शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
4
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
5
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
6
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
7
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
8
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
9
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
10
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
11
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
12
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
13
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
14
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
15
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
16
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
17
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
18
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
19
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
20
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

वर्धा जिल्ह्यात पाणीसंकट; नागरिकांना प्यावे लागणार स्वखर्चातून पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:54 IST

पाणीपुरवठा विभाग झाला सज्ज : जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा उन्हाळ्यात सूर्य चांगलाच आग ओकत आहे. उन्हाचा पारा ४२ ते ४४ अंश सेल्सिअसमध्ये खेळत आहे. प्रकल्प व विहिरीच्या जलपातळीत सातत्याने घट होत आहे. नदी-नाल्यांना मार्चअखेरीस कोरड पडली आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट करावी लागू नये, यासाठी जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हाती घेतलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे.

विहीर अधिग्रहणावर भर असल्याने प्रशासनाला पाण्यासाठी खिसा रिकामा करावा लागणार आहे. यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याचीही समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सार्वजनिक विहिरी, बोअरवेल व कूपनलिका कोरड्या झाल्याने त्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच गावांमध्ये पाण्यासाठी पायपीट केली जात आहे. त्यामुळे या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील पाच तालुक्यांत विहिरींचे अधिग्रहण केले असून, पाणी संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला जात असून जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभागही सज्ज झालेला आहे. 

कोणत्या प्रकल्पात किती साठा?प्रकल्प                        सध्याचा साठामदन उन्नई धरण                ५३.००निम्न वर्धा                            ५२.६९लाल नाला                          ४८.९०धाम प्रकल्प                       ३८.३५बोर प्रकल्प                        ३८.०८सुकली लघु                       २८.८८पंचधारा प्रकल्प                 २७.०९वर्धा कार नदी                   २१.६०डोंगरगाव प्रकल्प              २०.८६मदन प्रकल्प                     १४.३९पोथरा प्रकल्प                    ०९.१३

३३ विहिरींचे केलेय अधिग्रहणआठ तालुक्यांपैकी पाच तालुक्यात पाणीटंचाई लक्षात घेता ३३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. आगामी काळात आवश्यकता पडल्यास तरतूद करण्याचीही तयारी प्रशासनाची आहे.

मे महिना कसा काढणार?प्रकल्प व विहिरीतील जलसाठ्यात उष्णतेमुळे कमालीची घट होत आहे. नदी-नाले कोरडे पडले आहेत. प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी होत आहे. पशुधनाला पिण्यासाठी पाणी नसल्याने पायपीट करावी लागत आहे. त्यासाठी मजुरीवरही पाणी फेरावे लागत आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने मे महिना कसा काढायचा, असा प्रश्न नागरिकांना पडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टंचाई कृती आराखडा नेमका किती कोटींचा ?गावांना पाणी टंचाईचा सामना करावा यावर्षी जवळपास ५०१ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ८ तालुक्यातून पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाईचा १९ कोटी ७६ लाख ३२ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwardha-acवर्धाwater shortageपाणीकपात