शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, पोलीस तपासात संतापजनक प्रकार उघड
5
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
6
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
7
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
8
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
9
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
10
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
11
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
12
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
13
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
14
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
15
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
16
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
17
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
18
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
19
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
20
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी

आर्वीत ४१ गावांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

आर्वी तालुक्यातील पाच गावांतील विहिरी पाणीटंचाई निवारणाच्या पार्श्वभूमीवर अधिग्रहित करण्यात येणार आहेत. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यात कोणत्याही गावात पाणीटंचाई भासत नसल्याने एकाही ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त न झाल्याची माहिती निरंक होती.

ठळक मुद्देपाच गावातील विहिरी होणार अधिग्रहित : ४२२ हातपंपांपैकी अनेक नादुरुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा / आर्वी : तालुक्यातील पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनेच्या १ एप्रिल ते ३० जून २०२० या कालावधीतील आराखड्यातील तिसऱ्या टप्प्यात ४१ गावांचा समावेश आहे.पाणीटंचाई असलेल्या गावात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सर्वेक्षण केले असून पाणीटंचाई निवारणार्थ आराखडा निश्चित केला आहे. तालुक्याकरिता ८६ लाख २१ हजारांचे तरतूद करण्यात आली आहे.आर्वी तालुक्यातील पाच गावांतील विहिरी पाणीटंचाई निवारणाच्या पार्श्वभूमीवर अधिग्रहित करण्यात येणार आहेत. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यात कोणत्याही गावात पाणीटंचाई भासत नसल्याने एकाही ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त न झाल्याची माहिती निरंक होती.१ जानेवारी ते ३१ मार्च २०२० च्या दुसऱ्या टप्प्यात २८ गावांचा समावेश होता. यात २० गावांत विहीर खोलीकरण करण्याचा प्रस्ताव होता. १ एप्रिल ते ३० जूनपर्यंतच्या तिसऱ्या टप्प्यातील पाणीटंचाई निवारणार्थ आराखड्यात ४१ गावांचा समावेश आहे. यात प्रस्तावित योजनेतील उपलब्ध साधनात सार्वजनिक विहिरी ७, खाजगी विहिरी १, हातपंप ७, तर २ नळयोजनेचा समावेश आहे. अप्रचलित उपाययोजनेत तालुक्यातील २४ सार्वजनिक विहिरी खोल करणे, ६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, याचा समावेश आहे. प्रचलित उपाययोजनेअंतर्गत २० तात्पुरत्या विशेष दुरुस्तीचा समावेश आहे, तर १३ नवीन विंधन विहिरी घेण्याचा प्रस्तावित योजनेत समावेश आहे.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना सुरूतालुक्यातील बाजारवाडा, सालदरा या दोन गावांतील काही भागात नागरिकांना पाणी मिळत नसल्याने विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहे, तर सावंगी (पोड) येथे पूर्वीपासूनच पाणीटंचाई आहे. नांदपूर येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे काम सुरू आहे, तर खुबगाव येथील पाणीपुरवठा करणारी विहीर धरणात गेली आहे. त्यामुळे या पाच गावातील विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावही तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांना पंचायत समितीने सादर केला आहे.हातपंप दुरुस्ती करणारे पथक हवेआर्वी तालुक्यात ७२ ग्रामपंचायती असून २२४ गावे ग्रामपंचायत हद्दीत येतात. तालुक्यातील या गावात एकूण ४२२ हातपंप आहेत. नियमितपणे सरासरी एका आठवड्यात दहा ते बारा ग्रामपंचायतीतील हातपंप तांत्रिक कारणांमुळे नादुरुस्त असल्याच्या तक्रारी येथील पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे येतात. मागील महिनाभरापासून कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे हातपंप दुरुस्ती करणारे युनिट आठ दिवस वर्ध्यात, तर आठ दिवस आर्वीत असते. या कालावधीत नादुरुस्त हातपंप दुरुस्त करता येत नसल्याने अनेक ठिकाणी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे नियमित हातपंप दुरुस्ती करणारे पथक आर्वीतील ग्रामीण भागात देणे गरजेचे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे अगत्याचे आहे.गतवर्षी गडद झाले होते जलसंकटगतवर्षी फेब्रुवारी-मार्चपासूनच जलसंकट गडद झाले होते. आर्वी तालुक्यातील अनेक गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. यावर्षी मात्र, धरणांमध्ये जलसाठा समाधानकारक आहे. संभाव्य धोका टाळण्याकरिता प्रशासनाने भरीव तरतूद केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई