शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात पाणीसंकट; नागरिकांना प्यावे लागणार स्वखर्चातून पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:54 IST

पाणीपुरवठा विभाग झाला सज्ज : जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा उन्हाळ्यात सूर्य चांगलाच आग ओकत आहे. उन्हाचा पारा ४२ ते ४४ अंश सेल्सिअसमध्ये खेळत आहे. प्रकल्प व विहिरीच्या जलपातळीत सातत्याने घट होत आहे. नदी-नाल्यांना मार्चअखेरीस कोरड पडली आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट करावी लागू नये, यासाठी जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हाती घेतलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे.

विहीर अधिग्रहणावर भर असल्याने प्रशासनाला पाण्यासाठी खिसा रिकामा करावा लागणार आहे. यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याचीही समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सार्वजनिक विहिरी, बोअरवेल व कूपनलिका कोरड्या झाल्याने त्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच गावांमध्ये पाण्यासाठी पायपीट केली जात आहे. त्यामुळे या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील पाच तालुक्यांत विहिरींचे अधिग्रहण केले असून, पाणी संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला जात असून जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभागही सज्ज झालेला आहे. 

कोणत्या प्रकल्पात किती साठा?प्रकल्प                        सध्याचा साठामदन उन्नई धरण                ५३.००निम्न वर्धा                            ५२.६९लाल नाला                          ४८.९०धाम प्रकल्प                       ३८.३५बोर प्रकल्प                        ३८.०८सुकली लघु                       २८.८८पंचधारा प्रकल्प                 २७.०९वर्धा कार नदी                   २१.६०डोंगरगाव प्रकल्प              २०.८६मदन प्रकल्प                     १४.३९पोथरा प्रकल्प                    ०९.१३

३३ विहिरींचे केलेय अधिग्रहणआठ तालुक्यांपैकी पाच तालुक्यात पाणीटंचाई लक्षात घेता ३३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. आगामी काळात आवश्यकता पडल्यास तरतूद करण्याचीही तयारी प्रशासनाची आहे.

मे महिना कसा काढणार?प्रकल्प व विहिरीतील जलसाठ्यात उष्णतेमुळे कमालीची घट होत आहे. नदी-नाले कोरडे पडले आहेत. प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी होत आहे. पशुधनाला पिण्यासाठी पाणी नसल्याने पायपीट करावी लागत आहे. त्यासाठी मजुरीवरही पाणी फेरावे लागत आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने मे महिना कसा काढायचा, असा प्रश्न नागरिकांना पडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टंचाई कृती आराखडा नेमका किती कोटींचा ?गावांना पाणी टंचाईचा सामना करावा यावर्षी जवळपास ५०१ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ८ तालुक्यातून पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाईचा १९ कोटी ७६ लाख ३२ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwardha-acवर्धाwater shortageपाणीकपात