शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

जागतिक जलदिन: ६० टक्के पाण्याचा होतोय दररोज अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 10:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तंत्रज्ञानाने श्रीमंत होणारे जग २१ व्या शतकात नैसर्गिक संसाधनांनी गरीब होत आहे. जलस्त्रोत मृत होत आहे. भूजल पातळी प्रचंड खालावत असताना ६० टक्के पाण्याचा दररोज अपव्यय होत आहे. ही जलसंकटाची नांदी आहे. यावर रेन हार्वेस्टींग हा एक पर्याय आहे. शिवाय मृत जलस्त्रोतांना संजीवनी देणे गरजेचे आहे. ...

ठळक मुद्देरेन वॉटर हार्वेस्टींग, जलस्त्रोतांना संजीवनीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तंत्रज्ञानाने श्रीमंत होणारे जग २१ व्या शतकात नैसर्गिक संसाधनांनी गरीब होत आहे. जलस्त्रोत मृत होत आहे. भूजल पातळी प्रचंड खालावत असताना ६० टक्के पाण्याचा दररोज अपव्यय होत आहे. ही जलसंकटाची नांदी आहे. यावर रेन हार्वेस्टींग हा एक पर्याय आहे. शिवाय मृत जलस्त्रोतांना संजीवनी देणे गरजेचे आहे. जागतिक जलदिनी शासन, प्रशासन, संस्था, संघटना, नागरिकांनी यावर कृतिशील विचार करणे क्रमप्राप्त ठरत आहे.सध्या जलस्त्रोतांची वाटचाल मृतावस्थेकडे होत आहे. जागतिक पातळीवर २२ मार्च जलदिन पाळला जातो; पण तो सार्थकी लागतोय का, हा प्रश्न आहे़ जलस्त्रोत व जलसाठा असलेल्या भारत देशातही पावसाच्या पाण्याची साठवण क्षमता अत्यंत कमी झाली आहे. सातत्याने भूजल पातळी घटत असून नैसर्गिक जलस्त्रोत मृत होत आहे. हे जलसंकट टाळण्यासाठी जलदिनी प्रामाणिक संकल्प व प्रत्यक्ष कृतीची कास धरणे गरजेचे आहे. देशातील पर्वत, टेकड्या, जंगले, नद्या, नाले, तलाव, गावतलाव, सिंचन प्रकल्प यांच्या नोंदी घेतल्यात; पण त्या काळात दर्शविलेले जलस्त्रोत त्याच स्थितीत, क्षमतेत आज अस्तित्वात आहेत काय, वर्तमान स्थिती काय याची शासन दरबारी नोंद नसल्याचे दिसते. काही प्रमाणात स्वाभाविक रचना म्हणजे ‘टोपोग्राफी’ पाहणी करण्यात आली होती; पण त्याचे फलित कृतीत उतरलेले नाही.ग्रामीण भागात प्रती व्यक्ती प्रतिदिन ४० लिटर तर शहरांत १५० लिटर पाण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून हे पाणी पिण्याचे म्हणून दिले जाते; पण त्यातील ६० टक्के पाण्याचा शौचालय, स्रानगृह, अंगणात टाकणे, वाहने धुणे यात अपव्यय होत आहे. केवळ ४ ते ६ टक्के पाणी पिण्याकरिता वापरले जाते. हा अपव्यय रोखणे तथा जलस्त्रोत बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत निकडीचे आहे. अन्यथा जलसंकटाची टांगती तलवार कायम राहणार, हे निश्चित!

काय कराव्या उपाययोजनापावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे रेन वॉटर हार्वेस्टींगद्वारे शक्य आहे. यात छताच्या पावसाचे जमिनीत पुनर्भरण, शहरात पाण्याच्या वापरावर नियंत्रण, वने व कृषी क्षेत्रात तळ्यांची निर्मिती, सिंचनासाठी ठिबक, तुषार आदी पद्धतींचा वापर करणे गरजेचे आहे. लहान धरणे, बंधाऱ्यांची निर्मिती करणे, उद्योगांनी पाण्याचा वापर कमी करून प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर करणे, सांडपाणी शुद्ध करून उद्योग व बाह्य कामासाठी वापर करणे, नदी, नाल्यांचे संवर्धन करून नियोजन करणे तथा पाण्याचा दुरूपयोग टाळण्यासाठी जलसाक्षरता करून बाष्पीभवन थांबविण्यास्तव धरणे, कालव्यांवर सोलर पॅनल लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Waterपाणी