शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

वन्यजीव सप्ताह विशेष : मानव-वन्यजिवांच्या जगण्यातील संघर्षाने पर्यावरणाची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 11:03 IST

भारतात १९५२ पासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्यजिवांचे संरक्षण-संवर्धन करून त्याबाबत जागृती करणे हा त्यामागील हेतू आहे. हा हेतू रुजविण्यासाठीच भारत सरकारने ‘इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ’ची स्थापना केली आहे. (wildlife week special)

ठळक मुद्देवन्यजिवांचे संरक्षण-संवर्धन करणे

वर्धा : देशाच्या संमृद्धतेमध्ये वन्यजिवांचे अतिशय महत्त्व आहे. बंगालचे वाघ, आशियातील एकशिंगी गेंडे व भारतीय मोर अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण वन्यप्राण्यांचे सुरक्षित वस्तिस्थान बनण्यासाठी भारतामध्ये अतिशय पोषक वातावरण आहे. येथील वन्यजिवांचे राष्ट्रीय चिन्हांमध्येही दर्शन घडते. त्याचबरोबर पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि संस्कृती यातही वन्यजीव महत्त्वाची भूमिका बजावत असतात.  (wildlife week special)

पण, अलीकडे मानव आणि वन्यजिवांमध्ये जगण्यातून संघर्ष निर्माण झाला आहे. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याने वन्यजिवांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे हे निसर्गचक्र, निसर्गसौंदर्य आणि वैविध्यता कायम राखण्याकरिता वन्यजीव सप्ताहाच्यानिमित्ताने का होईना, मानवाने त्यांच्या संरक्षणाकरिता हातभार लावण्याची गरज आहे. अलीकडच्या काही वर्षांत वन्यजिवांच्या संरक्षणासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे.

लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक प्रजातींचे संरक्षण विविध योजनांमुळे होत आहे. भारतात १९५२ पासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्यजिवांचे संरक्षण-संवर्धन करून त्याबाबत जागृती करणे हा त्यामागील हेतू आहे. हा हेतू रुजविण्यासाठीच भारत सरकारने ‘इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ’ची स्थापना केली आहे. यातून वन्यजिवांच्या संरक्षणाकरिता प्रयत्न होत आहे. वन्यजिवांना धोका निर्माण करण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत असून, त्याला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

वन्यजीव विनाशाची काही प्रमुख कारणे

- वृक्षतोड

शहरीकरण, उद्योग, रस्ते, धरणे, व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने वन्यजीव व पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. २००९ मध्ये जंगल नष्ट होण्याच्या प्रमाणात भारत जगातील पहिल्या दहामध्ये होता.

- नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर

वन्यजिवांच्या अधिवासातून नैसर्गिक संसाधनांचा अविचारी पद्धतीने उपसा सुरू असल्याने अधिवास प्रभावित झालेत. उदा. कोळशाच्या खाणी, रेती उपसा, जंगलातील लाकूड व इतर उपयोगी पदार्थ.

- तस्करी

हत्ती, वाघ, गेंडे व हरिण या वन्यजिवांची आयव्हरी, नख आणि कातडींसाठी जगभरात बेकायदेशीररित्या तस्करी केली जाते. या व्यापारातून दरवर्षी ३५ ते ७० हजार कोटींची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

- शिकार

अन्न, छंद, करमणूक किंवा अधिवासाकरिता अतिक्रमण करून वन्यजिवांची शिकार केली जाते. भारताच्या संपन्न वन्यजीव संपदेपुढे हे मोठे आव्हान आहे. त्यातून वन्यजीवच नाही, तर पर्यावरणाचा समतोल ढासळतो.

- रस्ते अपघात

जंगलातून होणाऱ्या नवीन महामार्गावर वन्यजिवांच्या अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. जंगलातील महामार्ग वन्यजिवांचे नवीन शत्रू बनले आहेत. या महामार्गावर वाहनांनी मारलेल्या वन्यप्राण्यांची संख्या धक्कादायक आहे.

- जंगलातील रेल्वे रुळ

दाट वनातून जाणाऱ्या रेल्वेमार्गानेही वन्यजिवांचे जीवनमान प्रभावित झाले आहे. त्यांचे प्रजनन प्रभावित होणे ही चिंताजनक बाब मानली जाते. पश्चिम बंगालमधील चपरामारी रेल्वे रुळावर १७ हत्तींचा मृत्यू झाला होता.

- वणवे

कधी नैसर्गिक, तर कधी हेतूपुरस्सरपणे जंगलांना आगी लावण्याच्या घटना सतत घडतात. नुकताच ब्राझिल आणि ॲमेझॉनच्या जंगलांना लागलेल्या आगीने वन्यजिवांचे झालेले नुकसान न भरून निघणारे आहे.

राज्यातील वन्यजीव व्यवस्थापनाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून वनविभागाने 'स्टेट वाइल्ड लाइफ अॅक्शन प्लॅन' आखला आहे. सन २०२१ ते २०३१ या १० वर्षांसाठी तो असून, याला मंजुरी मिळाल्यास हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.

वन्यजीव आणि मानव यांच्यातील तीव्रता कमी करायची असेल, तर मुख्यत्वे विकास साधताना वन्यजिवांच्या नैसर्गिक अधिवासाचाही गंभीरपणे विचार करावा लागेल. शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी सौरऊर्जेवर चालणारी विद्युत उपकरणे उपलब्ध करून द्यावी लागतील. वन्यजिवांचे मृत्यू अथवा त्यांच्यावर होणारे हल्ले अनैसर्गिक असले, तरी त्यामागची कारणे नैसर्गिक आहेत. कारण मानव आणि वन्यजीव दोघांकरिता हा संघर्ष जगण्याचा आहे, जिंकण्याचा नव्हे!

प्रा. संदीप पेटारे, वन्यजीव अभ्यासक

टॅग्स :wildlifeवन्यजीवenvironmentपर्यावरणNatureनिसर्ग