शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

फुटलेल्या जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 9:47 PM

शहरालगतच्या १३ ग्रामपंचायतीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे पाणीपुरवठा केल्या जातो. त्यात शहरालगतच्या साटोडा-आलोडी ग्रामपंचायतचाही समावेश असून या परिसरातील जलवाहिनी तीन दिवसापासून फुटली आहे. त्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना जीवन प्राधिकरण किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही.

ठळक मुद्देआलोडीतील प्रकार । पंधरा दिवसापासून नागरिक मात्र तहानलेले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या १३ ग्रामपंचायतीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे पाणीपुरवठा केल्या जातो. त्यात शहरालगतच्या साटोडा-आलोडी ग्रामपंचायतचाही समावेश असून या परिसरातील जलवाहिनी तीन दिवसापासून फुटली आहे. त्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना जीवन प्राधिकरण किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही.जिल्ह्यात सर्वत्रच पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. शहरात पाचव्या दिवशी तर लगतच्या ग्रामपंचायत परिसरात पाच ते आठ दिवसादरम्यान पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नगरपालिका, ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन केले जात आहे. असे असतानाही यंत्रणेच्या दुर्लक्षितपणामुळेच वारंवार फुटणाऱ्या जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय होत आहे. शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायतच्या हद्दीतील आलोडी परिसरातील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये पंधरादिवसापासून पाणीपुरवठा झाला नसल्याने पाण्याकरिता हाहाकार आहे.पाण्यासाठी नागरिक दहादिशा भटकत असतानाच याच परिसरातील पाणीपुरवठ्याची जलवाहिनी मागील तीन दिवसापासून फुटलेली आहे. त्यातून दररोज लाखो लिटर पाणी वाहत असून मोठे डबके साचले आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीला कळविले असता अद्यापही दुरुस्ती केली नाही. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचेही लक्ष गेले नाही. शनिवार आणि रविवार दोन दिवस शासकीय सुटी असल्याने या दिवशी पाण्याचा उपव्यय कायमच राहणार असल्याचे चित्र आहे. एकीकडे नागरिकांच्या घशाला कोरड पडली असताना दुसरीकडे यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पाणी वाया जात असल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.पूर्वीच पाणीटंचाईपूर्वीच या भागातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच जलवाहिनी फुटून स्वच्छ पाण्याचा अपव्यय होत असल्याने सुजान नागरिकांकडून कार्यवाहीची जबाबदारी असलेल्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई