शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

विद्युत तारेत घर्षणाने गव्हाचा झाला कोळसा; शेतकऱ्याचा तोंडाशी आलेला घास हिरावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 13:08 IST

दीड एकरातील संपूर्ण गहू जळून खाक

वर्धा : शेतातून गेलेल्या जीवंत विद्युत तारेत घर्षण होत आगीची ठिणगी उभ्या गहू पिकात पडली. अशातच आगीने संपूर्ण गहू पिकाला आपल्या कवेत घेत होत्याचे नव्हते केल्याने सालोड (हिरापूर) येथील शेतकरी किशोर झोड यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.

सालोड (हिरापूर) येथील शेतकरी किशोर भगवान झोड यांचे शामपूर शिवारात शेत आहे. खरिपात त्यांनी सोयाबीनची लागवड केली. मात्र, अतिवृष्टीमुळे शेती खरडून गेली. खरिपातील नुकसानीची भरपाई निघावी, या हेतूने मोठे धाडस करून त्यांनी रब्बीत दोन एकर शेतजमिनीवर गव्हाची लागवड केली. पिकाची योग्य निगा घेतल्याने कापणी अंती चांगले उत्पन्न होईल, अशी आशा झोड यांना होती; पण बुधवारी अचानक लागलेल्या आगीत दीड एकरातील संपूर्ण गहू पीक कोळसा झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी झोड यांच्या शेताकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले; पण तोवर दीड एकरातील गहू पीक आगीच्या भक्षस्थानी पडून कोळसा झाले. पीक जळून मोठे नुकसान झाल्याने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातagricultureशेतीFarmerशेतकरीwardha-acवर्धा