शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

१४ अंगणवाडी सेविका रुजू! निलंबन रद्द, कोकण आयुक्तांनी दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 02:57 IST

बालकांना आणि मातांना दिला जाणार निकृष्ट पोषण आहार बंद करावा आणि पोषण आहार सामग्रीची थकित बिले तत्काळ अदा करावीत, या रास्त मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली अंगणवाडीसेविकांनी केलेल्या आंदोलनाचा ठपका ठेऊन बडतर्फ केलेल्या १५ अंगणवाडीसेविकांपैकी १४ जणींवरील कारवाई रद्द करून त्यांना कामावर पुन्हा रुजू होण्याचे आदेश कोकण विभागीय महसूल आयुक्तांनी दिले आहेत.

- हितेन नाईकपालघर : बालकांना आणि मातांना दिला जाणार निकृष्ट पोषण आहार बंद करावा आणि पोषण आहार सामग्रीची थकित बिले तत्काळ अदा करावीत, या रास्त मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली अंगणवाडीसेविकांनी केलेल्या आंदोलनाचा ठपका ठेऊन बडतर्फ केलेल्या १५ अंगणवाडीसेविकांपैकी १४ जणींवरील कारवाई रद्द करून त्यांना कामावर पुन्हा रुजू होण्याचे आदेश कोकण विभागीय महसूल आयुक्तांनी दिले आहेत.आंदोलन करणाºया अंगणवाडीसेविकांना पालघर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी बडतर्फ केले होते. याविरोधात या सेविकांनी महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे अपील केले होते.हे अपील एक तर दाखल करून न घेणे किंवा दाखल करून घेतले तर त्यावर नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर निर्णय देणे अभिप्रेत असताना तब्बल सात महिने रखडवून ठेवल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने करून कोकण आयुक्तांकडे प्रकरण दाखल केले होते. दरम्यान, अंगणवाडीसेविकांनी केलेल्या खुलाशात एकतर आम्ही आंदोलनात सहभागी नव्हतो किंवा आम्ही आंदोलनात सहभागी होऊन चूक केली, अशा आशयाचा लेखी मजकूर आल्यानंतर त्यांची बडतर्फी रद्द झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी सीता घाटाळ यांची बडतर्फी कायम ठेवण्यात आली आहे.काय होते प्रकरण...या अंगणवाडीसेविकांनी कुपोषित बालकांना पोषण आहार चांगल्या दर्जाचा मिळावा, यासाठी २४ एप्रिल रोजी आंदोलन केले होते. त्यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेऊन १९ मे २०१७ रोजी त्यांना बडतर्फ केले होते. तसेच बडतर्फीच्या काळात त्यांना मानधन मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे आंदोलन करून चूक केली, असे खुलासे करण्याची वेळ सेविकांवर आली होती.याबाबत वारंवार मागण्या झाल्या, तक्रारी झाल्या. मात्र, शासन काही करीत नसल्याने जिल्हा परिषदेच्या आवारातच चूल पेटवून आणि निकृष्ट टीएचआरपासून बनवलेले लाडू जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना भेट देऊन हा आहार बंद करावा, अशी मागणी केली होती.आंदोलकांच्या लेखी निवेदनास उत्तर न देणाºया निधी चौधरींना अडविण्यात आले. यावेळी आंदोलकांवर मुख्य कार्यकारी अधिकाºयांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याआधारे ही बडतर्फी केली गेली होती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार