शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

शेतात विहीर, वीज जोडणी, मात्र व्होल्टेजच नाही; महावितरणला पत्रव्यवहार करूनही तोडगा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 17:07 IST

महावितरणचा प्रताप : आंबोडा शिवारात पाच वर्षांपासून ओलित अशक्य, अनेकदा तक्रारी तरी होतेय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेत ओलितासाठी पदरमोड करून शेतकऱ्याने शेतात विहीर खोदली. डिमांड भरून वीज पुरवठाही घेतला. मात्र, पंपाने ओलित करावे एवढे व्होल्टेज शेतात मिळत नसल्याने गत पाच वर्षांपासून सोयी सुविधा असताना ओलित करणे शक्य होत नाही, यासंदर्भात वारंवार महावितरणला पत्रव्यवहार केला, निवेदने दिली. मात्र, त्यावर तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्याने टोकाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलून दाखविले. हा प्रकार तालुक्यातील आंबोडा गावातील शेतशिवारात घडत आहे. 

शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखून त्यांना समृद्ध करण्याच्या आव आणणाऱ्या शासनाचे पितळ उघड झाले आहे. तालुक्यातील आंबोडा (लुंगे) येथील शेतकरी वासुदेव राऊत (६९) यांचे आंबोडा शेतशिवारात दोन एकर शेत आहे. शेतात ओलिताची सोय नसल्याने त्यांनी पदरमोड करून शेतात विहीर खोदली. 

महावितरणकडे डिमांड भरून वीज जोडणी घेतली. हजारो रुपये खर्च करून मोटरपंप आणि आवश्यक साहित्यही खरेदी केले. मात्र, देण्यात आलेल्या वीजजोडणीला व्होल्टेजच राहात नसल्याने पाण्याची सोय असताना ओलित करता आले नाही. याची तक्रार महावितरणकडे करण्यात आली होती, त्यांनी अवैधपणे वीजपुरवठा घेणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करीत व्होल्टेजची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही समस्या कायम असल्याने तक्रारी करण्यात आल्या. 

दरम्यान, नवे रोहित्र बसविण्यात आले होते. त्यावर ३२ मोटारपंपांच्या वीज जोडणी असल्याने समस्या जशीच्या तशीच आहे. यासंदर्भात त्यानंतर वारंवार तक्रारी करूनही महावितरण याकडे डोळेझाक करीत असल्याने पिकांचे ओलित करणे अशक्य झाले आहे. 

याकडे संबंधित विभागाने लक्ष देत व्होल्टेजची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी शेतकरी वासुदेव राऊत यांनी केली आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 

दोन एकरात सव्वा तीन क्विंटल सोयाबीनयंदा शेतकरी राउत यांनी सोयाबीनची लागवड केली होती. दोन एकरात त्यांना केवळ ३ विचेटल ३० किलो उत्पन्न झाले. रब्बी हंगामात नुकसान भरून काढू, या आशेवर त्यांनी ३० किलो चणा, ४० किलो गव्हाची पंधरवड्यापूर्वी पेरणी केली. मात्र, व्होल्टेज नसल्याने ओलित करणे शक्य झाले नसल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. 

अन्यथा टोकाची भूमिका "शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. खरिपात उत्पन्न आले नाही. रब्बी हंगामात केलेली पेरणी ओलिताअभावी निघाली नाही. तक्रारी करून थकलो, मात्र, अजून समस्या निकाली निघाली नसल्याने टोकाची भूमिका घेण्यावाचून पर्याय राहिला नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देत व्होल्टेजची समस्या सोडवावी, अशी विनंती आहे."- वासुदेव राऊत, शेतकरी, आंबोडा

टॅग्स :electricityवीजfarmingशेती