शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसाआड मिळेल पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 20:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वर्धा शहरातील नागरिकांना विहिरी व बोअरवेल कोरड्या झाल्याने सध्या भीषण पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या ...

ठळक मुद्देशहरवासीयांसाठी शुभवार्ता : पूर्वी व्हायचा पाच दिवसांनी पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरातील नागरिकांना विहिरी व बोअरवेल कोरड्या झाल्याने सध्या भीषण पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. अशातच न.प.च्यावतीने पाच दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली. शहरातील नागरिकांची समस्या लक्षात घेता नियोजनबद्ध कार्यक्रम आखून न.प.चा पाणी पुरवठा विभाग आता काम करीत आहे. त्यामुळे वर्धा शहरातील नागरिकांना आता चार दिवसाआड स्वच्छ पाणी मिळणार आहे. पालिकेच्या या पावलामुळे शहरवासियांना दिलासा मिळणार आहे.वर्धा शहरातील सुमारे १६ हजार कुटुंबियांना न.प. प्रशासन नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा करते. धाम प्रकल्पातील सोडण्यात आलेल्या पाण्याची पवनार व येळाकेळी येथून उचल केल्यानंतर सदर पाणी जलशुद्धीकरणात स्वच्छ केले जाते. त्यानंतर त्या पाण्याचा पुरवठा शहरातील १९ प्रभागातील नागरिकांना केल्या जातो.महाकाळी येथील धाम प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन केल्याने आणि वर्धा पाठबंधारे विभाग महिन्यातून एकदाच या प्रकल्पातून पाणी सोडत असल्याने पूर्वी वर्धा शहरातील नागरिकांना वर्धा न.प. प्रशासनाकडून पाच दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात होता. परंतु, पार पडलेल्या विशेष बैठकीत नियोजनबद्ध कार्यक्रम आखून त्यावर प्रभावी काम केले जाणार असल्याने वर्धेकरांना आता चार दिवसाआड स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी मिळणार आहे.विशेष बैठकीत ठोस निर्णयमे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाच दिवसाआड पाणी पुरवठा केल्यानंतर वर्धा न.प.च्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची विशेष बैठक पालिका कार्यालयात पार पडली. यावेळी न.प.च्या पाणी पुरवठा विभागाचेही तज्ज्ञांसह नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे आदींची उपस्थिती होती. यावेळी नागरिकांना पाणी देण्याच्या पाच दिवसात कशी कपात करता येते यावर सविस्तर आणि सर्व बाजूंनी चर्चा झाली. याच चर्चेदरम्यान ठोस निर्णय घेण्यात आल्याने आता वर्धेकरांना चार दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जाणार आहे.वर्धा नगरपरिषदेकडे सात जलकुंभमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या तुलनेत वर्धा नगर परिषदेची पाणी साठवण क्षमता कमी आहे. स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्याची साठवणूक करण्यासाठी सध्यास्थितीत वर्धा न.प.कडे सात जलकुंभ आहेत. असे असले तरी त्यापैकी पाच जलकुंभच कामात आणले जात आहे. तर उर्वरित दोन जलकुंभापैकी महावीर उद्यानातील एक जलकुंभ जीर्ण झाला आहे. त्यामुळे त्याचा पाहिजे तसा वापर केल्या जात नाही. तर लालालचपत रॉय शाळे शेजारील जलकुंभ नवीन असला तरी त्याच भागातील काही जलवाहिनी जीर्ण झाली असल्याने या जलकुंभाचा वापर करून नागरिकांना पाणी पुरवठा करणे पालिकेसाठी अडचणीचेच ठरत आहे. गत वर्षी १३ एप्रिलला याच जलकुंभातील पाणी सोडल्यानंतर तब्बल १३ ठिकाणी जलवाहिनी फुटली होती, हे विशेष.टँकरमुक्तीकडे वाटचालपवनार येथून वर्धेच्या दिशेने येणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने जलवाहिनी दुरूस्तीच्या कालावधीत वर्धा शहरातील काही भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला.शिवाय पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने अनेक भागातील नागरिकांकडून टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी होत होती. त्यावर प्रभावी उपाय ‘चार दिवसाआड होणारा पाणी पुरवठा’ हा ठरणार असल्याचा विश्वास न.प.च्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.रविवारी झाला श्रीगणेशावर्धा शहरातील नागरिकांना आता न.प. प्रशासन पाच दिवसा आड ऐवजी चार दिवसाआड पाणी पुरवठा करणार आहे.या नवीन निर्णयाची अंमलबजावणी रविवारपासून करण्यात आली आहे.पालिकेचा हा निर्णय पाणी टंचाईच्या झळा सोसणाºयांना दिलासा देणाराच आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई