्नारेड्डी व आता त्यांचे भाऊ ए. बी. नाझीरेड्डी या ठेकेदाराच्या वेळखाऊ व निकृष्ट कामामुळे धरण उशाशी अन् कोरड घशाशी अशी स्थिती असतांना पाटबंधारे खात्याचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दरम्यान, वाडा व पालघर विभागाचे उपविभागिय अधिकारी एस. पी. मोरे यांनी ठेकेदारांची पाठराखण केली असून निधी नव्हता. तरीही तो काम करीतच होता असे सांगितले. परिस्थिती मात्र, ते सांगतात त्यापेक्षा वेगळीच आहे.परिसरातील ५१० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी १९९६ मध्ये या धरणाचे काम हाती घेण्यात आले होते. त्याच्या माध्यमातून मोखाडा शहरासह लगतच्या गावपाड्यांचा पाणी व सिंचन प्रश्न सुटेल, अशी अशा होती परंतु असे काहीच साध्य झालेले नाही. टाकपाड्या पर्यंत येणाºया या कालव्याचे काम तेली पाड्या पर्यंत येऊन थांबले आहे. वर्षभराचा कालावधी हे काम पूर्ण होण्यासाठी लागणार आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प पूर्ण होण्या आगोेदरच या धरणाला प्रचंड गळती लागली आहे. यामुळे या धरणातील जलसाठा दिवसेंदिवस घटतो आहे.दुरु स्तीसाठी २२ लाखांची तरतूदया प्रकल्पासाठी ७९ लाखांच्या आसपास खर्च अपेक्षित असून त्याचा प्रस्ताव मंत्रालयात विचाराधीन आहे. त्याचे कालवे बांधणे व धरणाला लागलेली गळती थांबविणे यासाठी दुरु स्ती विभागाकडे २२ लाखाची तरतूद करण्यात आली असून जूनपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे वाडा व पालघरचे उपविभागिय अधिकारी एस. पी. मोरे यांनी लोकमतला दिली.फायदा कमी, तोटाच जास्तधरणाच्या मलमपट्टीचे काम सुरु असतांना कालव्यांना मोठी गळती लागल्याने परिसरातील जमीन कायमच ओली राहत असल्याने ती नापीक होत आहे. लगतच्या गावपाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेले नाही. ज्या आदिवासी शेतकºयांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत.त्यातील काहींना अद्यापही त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. हे पाहता या धरणापासून भूमीपुत्रांना फायदा कमी व तोटाच जास्त झाला आहे अशी त्यांची संतप्त भावना आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार