शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तर स्वामिनाथन आयोग केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 10:40 PM

महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागातील २० लाख कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र मागील १० वर्षापासून मागणी असूनही शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू केला नाही. तो केव्हा लागू करणार असा सवाल पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांना निवेदनातून केला आहे.

ठळक मुद्देशंकरप्रसाद अग्निहोत्री यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागातील २० लाख कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र मागील १० वर्षापासून मागणी असूनही शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू केला नाही. तो केव्हा लागू करणार असा सवाल पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांना निवेदनातून केला आहे.अग्निहोत्री यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाचा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर १ लाख १४ हजार कोटीचा वार्षिक खर्च होतो. व तो आता १ लाख ४७ हजार कोटीचा होईल. महाराष्ट्र शासनाचे वार्षिक बजेट जवळपास ४ लाख कोटीचे आहे. त्यापैकी दीड लाख कोटी रुपये फक्त २० हजार परिवारातील म्हणजे ८ टक्के लोकांवर होणार आहे. आणि अडीच लाख कोटी रुपये म्हणजे ९२ टक्के शासनाच्या इतर विभागावर खर्च केल्या जाते. गेल्या १० वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोग लागू करण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन शुल्कावर आधारित हमी भाव मिळाला पाहिजे. शासनाने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव घोषित केला परंतु कांदयाचा उत्पादन खर्च १० रुपये प्रती किलो आहे पण त्यांना एकही रुपया मिळत नाही. कापसाचे उत्पादन खर्च ७००० प्रती क्विंटल आहे त्याला भाव १००० रुपयाने कमी मिळतो. गव्हाचा उत्पादन खर्च २७०० रुपये प्रती क्विंटल असा आहे तो २२०० रुपये विकल्या जात आहे. शेतकऱ्यांना त्याच्या खर्चा एव्हढी भाव मिळत नाही. शासनाने कर्ज माफ केले ते १ -२ लाख रुपयापर्यंत परंतु शासकीय कर्मचारी ज्यांचे लाखाच्या वर वेतन आहे त्यांना १४००० चे वर वेतनवाढ आणि ज्यांना ३० हजारचे वर आहे त्यांना ४००० वेतनवाढ या सातव्या वेतन आयोगाद्वारे केली आहे. कर्मचारी हे संघटीत असल्यामुळे सरकारला वेठीस धरतात व आपल्या मागण्या पूर्ण करून घेतात, असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोगFarmerशेतकरी