शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

आर्वीत ४१ गावांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

आर्वी तालुक्यातील पाच गावांतील विहिरी पाणीटंचाई निवारणाच्या पार्श्वभूमीवर अधिग्रहित करण्यात येणार आहेत. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यात कोणत्याही गावात पाणीटंचाई भासत नसल्याने एकाही ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त न झाल्याची माहिती निरंक होती.

ठळक मुद्देपाच गावातील विहिरी होणार अधिग्रहित : ४२२ हातपंपांपैकी अनेक नादुरुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा / आर्वी : तालुक्यातील पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनेच्या १ एप्रिल ते ३० जून २०२० या कालावधीतील आराखड्यातील तिसऱ्या टप्प्यात ४१ गावांचा समावेश आहे.पाणीटंचाई असलेल्या गावात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सर्वेक्षण केले असून पाणीटंचाई निवारणार्थ आराखडा निश्चित केला आहे. तालुक्याकरिता ८६ लाख २१ हजारांचे तरतूद करण्यात आली आहे.आर्वी तालुक्यातील पाच गावांतील विहिरी पाणीटंचाई निवारणाच्या पार्श्वभूमीवर अधिग्रहित करण्यात येणार आहेत. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यात कोणत्याही गावात पाणीटंचाई भासत नसल्याने एकाही ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त न झाल्याची माहिती निरंक होती.१ जानेवारी ते ३१ मार्च २०२० च्या दुसऱ्या टप्प्यात २८ गावांचा समावेश होता. यात २० गावांत विहीर खोलीकरण करण्याचा प्रस्ताव होता. १ एप्रिल ते ३० जूनपर्यंतच्या तिसऱ्या टप्प्यातील पाणीटंचाई निवारणार्थ आराखड्यात ४१ गावांचा समावेश आहे. यात प्रस्तावित योजनेतील उपलब्ध साधनात सार्वजनिक विहिरी ७, खाजगी विहिरी १, हातपंप ७, तर २ नळयोजनेचा समावेश आहे. अप्रचलित उपाययोजनेत तालुक्यातील २४ सार्वजनिक विहिरी खोल करणे, ६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, याचा समावेश आहे. प्रचलित उपाययोजनेअंतर्गत २० तात्पुरत्या विशेष दुरुस्तीचा समावेश आहे, तर १३ नवीन विंधन विहिरी घेण्याचा प्रस्तावित योजनेत समावेश आहे.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना सुरूतालुक्यातील बाजारवाडा, सालदरा या दोन गावांतील काही भागात नागरिकांना पाणी मिळत नसल्याने विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहे, तर सावंगी (पोड) येथे पूर्वीपासूनच पाणीटंचाई आहे. नांदपूर येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे काम सुरू आहे, तर खुबगाव येथील पाणीपुरवठा करणारी विहीर धरणात गेली आहे. त्यामुळे या पाच गावातील विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावही तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांना पंचायत समितीने सादर केला आहे.हातपंप दुरुस्ती करणारे पथक हवेआर्वी तालुक्यात ७२ ग्रामपंचायती असून २२४ गावे ग्रामपंचायत हद्दीत येतात. तालुक्यातील या गावात एकूण ४२२ हातपंप आहेत. नियमितपणे सरासरी एका आठवड्यात दहा ते बारा ग्रामपंचायतीतील हातपंप तांत्रिक कारणांमुळे नादुरुस्त असल्याच्या तक्रारी येथील पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे येतात. मागील महिनाभरापासून कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे हातपंप दुरुस्ती करणारे युनिट आठ दिवस वर्ध्यात, तर आठ दिवस आर्वीत असते. या कालावधीत नादुरुस्त हातपंप दुरुस्त करता येत नसल्याने अनेक ठिकाणी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे नियमित हातपंप दुरुस्ती करणारे पथक आर्वीतील ग्रामीण भागात देणे गरजेचे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे अगत्याचे आहे.गतवर्षी गडद झाले होते जलसंकटगतवर्षी फेब्रुवारी-मार्चपासूनच जलसंकट गडद झाले होते. आर्वी तालुक्यातील अनेक गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. यावर्षी मात्र, धरणांमध्ये जलसाठा समाधानकारक आहे. संभाव्य धोका टाळण्याकरिता प्रशासनाने भरीव तरतूद केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई