शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

जागतिक जलदिन: ६० टक्के पाण्याचा होतोय दररोज अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 10:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तंत्रज्ञानाने श्रीमंत होणारे जग २१ व्या शतकात नैसर्गिक संसाधनांनी गरीब होत आहे. जलस्त्रोत मृत होत आहे. भूजल पातळी प्रचंड खालावत असताना ६० टक्के पाण्याचा दररोज अपव्यय होत आहे. ही जलसंकटाची नांदी आहे. यावर रेन हार्वेस्टींग हा एक पर्याय आहे. शिवाय मृत जलस्त्रोतांना संजीवनी देणे गरजेचे आहे. ...

ठळक मुद्देरेन वॉटर हार्वेस्टींग, जलस्त्रोतांना संजीवनीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तंत्रज्ञानाने श्रीमंत होणारे जग २१ व्या शतकात नैसर्गिक संसाधनांनी गरीब होत आहे. जलस्त्रोत मृत होत आहे. भूजल पातळी प्रचंड खालावत असताना ६० टक्के पाण्याचा दररोज अपव्यय होत आहे. ही जलसंकटाची नांदी आहे. यावर रेन हार्वेस्टींग हा एक पर्याय आहे. शिवाय मृत जलस्त्रोतांना संजीवनी देणे गरजेचे आहे. जागतिक जलदिनी शासन, प्रशासन, संस्था, संघटना, नागरिकांनी यावर कृतिशील विचार करणे क्रमप्राप्त ठरत आहे.सध्या जलस्त्रोतांची वाटचाल मृतावस्थेकडे होत आहे. जागतिक पातळीवर २२ मार्च जलदिन पाळला जातो; पण तो सार्थकी लागतोय का, हा प्रश्न आहे़ जलस्त्रोत व जलसाठा असलेल्या भारत देशातही पावसाच्या पाण्याची साठवण क्षमता अत्यंत कमी झाली आहे. सातत्याने भूजल पातळी घटत असून नैसर्गिक जलस्त्रोत मृत होत आहे. हे जलसंकट टाळण्यासाठी जलदिनी प्रामाणिक संकल्प व प्रत्यक्ष कृतीची कास धरणे गरजेचे आहे. देशातील पर्वत, टेकड्या, जंगले, नद्या, नाले, तलाव, गावतलाव, सिंचन प्रकल्प यांच्या नोंदी घेतल्यात; पण त्या काळात दर्शविलेले जलस्त्रोत त्याच स्थितीत, क्षमतेत आज अस्तित्वात आहेत काय, वर्तमान स्थिती काय याची शासन दरबारी नोंद नसल्याचे दिसते. काही प्रमाणात स्वाभाविक रचना म्हणजे ‘टोपोग्राफी’ पाहणी करण्यात आली होती; पण त्याचे फलित कृतीत उतरलेले नाही.ग्रामीण भागात प्रती व्यक्ती प्रतिदिन ४० लिटर तर शहरांत १५० लिटर पाण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून हे पाणी पिण्याचे म्हणून दिले जाते; पण त्यातील ६० टक्के पाण्याचा शौचालय, स्रानगृह, अंगणात टाकणे, वाहने धुणे यात अपव्यय होत आहे. केवळ ४ ते ६ टक्के पाणी पिण्याकरिता वापरले जाते. हा अपव्यय रोखणे तथा जलस्त्रोत बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत निकडीचे आहे. अन्यथा जलसंकटाची टांगती तलवार कायम राहणार, हे निश्चित!

काय कराव्या उपाययोजनापावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे रेन वॉटर हार्वेस्टींगद्वारे शक्य आहे. यात छताच्या पावसाचे जमिनीत पुनर्भरण, शहरात पाण्याच्या वापरावर नियंत्रण, वने व कृषी क्षेत्रात तळ्यांची निर्मिती, सिंचनासाठी ठिबक, तुषार आदी पद्धतींचा वापर करणे गरजेचे आहे. लहान धरणे, बंधाऱ्यांची निर्मिती करणे, उद्योगांनी पाण्याचा वापर कमी करून प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर करणे, सांडपाणी शुद्ध करून उद्योग व बाह्य कामासाठी वापर करणे, नदी, नाल्यांचे संवर्धन करून नियोजन करणे तथा पाण्याचा दुरूपयोग टाळण्यासाठी जलसाक्षरता करून बाष्पीभवन थांबविण्यास्तव धरणे, कालव्यांवर सोलर पॅनल लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Waterपाणी