शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

पती-पत्नीच्या सुंदर नात्यात जीवघेणी हिंसा का वाढतेय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 17:45 IST

घरोघरी वाढताहेत वाद : 'भरोसा'कडे ११ महिन्यांत १,२३१ तक्रारी; ३२ प्रकरणांत विविध ठाण्यात गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गेल्या काही वर्षांत घरगुती हिंसाचारात वाढ होत आहे. किरकोळ कारणांवरून पती-पत्नीमध्ये होणारे वाद इतके विकोपाला जात आहेत की, याचे पर्यवसान हाणामारी आणि अगदी खून करण्यामध्ये होत आहे. ही नात्यातील वाढती हिंसा एक चिंतेची बाब बनली असून, पती पत्नीच्या सुंदर नात्यात इतकी हिंसकता येतेच कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलकडे मागील ११ महिन्यांत १,२३१ तक्रारी दाखल असून, ३२ प्रकरणांत विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

एक काळ असा होता की, पुरुषी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी किंवा स्वताचे नैराश्य, अपयश लपविण्यासाठी पती आपल्या पत्नीवर हात उगारत असे. दुर्दैव म्हणजे कुटुंबातील सदस्यांना यात वावगे काहीच वाटत नव्हते. कुणी पुरुषाला अडविण्याचा प्रयत्नहीं करीत नव्हता अजूनही ही स्थिती फारशी बदललेली नाही, मात्र आता एकविसाव्या शतकात सबला पत्नीकडूनदेखील क्षुल्लक कारणावरून मागचा-पुढचा विचार न करता पतीला शिवीगाळ करणे, मारहाण करणे, विवाहबाह्य संबंधातून खून करणे, असे प्रकार वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

नात्या-नात्यात वाढली धोक्याची घंटा पती गिफ्ट देत नाही. फिरायला नेत नाही. म्हणून दोन वर्षांपूर्वी पत्नीने पतीच्या नाकावर ठोसा मारला होती. दोन दिवसापूर्वीच शहर हद्दीत पत्नीने न सांगता हप्ते भरले म्हणून पत्नीला शिवीगाळ, मारहाण फैल्याची घटना घडली.ज्यांनी एकमेकांसमवेत आयुष्य घालविण्याची स्वप्न रंगवली तेच एकमेकाना दुखापत करायलादेखील मागेपुढे पाहत नाहीत, ही नात्यासाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. यावर विचारमंथन होण्याची गरज आहे.

महिनानिहाय 'भरोसा'त प्राप्त झालेल्या तक्रारी जानेवारी - ११५फेब्रुवारी - ८९मार्च - १२१एप्रिल - १०१मे - १११जून - १४५जुलै - १४५ऑगस्ट - ११२सप्टेंबर - १०९ऑक्टोबर - १०४नोव्हेंबर - ७९

लग्न, संसार म्हणजे काय? "याच गोही आला पती-पत्नी विसरत चालले आहेत, मी, माझे आणि मला इतकेच त्यांचे नाते व्यावहारिक झाले आहे. मोवाइलमुळे निर्माण झालेल्या मुलांना भोगावा लागत आहे. विसंवादाचा परिणाम लहान पूर्वी कुटुंबातील सवस्य एकत्रित बसून चहा पित असत. आता चहा पितानाही हातात मोबाइल असतो, अशी स्थिती आहे. पती-पत्नीमध्ये भावनिकता राहिलेली नाही." - माधुरी वाघाडे, सहाराक पोलिस निरीक्षक, भरोसा सेल

"अनेकदा पती-पत्नीला नात्यात संवादाचा अभाव, विश्वासाचा तुटलेला धागा आणि ताणतणाव यामुळे टोकाच्या घटना घडतात. त्यामागे मानसिक ताण, चिडचिड, किंवा नैराश्य यांचा मोठा वाटा असतो, बायका या पुरुषांना मारत नाहीत है सार्वजनिक सत्य मानणे चुकीचे आहे, कारण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये महिलाही आक्रमक होऊ शकतात. भारतात महिलांसाठी अनेक संरक्षणात्मक कायदे आहेत, जसे घटनेतील कलम ४९८ अ (कॉटुंबिक हिंसेविरुद्ध संरक्षण) परंतु पुरुषांसाठी अशा प्रकारच्या संरक्षणात्मक तरतुदी फारशा उपलब्ध नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात महिलांकडून असे प्रकार घडतात." - अॅड. मंजुश्री आसोपा,

१,१९० प्रकरणांचा निपटारा, ४१ प्रकरणे प्रलंबितजिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलकडे जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत तब्बल १,२३१ तक्रारी दाखल आल्या होत्या. यापैकी १,११० प्रकरणांत भरोसा सेलमधील महिला कर्मचाऱ्यांनी पती-पत्नीचे समुपदेशन करून त्यांचा संसार पुन्हा फुलविला, तर ४१ प्रकरणे अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा