शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

महागडे बियाणे कशाला? घरातील सोयाबीन करेल तुम्हाला मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2022 5:00 AM

सध्या सोयाबीन उत्पादक सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत आहेत. जिल्ह्यात उत्पादित होणारे हेच सोयाबीन खरिपात सोयाबीनची लागवड करणाऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून बियाण्यांच्या दरात दिवसेंदिवस वाढ आहे, तर यंदा डिझेल दरवाढीमुळे बियाण्यांच्या किमतीवरही त्याचा परिणाम पडल्याचे काही कृषी व्यावसायिक सांगतात.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून, सध्या उन्हाळवाहीची कामे पूर्ण केली जात आहेत. खरीप हंगामात ४ लाख ३७ हजार हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होणार असून, सोयाबीनसाठी एक लाख ४२ हजार क्विंटल तर इतर पिकासाठी ९ हजार ८५१ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे.मोठ्या प्रमाणात बियाण्यांची गरज भासणार असली तरी यंदाच्या उन्हाळी हंगामात जिल्ह्यात तब्बल ७०३.४ हेक्टर जमिनीवर उन्हाळी सोयाबीनची लागवड झाली होती, तर सध्या सोयाबीन उत्पादक सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत आहेत. जिल्ह्यात उत्पादित होणारे हेच सोयाबीन खरिपात सोयाबीनची लागवड करणाऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून बियाण्यांच्या दरात दिवसेंदिवस वाढ आहे, तर यंदा डिझेल दरवाढीमुळे बियाण्यांच्या किमतीवरही त्याचा परिणाम पडल्याचे काही कृषी व्यावसायिक सांगतात. त्यामुळेच वाढत्या महागाईत महागडे बियाणे घेण्यापेक्षा घरातील सोयाबीन शेतकऱ्यांना मालामाल करण्याची शक्यता असून, शेतीवरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरचेच बियाणे शेतकऱ्यांनी वापरावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

७०३.४ हेक्टरवर उन्हाळी पेरासिंचनाची सोय असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी सोयाबीन लागवडीला पसंती दर्शविली. ७०३.४ हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनचा पेरा झाला असून, सध्या सोयाबीन मळणीच्या कामाला शेतकरी गती देत आहेत.

९० हजार मेट्रिक टन खताची लागणार गरजजिल्ह्याला ९० हजार मेट्रिक टन खताची आवश्यकता असून, मागणी प्रमाणे बियाणे व खते उपलब्ध होणार आहे. खतांचा ४ हजार ६७० मेट्रिक टन इतका बफर स्टॉक करण्यात आला आहे. शिवाय खरीप हंगामात बांधावर खते व बियाणे या योजनेंतर्गत ४ हजार ३०० शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर खते व बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

घरच्या घरी करा बीज प्रक्रियाशेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने मागील वर्षी तसेच यंदाही जिल्ह्यात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अवघ्या काही तासांच्या प्रशिक्षणाअंति शेतकऱ्यांना घरच्या घरीच बीज प्रक्रिया करून बियाण्याची गुणवत्ता तपासता येते. त्यामुळे  फसवणूक टळते.

१ हजार १७० कोटी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टयंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार १७० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. मागेल त्याला पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष रणनिती तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

गौडबंगाल करणाऱ्यांवर होणार कारवाई

खरीप हंगामात बोगस बियाणे विकल्या जाण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाच्या वतीने विशेष भरारी पथके तयार करण्यात आली आहे. त्यात जिल्हास्तरीय एक तर तालुका स्तरावर प्रत्येकी एक पथकाचा समावेश आहे. बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई केली जाणार आहे.

शेतकऱ्यांनी शेतीवरील उत्पादन खर्च करू करण्याच्या उद्देशाने घरातीलच सोयाबीनचा बियाणे म्हणून वापर करावा. गुणवत्ता तपासण्यासाठी सुरुवातीला बीज प्रक्रिया करावी. जिल्ह्यात बियाणे व खताचा तुटवडा निर्माण होणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी