शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

१०० किमीचा प्रवास बेतला बाळाच्या जिवावर; आयसीयू सुविधेचा अभाव; मोखाड्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 09:03 IST

दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील एका मातेला मोखाडाहून जव्हार आणि तिथून नाशिक असा १०० किमीचा प्रवास करावा लागला होता, त्यात तिचा मृत्यू झालेला. पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली असून, आता एका बालकाला जीव गमवावा लागला आहे.

रवींद्र साळवे

मोखाडा : किनिस्ते ग्रामपंचायतीमधील योगिता पुजारी या गर्भवतीने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात २५ एप्रिल रोजी एका सुदृढ बालकाला जन्म दिला. जन्मावेळी बालकाचे वजन तीन किलो असल्याचे सांगितले. मात्र, यानंतर सायंकाळी त्या बालकाला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्याने जव्हार कुटीर रुग्णालय येथे हलविले. तेथेही आयसीयू सुविधा किंवा त्या बालकाला वाचवू शकेल अशी यंत्रणा उपलब्ध नसल्याने नाशिक येथे नेले. मात्र, नाशिक जिल्हा रुग्णालयात पोहोचताच काही मिनिटांतच त्या बालकाला मृत घोषित केल्याचे पालकांनी सांगितले. यामुळे आयसीयू सुविधेअभावी १०० किमीचा प्रवास करावा लागला, जर सुविधा जिल्ह्यात उपलब्ध असती तर बालकाचा प्राण वाचला असता, अशी खंत जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या घटनेने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील एका मातेला मोखाडाहून जव्हार आणि तिथून नाशिक असा १०० किमीचा प्रवास करावा लागला होता, त्यात तिचा मृत्यू झालेला. पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली असून, आता एका बालकाला जीव गमवावा लागला आहे.

त्या बालकाला श्वास घेण्यास त्रास झाल्याने जव्हार येथे हलविले होते, मात्र येथेही त्याला ऑपरेट करणे शक्य न झाल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविले. यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. मात्र, कदाचित श्वासनलिका आणि हृदयासंबंधी काही आजार जन्मत असावेत असा अंदाज आहे.

डॉ. भरत महाले, वैद्यकीय अधीक्षक, मोखाडा ग्रामीण रुग्णालय