शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

समृद्धी महामार्गाचे काम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 9:14 PM

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातून जात आहे. या तालुक्यातील ८७६ शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्यात येत आहे. जवळपास ७३५ शेतकऱ्यांची जमीन आतापर्यंत खरेदी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतीन तालुक्यातून जाणार महामार्ग : जमीन संपादनाचे काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातून जात आहे. या तालुक्यातील ८७६ शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्यात येत आहे. जवळपास ७३५ शेतकऱ्यांची जमीन आतापर्यंत खरेदी करण्यात आली आहे.जिल्ह्यात भूसंपादनाचे काम ८६.८ टक्के पूर्ण करण्यात आले आहे. वर्धा, सेलू, आर्वी या तीन तालुक्यातून हा महामार्ग जाणार असून या महामार्गाचे काम जिल्ह्याच्या सर्वाच तालुक्यात युद्धपातळीवर सुरू आहे. वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी, पांढरकवडा आदी भागात या महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. वर्धा तालुक्यातून २३.९०० कि.मी., सेलू तालुक्यातून २५.१६० तर आर्वी तालुक्यातून ११.६७० कि.मी. चा समृद्धी महामार्ग जाणार आहे. सर्वाधिक १६ गावे सेलू तालुक्यातील असून वर्धा तालुक्यातील १० तर आर्वी तालुक्यातील आठ गावांतील शेतकºयांच्या जमिनी या महामार्गासाठी घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ३५०.४२ कोटी रुपयांचा मोबदला शेतकºयांना वितरित करण्यात आला असून उन्हाळ्याच्या दिवसातही मार्ग जाणार असलेल्या भागात जमीन सपाटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आर्वी तालुक्यातून १८५, सेलू तालुक्यातून ३९९ आणि वर्धा तालुक्यातील २९२ शेतकºयांकडून जमीन घेण्यात आली आहे. सेलू तालुक्यातील २५७.०६२, वर्धा तालुक्यातून २०६.१७२, आर्वी तालुक्यातून ११६.२३ हेक्टर जमीन शेतकºयांकडून घेण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात सध्या समृद्धी महामार्गाशिवाय बुट्टीबोरी ते तुळजापूर या जुन्या महामार्गाचेही विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग