शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

महिला धडकल्या जि.प. सदस्यांच्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:29 PM

सध्या गावातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे;पण महिलांच्या या समस्येकडे ग्रा.पं. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत गावातील जलसंकटावर मात करण्यासाठी तात्काळ योग्य पाऊल उचलण्यात यावे या मुख्य मागणीसाठी घागर घेऊन निघालेला महिलांचा मोर्चा सुरूवातीला ग्रा.पं. कार्यालयात पोहोचला.

ठळक मुद्देजलसंकटावर मात करण्याची रेटली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : सध्या गावातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे;पण महिलांच्या या समस्येकडे ग्रा.पं. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत गावातील जलसंकटावर मात करण्यासाठी तात्काळ योग्य पाऊल उचलण्यात यावे या मुख्य मागणीसाठी घागर घेऊन निघालेला महिलांचा मोर्चा सुरूवातीला ग्रा.पं. कार्यालयात पोहोचला. परंतु, तेथे सरपंच नसल्याचे लक्षात येताच महिलांनी आपला मोर्चा जि.प. सदस्य चंद्रकांत ठक्कर यांच्या घराकडे वळविला. महिलांनी ठक्कर यांचे निवासस्थान गाठून त्यांना महिलांची समस्या समजावून सांगितली.गावातील नागरिकांना नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची असली तरी २८ फेबु्रवारीपर्यंत सदर विभागाकडून नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्वीच गावातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना त्याकडे ग्रा.पं. प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे महिलांच्या अडचणीत भर पडली असून ग्रा.पं. प्रशासनाचे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी संतप्त महिलांनी हातात घागर घेऊन ग्रा.पं. कार्यालय गाठले. तेथे सरपंचच नसल्याचे लक्षात येताच महिलांनी आपला मोर्चा जि.प. सदस्य चंद्रकांत ठक्कर यांच्या निवासस्थानाकडे वळविला. ठक्कर यांचे निवासस्थान गाठल्यावर आंदोलनकर्त्या महिलांनी आपली अडचण जि.प. सदस्यांना सांगितली. त्यावर ठक्कर यांनी ग्रा.पं. प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य सूचना केल्या. शिवाय आंदोलनाचा इशाराही दिला. आंदोलनात संगीता कामडी, वैशाली नरड, कल्पना घोडे, शशिकला हरणे, कल्पना बडे, इंदिरा नरड, संगीता तेलरांधे, वंदना देशमुख, शोभा ढोले, शोभा नरड, मंगला काटकर, कमला साठोणे, शशिकला वंदाडे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Waterपाणी