बसस्थानक परिसरातील जलप्याऊ घाणीत
By Admin | Updated: February 20, 2016 03:06 IST2016-02-20T03:06:18+5:302016-02-20T03:06:18+5:30
स्थानिक बसस्थानक आवारात जलप्याऊ जवळ केरकचरा व घाण साचून दुर्गंधी पसरत आहे.

बसस्थानक परिसरातील जलप्याऊ घाणीत
कारंजा (घा.): स्थानिक बसस्थानक आवारात जलप्याऊ जवळ केरकचरा व घाण साचून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे रोगराईला निमंत्रण दिले जात आहे. यामुळे रोगराईची साथ शहरात पसरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे हा साचलेला कचरा दररोज नियमितपणे साफ करण्याची गरज व्यक्त होत आहे.
दिवसभर बसस्थानकावर प्रवाश्यांची गर्दी असते. परिसरात एक हॉटेल आणि काही इतर दुकाने आहेत. प्रवासी या हॉटेल व दुकानांतून खाद्यपदार्थ विकत घेतात. खाणे झाल्यावर रिकाम्या पिशव्या आणि इतरही कचरा जलप्याऊजवळ फेकून देतात. हा कचरा अनेक दिवस तसाच पडून राहातो. या परिसराची नियमित स्वच्छता होणे आवश्यक आहे.
काही प्रवाशी, सामाजिक भान न ठेवता गुटखा, पान बसस्थानकाच्या भिंतीवर, जलप्याऊवर थूकत असतात. त्यामुळे प्रवाशांना बसायला तयार करण्यात आलेली बाके प्रवाशांना बसण्यासाठी वापरता येत नाहीत. पाणी पिण्यासाठी जलप्याऊ जवळ गेल्यावर पाणी पिण्यास कुणी धजावत नाही. ही घाण रोगराईला निमंत्रण देत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी असतानाही बसस्थानक आवारात प्रवासी बिनधास्तपणे धुम्रपान करीत असतात. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. या सर्व समस्यांकडे लक्ष देत त्यावर कायम तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यामुळे बसस्थानक व येथील जलप्याऊ नागरिकांचे आरोग्य बिघडवीत आहे. त्यामुळे येथे नियमित स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)