शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

कालव्याची साफसफाई न करताच सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 21:57 IST

खरीप हंगाम संपल्याने आता रब्बी हंगाम सुरू झाला. रब्बीच्या सिंचनासाठी अप्पर वर्धा धरण विभागाने कालव्याची साफसफाई न करताच पाणी सोडले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्याच्या कार्र्यालयात जावून जाब विचारला असता त्यांनी कार्यालयातून शेतकऱ्यांना हुसकावून लावले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे निवेदन : अभियंत्याच्या मनमानीला वैतागले

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : खरीप हंगाम संपल्याने आता रब्बी हंगाम सुरू झाला. रब्बीच्या सिंचनासाठी अप्पर वर्धा धरण विभागाने कालव्याची साफसफाई न करताच पाणी सोडले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्याच्या कार्र्यालयात जावून जाब विचारला असता त्यांनी कार्यालयातून शेतकऱ्यांना हुसकावून लावले. याप्रकरणी मुजोर अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तत्काळ दुरूस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.अप्पर वर्धा धरण विभाग अंतर्गत उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्रमांक पाच हे कार्यालय तळेगावला आहे. यास कार्यालयातर्गत लहान आर्वी-किन्हाळा, खडकी-किन्हाळा, अंतोरा-बेलोरा कालवे येतात. या एकूण २२ कि़मी. लांबीच्या कालव्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मोठमोठी बाभुळची झाडे वाढली आहेत. गवत व रायमुन्यानी पूर्ण भाग झाकला आहे. याची साफसफाई करण्यासाठी पाणी वापर संस्थानी मागणी केली होती. त्यासाठी उपविभागीय अभियंता आर.ए. भोमले यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते. त्यांनी दुरूस्ती व साफसफाईचे अधिकार जलसंपदा विभाग अमरावतीच्या अभियांत्रिकी विभागाला असल्याचे सांगितले.त्यानंतर शेतकऱ्यांनी अमरावतीला कार्यकारी अभियंता पी.पी. पोटफोडे यांची भेट घेवून तात्काळ कालवे साफसफाई करण्याची मागणी केली असता कार्यकारी अभियंत्यानी अरेरावी व मुजोरी करीत मला सेवानिवृत्तीला अवघे काही दिवस राहिले. तुमच्याकडून जे होते ते करून घ्या, अशी दमदाटी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना आल्या पावलीच परत जावे लागले. याप्रकरणी अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांना कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. जलसंपदा विभागाने कालवे चांगले दुरूस्त व डागडुजी करून पाणी वापर संस्थेला हस्तांतरीत करायला पाहिले होते. मात्र दुरूस्तीसाठी मनुष्यबळ नाही, निधी मंजूर नाही, मशीनवर आॅपरेटर नाही, अशी कारण देवून शेतकऱ्यांची बोळवण केल्या जात आहे. लहानआर्वी-किन्हाळा-खडकी या ६ कि़मी. लांबीच्या एकाच कालव्यावर ४०४४ हेक्टरचे सिंचन आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी ऐन रब्बीच्या पिकासाठी शेतात पाणी न्यायचे कसे असा प्रश्न आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. २००५ च्या पाणी वाटप कराद्यानुसार कालवे दुरूस्ती करणे प्रत्येक विभागाला बंधनकारक आहे. मात्र अप्पर वर्धा धरण विभाग पांढरा हत्तीच्या भूमिकेत वावरत आहे. हा अन्याय तात्काळ दूर करून कालव्याची पूर्ण साफसफाई करावी आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी श्रीकृष्ण पाणी वापर संस्था परसोडा-खडकी, गजानन महाराज पाणी वापर संस्था खडकी-किन्हाळा संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नागपूरे, मंगेश नागपूरे, शंकर नागपूरे आदींनी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.कालव्याची साफसफाई करण्यासाठी कार्यकारी अभियंता व अधिनस्त अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. शेतकऱ्यांसोबत उद्धट वर्तन केल्याची तक्रार प्राप्त होताच चौकशी करून कार्यकारी अभियंता पोटफोडे यांच्यावर कारवाई करणार.- आर.के. ढवळेअधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, अमरावती.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी