शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

शेतात विहीर, वीज जोडणी, मात्र व्होल्टेजच नाही; महावितरणला पत्रव्यवहार करूनही तोडगा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 17:07 IST

महावितरणचा प्रताप : आंबोडा शिवारात पाच वर्षांपासून ओलित अशक्य, अनेकदा तक्रारी तरी होतेय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेत ओलितासाठी पदरमोड करून शेतकऱ्याने शेतात विहीर खोदली. डिमांड भरून वीज पुरवठाही घेतला. मात्र, पंपाने ओलित करावे एवढे व्होल्टेज शेतात मिळत नसल्याने गत पाच वर्षांपासून सोयी सुविधा असताना ओलित करणे शक्य होत नाही, यासंदर्भात वारंवार महावितरणला पत्रव्यवहार केला, निवेदने दिली. मात्र, त्यावर तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्याने टोकाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलून दाखविले. हा प्रकार तालुक्यातील आंबोडा गावातील शेतशिवारात घडत आहे. 

शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखून त्यांना समृद्ध करण्याच्या आव आणणाऱ्या शासनाचे पितळ उघड झाले आहे. तालुक्यातील आंबोडा (लुंगे) येथील शेतकरी वासुदेव राऊत (६९) यांचे आंबोडा शेतशिवारात दोन एकर शेत आहे. शेतात ओलिताची सोय नसल्याने त्यांनी पदरमोड करून शेतात विहीर खोदली. 

महावितरणकडे डिमांड भरून वीज जोडणी घेतली. हजारो रुपये खर्च करून मोटरपंप आणि आवश्यक साहित्यही खरेदी केले. मात्र, देण्यात आलेल्या वीजजोडणीला व्होल्टेजच राहात नसल्याने पाण्याची सोय असताना ओलित करता आले नाही. याची तक्रार महावितरणकडे करण्यात आली होती, त्यांनी अवैधपणे वीजपुरवठा घेणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करीत व्होल्टेजची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही समस्या कायम असल्याने तक्रारी करण्यात आल्या. 

दरम्यान, नवे रोहित्र बसविण्यात आले होते. त्यावर ३२ मोटारपंपांच्या वीज जोडणी असल्याने समस्या जशीच्या तशीच आहे. यासंदर्भात त्यानंतर वारंवार तक्रारी करूनही महावितरण याकडे डोळेझाक करीत असल्याने पिकांचे ओलित करणे अशक्य झाले आहे. 

याकडे संबंधित विभागाने लक्ष देत व्होल्टेजची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी शेतकरी वासुदेव राऊत यांनी केली आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 

दोन एकरात सव्वा तीन क्विंटल सोयाबीनयंदा शेतकरी राउत यांनी सोयाबीनची लागवड केली होती. दोन एकरात त्यांना केवळ ३ विचेटल ३० किलो उत्पन्न झाले. रब्बी हंगामात नुकसान भरून काढू, या आशेवर त्यांनी ३० किलो चणा, ४० किलो गव्हाची पंधरवड्यापूर्वी पेरणी केली. मात्र, व्होल्टेज नसल्याने ओलित करणे शक्य झाले नसल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. 

अन्यथा टोकाची भूमिका "शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. खरिपात उत्पन्न आले नाही. रब्बी हंगामात केलेली पेरणी ओलिताअभावी निघाली नाही. तक्रारी करून थकलो, मात्र, अजून समस्या निकाली निघाली नसल्याने टोकाची भूमिका घेण्यावाचून पर्याय राहिला नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देत व्होल्टेजची समस्या सोडवावी, अशी विनंती आहे."- वासुदेव राऊत, शेतकरी, आंबोडा

टॅग्स :electricityवीजfarmingशेती