शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक जलदिन: ६० टक्के पाण्याचा होतोय दररोज अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 10:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तंत्रज्ञानाने श्रीमंत होणारे जग २१ व्या शतकात नैसर्गिक संसाधनांनी गरीब होत आहे. जलस्त्रोत मृत होत आहे. भूजल पातळी प्रचंड खालावत असताना ६० टक्के पाण्याचा दररोज अपव्यय होत आहे. ही जलसंकटाची नांदी आहे. यावर रेन हार्वेस्टींग हा एक पर्याय आहे. शिवाय मृत जलस्त्रोतांना संजीवनी देणे गरजेचे आहे. ...

ठळक मुद्देरेन वॉटर हार्वेस्टींग, जलस्त्रोतांना संजीवनीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तंत्रज्ञानाने श्रीमंत होणारे जग २१ व्या शतकात नैसर्गिक संसाधनांनी गरीब होत आहे. जलस्त्रोत मृत होत आहे. भूजल पातळी प्रचंड खालावत असताना ६० टक्के पाण्याचा दररोज अपव्यय होत आहे. ही जलसंकटाची नांदी आहे. यावर रेन हार्वेस्टींग हा एक पर्याय आहे. शिवाय मृत जलस्त्रोतांना संजीवनी देणे गरजेचे आहे. जागतिक जलदिनी शासन, प्रशासन, संस्था, संघटना, नागरिकांनी यावर कृतिशील विचार करणे क्रमप्राप्त ठरत आहे.सध्या जलस्त्रोतांची वाटचाल मृतावस्थेकडे होत आहे. जागतिक पातळीवर २२ मार्च जलदिन पाळला जातो; पण तो सार्थकी लागतोय का, हा प्रश्न आहे़ जलस्त्रोत व जलसाठा असलेल्या भारत देशातही पावसाच्या पाण्याची साठवण क्षमता अत्यंत कमी झाली आहे. सातत्याने भूजल पातळी घटत असून नैसर्गिक जलस्त्रोत मृत होत आहे. हे जलसंकट टाळण्यासाठी जलदिनी प्रामाणिक संकल्प व प्रत्यक्ष कृतीची कास धरणे गरजेचे आहे. देशातील पर्वत, टेकड्या, जंगले, नद्या, नाले, तलाव, गावतलाव, सिंचन प्रकल्प यांच्या नोंदी घेतल्यात; पण त्या काळात दर्शविलेले जलस्त्रोत त्याच स्थितीत, क्षमतेत आज अस्तित्वात आहेत काय, वर्तमान स्थिती काय याची शासन दरबारी नोंद नसल्याचे दिसते. काही प्रमाणात स्वाभाविक रचना म्हणजे ‘टोपोग्राफी’ पाहणी करण्यात आली होती; पण त्याचे फलित कृतीत उतरलेले नाही.ग्रामीण भागात प्रती व्यक्ती प्रतिदिन ४० लिटर तर शहरांत १५० लिटर पाण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून हे पाणी पिण्याचे म्हणून दिले जाते; पण त्यातील ६० टक्के पाण्याचा शौचालय, स्रानगृह, अंगणात टाकणे, वाहने धुणे यात अपव्यय होत आहे. केवळ ४ ते ६ टक्के पाणी पिण्याकरिता वापरले जाते. हा अपव्यय रोखणे तथा जलस्त्रोत बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत निकडीचे आहे. अन्यथा जलसंकटाची टांगती तलवार कायम राहणार, हे निश्चित!

काय कराव्या उपाययोजनापावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे रेन वॉटर हार्वेस्टींगद्वारे शक्य आहे. यात छताच्या पावसाचे जमिनीत पुनर्भरण, शहरात पाण्याच्या वापरावर नियंत्रण, वने व कृषी क्षेत्रात तळ्यांची निर्मिती, सिंचनासाठी ठिबक, तुषार आदी पद्धतींचा वापर करणे गरजेचे आहे. लहान धरणे, बंधाऱ्यांची निर्मिती करणे, उद्योगांनी पाण्याचा वापर कमी करून प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर करणे, सांडपाणी शुद्ध करून उद्योग व बाह्य कामासाठी वापर करणे, नदी, नाल्यांचे संवर्धन करून नियोजन करणे तथा पाण्याचा दुरूपयोग टाळण्यासाठी जलसाक्षरता करून बाष्पीभवन थांबविण्यास्तव धरणे, कालव्यांवर सोलर पॅनल लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Waterपाणी