शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
6
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
7
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
8
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
9
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
10
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
11
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
12
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
13
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
16
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
19
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
20
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप

१४ अंगणवाडी सेविका रुजू! निलंबन रद्द, कोकण आयुक्तांनी दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 02:57 IST

बालकांना आणि मातांना दिला जाणार निकृष्ट पोषण आहार बंद करावा आणि पोषण आहार सामग्रीची थकित बिले तत्काळ अदा करावीत, या रास्त मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली अंगणवाडीसेविकांनी केलेल्या आंदोलनाचा ठपका ठेऊन बडतर्फ केलेल्या १५ अंगणवाडीसेविकांपैकी १४ जणींवरील कारवाई रद्द करून त्यांना कामावर पुन्हा रुजू होण्याचे आदेश कोकण विभागीय महसूल आयुक्तांनी दिले आहेत.

- हितेन नाईकपालघर : बालकांना आणि मातांना दिला जाणार निकृष्ट पोषण आहार बंद करावा आणि पोषण आहार सामग्रीची थकित बिले तत्काळ अदा करावीत, या रास्त मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली अंगणवाडीसेविकांनी केलेल्या आंदोलनाचा ठपका ठेऊन बडतर्फ केलेल्या १५ अंगणवाडीसेविकांपैकी १४ जणींवरील कारवाई रद्द करून त्यांना कामावर पुन्हा रुजू होण्याचे आदेश कोकण विभागीय महसूल आयुक्तांनी दिले आहेत.आंदोलन करणाºया अंगणवाडीसेविकांना पालघर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी बडतर्फ केले होते. याविरोधात या सेविकांनी महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे अपील केले होते.हे अपील एक तर दाखल करून न घेणे किंवा दाखल करून घेतले तर त्यावर नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर निर्णय देणे अभिप्रेत असताना तब्बल सात महिने रखडवून ठेवल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने करून कोकण आयुक्तांकडे प्रकरण दाखल केले होते. दरम्यान, अंगणवाडीसेविकांनी केलेल्या खुलाशात एकतर आम्ही आंदोलनात सहभागी नव्हतो किंवा आम्ही आंदोलनात सहभागी होऊन चूक केली, अशा आशयाचा लेखी मजकूर आल्यानंतर त्यांची बडतर्फी रद्द झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी सीता घाटाळ यांची बडतर्फी कायम ठेवण्यात आली आहे.काय होते प्रकरण...या अंगणवाडीसेविकांनी कुपोषित बालकांना पोषण आहार चांगल्या दर्जाचा मिळावा, यासाठी २४ एप्रिल रोजी आंदोलन केले होते. त्यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेऊन १९ मे २०१७ रोजी त्यांना बडतर्फ केले होते. तसेच बडतर्फीच्या काळात त्यांना मानधन मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे आंदोलन करून चूक केली, असे खुलासे करण्याची वेळ सेविकांवर आली होती.याबाबत वारंवार मागण्या झाल्या, तक्रारी झाल्या. मात्र, शासन काही करीत नसल्याने जिल्हा परिषदेच्या आवारातच चूल पेटवून आणि निकृष्ट टीएचआरपासून बनवलेले लाडू जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना भेट देऊन हा आहार बंद करावा, अशी मागणी केली होती.आंदोलकांच्या लेखी निवेदनास उत्तर न देणाºया निधी चौधरींना अडविण्यात आले. यावेळी आंदोलकांवर मुख्य कार्यकारी अधिकाºयांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याआधारे ही बडतर्फी केली गेली होती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार