शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

कालव्याची साफसफाई न करताच सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 21:57 IST

खरीप हंगाम संपल्याने आता रब्बी हंगाम सुरू झाला. रब्बीच्या सिंचनासाठी अप्पर वर्धा धरण विभागाने कालव्याची साफसफाई न करताच पाणी सोडले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्याच्या कार्र्यालयात जावून जाब विचारला असता त्यांनी कार्यालयातून शेतकऱ्यांना हुसकावून लावले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे निवेदन : अभियंत्याच्या मनमानीला वैतागले

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : खरीप हंगाम संपल्याने आता रब्बी हंगाम सुरू झाला. रब्बीच्या सिंचनासाठी अप्पर वर्धा धरण विभागाने कालव्याची साफसफाई न करताच पाणी सोडले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्याच्या कार्र्यालयात जावून जाब विचारला असता त्यांनी कार्यालयातून शेतकऱ्यांना हुसकावून लावले. याप्रकरणी मुजोर अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तत्काळ दुरूस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.अप्पर वर्धा धरण विभाग अंतर्गत उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्रमांक पाच हे कार्यालय तळेगावला आहे. यास कार्यालयातर्गत लहान आर्वी-किन्हाळा, खडकी-किन्हाळा, अंतोरा-बेलोरा कालवे येतात. या एकूण २२ कि़मी. लांबीच्या कालव्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मोठमोठी बाभुळची झाडे वाढली आहेत. गवत व रायमुन्यानी पूर्ण भाग झाकला आहे. याची साफसफाई करण्यासाठी पाणी वापर संस्थानी मागणी केली होती. त्यासाठी उपविभागीय अभियंता आर.ए. भोमले यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते. त्यांनी दुरूस्ती व साफसफाईचे अधिकार जलसंपदा विभाग अमरावतीच्या अभियांत्रिकी विभागाला असल्याचे सांगितले.त्यानंतर शेतकऱ्यांनी अमरावतीला कार्यकारी अभियंता पी.पी. पोटफोडे यांची भेट घेवून तात्काळ कालवे साफसफाई करण्याची मागणी केली असता कार्यकारी अभियंत्यानी अरेरावी व मुजोरी करीत मला सेवानिवृत्तीला अवघे काही दिवस राहिले. तुमच्याकडून जे होते ते करून घ्या, अशी दमदाटी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना आल्या पावलीच परत जावे लागले. याप्रकरणी अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांना कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. जलसंपदा विभागाने कालवे चांगले दुरूस्त व डागडुजी करून पाणी वापर संस्थेला हस्तांतरीत करायला पाहिले होते. मात्र दुरूस्तीसाठी मनुष्यबळ नाही, निधी मंजूर नाही, मशीनवर आॅपरेटर नाही, अशी कारण देवून शेतकऱ्यांची बोळवण केल्या जात आहे. लहानआर्वी-किन्हाळा-खडकी या ६ कि़मी. लांबीच्या एकाच कालव्यावर ४०४४ हेक्टरचे सिंचन आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी ऐन रब्बीच्या पिकासाठी शेतात पाणी न्यायचे कसे असा प्रश्न आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. २००५ च्या पाणी वाटप कराद्यानुसार कालवे दुरूस्ती करणे प्रत्येक विभागाला बंधनकारक आहे. मात्र अप्पर वर्धा धरण विभाग पांढरा हत्तीच्या भूमिकेत वावरत आहे. हा अन्याय तात्काळ दूर करून कालव्याची पूर्ण साफसफाई करावी आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी श्रीकृष्ण पाणी वापर संस्था परसोडा-खडकी, गजानन महाराज पाणी वापर संस्था खडकी-किन्हाळा संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नागपूरे, मंगेश नागपूरे, शंकर नागपूरे आदींनी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.कालव्याची साफसफाई करण्यासाठी कार्यकारी अभियंता व अधिनस्त अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. शेतकऱ्यांसोबत उद्धट वर्तन केल्याची तक्रार प्राप्त होताच चौकशी करून कार्यकारी अभियंता पोटफोडे यांच्यावर कारवाई करणार.- आर.के. ढवळेअधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, अमरावती.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी