शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

प्रशासन जागे झाले, गढूळ पाणी घेऊन आले, दातिवरेत दूषित पाणी घेऊन टँकर आले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 1:04 PM

Palghar News: गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला, मात्र टँकरचे पाणी दूषित, गढूळ असल्याने ‘असले पाणी पिऊन आम्ही आजारी पडायचे का?’ असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थांना बाटलीतूनच तहान भागवावी लागत आहे. 

- हितेन नाईकपालघर - पालघर तालुक्यातील दातिवरे ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल या विषयावर ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा प्रशासनाला खडबडून जाग आली. याची गंभीर दखल घेत गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला, मात्र टँकरचे पाणी दूषित, गढूळ असल्याने ‘असले पाणी पिऊन आम्ही आजारी पडायचे का?’ असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थांना बाटलीतूनच तहान भागवावी लागत आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला चांगले धारेवर धरले. यावेळी कार्यकारी अभियंता ए. ए. मुळे यांनी दुरुस्ती केल्याने पाणी सुरू झाल्याची माहिती पुरवली आहे. मात्र, दातिवरे गावाला दुरुस्तीनंतर थोडेसे पाणी आले नंतर बंद झाले.  

केळवे-माहीम प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ही १७ गावांसाठी बनवलेली आहे. १९८० सालच्या ४४ वर्षे जुन्या असलेल्या या योजनेकडे गावावर सत्ता गाजविणाऱ्या अनेक राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना महिन्यातून एकदा पिण्याचे पाणी मिळते. याव्यतिरिक्त त्यांना पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन तहान भागवावी लागते. पाणी मिळावे, म्हणून मंडल अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केल्याचे ग्रामविकास अधिकारी एस. बी. ठाकरे यांचे म्हणणे आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर झालेल्या बैठकीत जीवन प्राधिकरण विभागाने मायखोप येथील कामाची दुरुस्ती झाल्यावर पाणी आल्याचा दावा केला. मात्र, तो खोटा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

आणखी एक वर्ष दातिवरेसह १७ गावांतील लोकांसाठी जीवन प्राधिकरणाकडून सुमारे ५६ कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी कमीतकमी एक वर्षभराचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत दातिवरे गावातील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न अधांतरीच लटकणार.

टॅग्स :palgharपालघरWaterपाणी