शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतात विहीर, वीज जोडणी, मात्र व्होल्टेजच नाही; महावितरणला पत्रव्यवहार करूनही तोडगा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 17:07 IST

महावितरणचा प्रताप : आंबोडा शिवारात पाच वर्षांपासून ओलित अशक्य, अनेकदा तक्रारी तरी होतेय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेत ओलितासाठी पदरमोड करून शेतकऱ्याने शेतात विहीर खोदली. डिमांड भरून वीज पुरवठाही घेतला. मात्र, पंपाने ओलित करावे एवढे व्होल्टेज शेतात मिळत नसल्याने गत पाच वर्षांपासून सोयी सुविधा असताना ओलित करणे शक्य होत नाही, यासंदर्भात वारंवार महावितरणला पत्रव्यवहार केला, निवेदने दिली. मात्र, त्यावर तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्याने टोकाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलून दाखविले. हा प्रकार तालुक्यातील आंबोडा गावातील शेतशिवारात घडत आहे. 

शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखून त्यांना समृद्ध करण्याच्या आव आणणाऱ्या शासनाचे पितळ उघड झाले आहे. तालुक्यातील आंबोडा (लुंगे) येथील शेतकरी वासुदेव राऊत (६९) यांचे आंबोडा शेतशिवारात दोन एकर शेत आहे. शेतात ओलिताची सोय नसल्याने त्यांनी पदरमोड करून शेतात विहीर खोदली. 

महावितरणकडे डिमांड भरून वीज जोडणी घेतली. हजारो रुपये खर्च करून मोटरपंप आणि आवश्यक साहित्यही खरेदी केले. मात्र, देण्यात आलेल्या वीजजोडणीला व्होल्टेजच राहात नसल्याने पाण्याची सोय असताना ओलित करता आले नाही. याची तक्रार महावितरणकडे करण्यात आली होती, त्यांनी अवैधपणे वीजपुरवठा घेणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करीत व्होल्टेजची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही समस्या कायम असल्याने तक्रारी करण्यात आल्या. 

दरम्यान, नवे रोहित्र बसविण्यात आले होते. त्यावर ३२ मोटारपंपांच्या वीज जोडणी असल्याने समस्या जशीच्या तशीच आहे. यासंदर्भात त्यानंतर वारंवार तक्रारी करूनही महावितरण याकडे डोळेझाक करीत असल्याने पिकांचे ओलित करणे अशक्य झाले आहे. 

याकडे संबंधित विभागाने लक्ष देत व्होल्टेजची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी शेतकरी वासुदेव राऊत यांनी केली आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 

दोन एकरात सव्वा तीन क्विंटल सोयाबीनयंदा शेतकरी राउत यांनी सोयाबीनची लागवड केली होती. दोन एकरात त्यांना केवळ ३ विचेटल ३० किलो उत्पन्न झाले. रब्बी हंगामात नुकसान भरून काढू, या आशेवर त्यांनी ३० किलो चणा, ४० किलो गव्हाची पंधरवड्यापूर्वी पेरणी केली. मात्र, व्होल्टेज नसल्याने ओलित करणे शक्य झाले नसल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. 

अन्यथा टोकाची भूमिका "शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. खरिपात उत्पन्न आले नाही. रब्बी हंगामात केलेली पेरणी ओलिताअभावी निघाली नाही. तक्रारी करून थकलो, मात्र, अजून समस्या निकाली निघाली नसल्याने टोकाची भूमिका घेण्यावाचून पर्याय राहिला नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देत व्होल्टेजची समस्या सोडवावी, अशी विनंती आहे."- वासुदेव राऊत, शेतकरी, आंबोडा

टॅग्स :electricityवीजfarmingशेती