शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

विद्युत तारेत घर्षणाने गव्हाचा झाला कोळसा; शेतकऱ्याचा तोंडाशी आलेला घास हिरावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 13:08 IST

दीड एकरातील संपूर्ण गहू जळून खाक

वर्धा : शेतातून गेलेल्या जीवंत विद्युत तारेत घर्षण होत आगीची ठिणगी उभ्या गहू पिकात पडली. अशातच आगीने संपूर्ण गहू पिकाला आपल्या कवेत घेत होत्याचे नव्हते केल्याने सालोड (हिरापूर) येथील शेतकरी किशोर झोड यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.

सालोड (हिरापूर) येथील शेतकरी किशोर भगवान झोड यांचे शामपूर शिवारात शेत आहे. खरिपात त्यांनी सोयाबीनची लागवड केली. मात्र, अतिवृष्टीमुळे शेती खरडून गेली. खरिपातील नुकसानीची भरपाई निघावी, या हेतूने मोठे धाडस करून त्यांनी रब्बीत दोन एकर शेतजमिनीवर गव्हाची लागवड केली. पिकाची योग्य निगा घेतल्याने कापणी अंती चांगले उत्पन्न होईल, अशी आशा झोड यांना होती; पण बुधवारी अचानक लागलेल्या आगीत दीड एकरातील संपूर्ण गहू पीक कोळसा झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी झोड यांच्या शेताकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले; पण तोवर दीड एकरातील गहू पीक आगीच्या भक्षस्थानी पडून कोळसा झाले. पीक जळून मोठे नुकसान झाल्याने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातagricultureशेतीFarmerशेतकरीwardha-acवर्धा