शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पाणी पुरवठा विहीर सुरक्षा भिंतीविनाच

By admin | Updated: November 11, 2016 01:50 IST

सहा हजार लोकसंख्या असलेल्या गावाला दीड कोटी रुपये किंमतीची नवीन नळ योजना कार्यान्वित करण्यात येत आहे.

नवी योजना : ताराच्या कुंपणाची मागणी घोराड : सहा हजार लोकसंख्या असलेल्या गावाला दीड कोटी रुपये किंमतीची नवीन नळ योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजनेसाठी नव्याने विहिरीचे खोदकाम व बांधकाम करून गावाला पाणी पुरवठा ही सुरू करण्यात आला. मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला सुरक्षा भिंत नसल्याने नागरिकांकडून सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. गावासाठी १९७५ मध्ये नळ योजना कार्यान्वित झाली. त्यावेळी दोन विहिरीद्वारे नळाला पाणी पुरवठा करण्यात आला. तेव्हा ४० वर्षांपूर्वी अमलात आणल्या गेलेल्या पाणी पुरवठा योजनेत या दोनही विहिरीच्या सुरक्षेसाठी तारेचे कुंपन व दरवाजा याचे प्रावधान होते. ही नळयोजना जुनी झाल्याने व जलवाहिन्या जिर्ण झाल्याने गावासाठी नवीन नळयोजना मंजूर झाली. त्या योजनेचे काम पूर्ण झाल्याचा गवगवा शासकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आला. घोराड या गावापासून खापरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावापासून सव्वा कि़मी. अंतरावर या योजनेची विहीर आहे. मात्र तिला सुरक्षा भिंत नसल्याने सहा हजार नागरिकांची सुरक्षा यामुळे कशी केली जाणार अशी शंका निर्माण होत आहे. या विहिरीला सुरक्षा भिंत बांधण्यात यावी अशी मागणी होत आहे. तांत्रिक दृष्ट्या योजनेचे काम चांगले असल्याचे प्रशस्त पत्र अधिकारी देत असतांनाच अल्पावधीतच या विहिरीची तोंडी चा काही भाग खचल्याचे दिसून येत आहे. विहिरीला सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा भिंत नसली तरी तारेचे कुंपन करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थ चर्चा करीत असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)